शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

काडतूसे बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता: कल्पेश शिंदे ग्रीसमधून ठाण्यात परतला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:47 IST

अडीच वर्षांपूर्वी इसिसला मदत केल्याचा तसेच शेकडो शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली ग्रीस नौदलाने अटक केलेल्या ठाण्यातील कल्पेश शिंदे या खलाशाची आता निर्दोष सुटका झाली आहे.

ठळक मुद्देइसिसला सहकार्य केल्याचाह आणि शस्त्र बाळगल्याचा आरोपग्रीस न्यायालयाने सुनावली होती १५ वर्षांची शिक्षा भारतीय दूतावासाच्या मदतीने झाली सुटका

ठाणे : ‘इसिस’ला सहकार्य केल्याचा तसेच पाच हजार ५०० बंदूका आणि पाच लाख काडतूसांची वाहतूक करतांना ग्रीस पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी अटक केलेला ठाण्यातील भारतीय खलाशी कल्पेश शिंदे (२४) हा तरुण आता मायदेशी परतला आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीने ग्रीसच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केल्याने त्याच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.दहशतवाद्यांना काडतूसे पुरवित असल्याचा आरोप असलेला कल्पेश हा तब्बल २९ महिने ग्रीसच्या तुरुंगात होता. प्रशिक्षणार्थी खलाशी म्हणून तो नव्यानेच २०१५ मध्ये लिगल पोर्टवर कामावर रुजू झाला होता. त्यामुळे त्याची सतत जहाजावर नोकरी असायची. त्याचवेळी तुर्कीवरुन लिबियाला जाणा-या पहिल्याच जहाजावर त्याची डयूटी असतांना ग्रीसचा समुद्र पार करतांनाच त्यांच्या जहाजाची स्थानिक पोलिसांनी अचानक तपासणी केली. त्यावेळी कंटेनरच्या झडतीत पाच हजार ५०० बंदूका आणि पाच लाख काडतूसे त्या जहाजामध्ये आढळली. त्यामुळे ग्रीसच्या नौदलाने सात जणांसह त्याला पकडले. बोटीतून दिलेल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारेच तो हे जहाज घेऊन जात होता. कंटेनरमधील मालाशी आपला संबंध नसल्याचेही त्याने त्यावेळी ग्रीस पोलीस आणि नौदलाला सांगितले. परंतू, त्याची कोणतीही बाजू ऐकली गेली नाही. त्याला तेथील पोलिसांनी अटक करुन कोठडीत ठेवले. नंतर १५ दिवसांनी त्याला ग्रीसच्या मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. पाच हजारांमध्ये दोन भारतीय कैदी. त्यावेळी सोबतच्या अनेकांकडे त्याने मदतीचा हात मागितला. पुढे भारतीय दूतावासाशी संपर्क करुन आपली कैफियत मांडली. महिन्यातून दोन ते तीन वेळा या दूतावासातील अधिकारी त्याला भेटण्यासाठी येत होते. या अधिका-यांनी दिलेल्या पैशांमुळेच तो ठाण्यातील वृंदावन सोयायटीत राहणा-या आपल्या कुटूंबियांशी संपर्क साधू शकला. तिथे कोणतीही पिळवणूक नव्हती. त्यांच्यातील अनेकांना आपले निर्दोषत्व कळून आले. पण कोणतीही चूक नसतांना जो गुन्हा केलाच नाही, त्या गुन्हयाखाली अटक झाली. याचे शल्य नेहमी असायचे, असेही त्याने प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. सुरुवातीला या गुन्हयात १५ वर्षांची शिक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी आपल्या पायाखालची जमीनच सरकल्याचे तो म्हणाला. त्यानंतर दहा दिवसांतच याशिक्षेविरुद्ध तेथील वरच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी एक वर्षानंतर सुनावणी होईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्याच काळात मामा राजेश कदम आणि आई यांनी भारतीय दूतावासाशी वारंवार संपर्क साधल्यामुळे तब्बल २९ महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर आपली निर्दोष सुटका झाल्याचे कल्पेशने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाInternationalआंतरराष्ट्रीय