शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

कळमगावची पाणीटंचाई कधी दूर होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:16 IST

टँकरने पाणी पुरवण्याची मागणी : दोन्ही विहिरींतील पाणी पिण्यास अयोग्य

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी काही गावे आहेत की, कितीही उपाययोजना करूनही पाणीटंचाई त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. त्यापैकी एक गाव म्हणजे कळमगाव. दिवसेंदिवस येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर होते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे गावपाड्यांत पाणी पुरवणे आता कठीण होऊन बसले आहे.

तालुक्यातील कळमगाव हे मुंबई-नाशिक महामार्गाजवळ असलेले गाव. या गावातूनच रेल्वेमार्ग जातो. या गावाची लोकसंख्या आजमितीस दोन हजारांपर्यंत. गावात पाणीयोजना आहे खरी, मात्र तिला पाणी येणे शक्य नाही. या योजनेची अनेक लहानमोठी कामे होणे बाकी आहे. पण, या गावासाठी असणाऱ्या साखरोली तलावातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. या तलावातील पाण्याचे स्रोत पाऊस लवकर गेल्याने लवकरच बंद झाले आणि तलावातील पाणी झपाट्याने कमी झाले. त्याचा परिणाम असा झाला की, आज ज्या पाणीयोजना या पाण्यावर अवलंबून आहेत, त्या गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे.

या गावात तशा दोन विहिरी आहेत. या दोन्ही विहिरींना पिण्यासारखे पाणी नाही. आज जे पाणी आहे, त्या पाण्याचा सतत वापर न केल्याने ते खराब झाले असून ते पिण्यास लायक नाही. त्यामुळे या गावाला टँकरने पाणी पुरवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज गावात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. हे गाव तानसा तलावाच्या खोºयापासून दीड किमी अंतरावर असूनही या गावातील विहिरींमध्ये पाणी नाही. गावात असणाऱ्या बहुतांशी बोअरवेलही कोरड्या पडल्या आहेत.

दरम्यान, शहापूर तालुक्याच्या विविध भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना चार ते पाच किलोमीटर चालून पाणी आणावे लागत आहे. संपूर्ण दिवस पाणी भरण्यातच जातो असे या महिलांनी सांगितले. प्रशासनाने उपाययोजना करावी असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई