शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

कळमगावची पाणीटंचाई कधी दूर होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:16 IST

टँकरने पाणी पुरवण्याची मागणी : दोन्ही विहिरींतील पाणी पिण्यास अयोग्य

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी काही गावे आहेत की, कितीही उपाययोजना करूनही पाणीटंचाई त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. त्यापैकी एक गाव म्हणजे कळमगाव. दिवसेंदिवस येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर होते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे गावपाड्यांत पाणी पुरवणे आता कठीण होऊन बसले आहे.

तालुक्यातील कळमगाव हे मुंबई-नाशिक महामार्गाजवळ असलेले गाव. या गावातूनच रेल्वेमार्ग जातो. या गावाची लोकसंख्या आजमितीस दोन हजारांपर्यंत. गावात पाणीयोजना आहे खरी, मात्र तिला पाणी येणे शक्य नाही. या योजनेची अनेक लहानमोठी कामे होणे बाकी आहे. पण, या गावासाठी असणाऱ्या साखरोली तलावातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. या तलावातील पाण्याचे स्रोत पाऊस लवकर गेल्याने लवकरच बंद झाले आणि तलावातील पाणी झपाट्याने कमी झाले. त्याचा परिणाम असा झाला की, आज ज्या पाणीयोजना या पाण्यावर अवलंबून आहेत, त्या गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे.

या गावात तशा दोन विहिरी आहेत. या दोन्ही विहिरींना पिण्यासारखे पाणी नाही. आज जे पाणी आहे, त्या पाण्याचा सतत वापर न केल्याने ते खराब झाले असून ते पिण्यास लायक नाही. त्यामुळे या गावाला टँकरने पाणी पुरवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज गावात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. हे गाव तानसा तलावाच्या खोºयापासून दीड किमी अंतरावर असूनही या गावातील विहिरींमध्ये पाणी नाही. गावात असणाऱ्या बहुतांशी बोअरवेलही कोरड्या पडल्या आहेत.

दरम्यान, शहापूर तालुक्याच्या विविध भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना चार ते पाच किलोमीटर चालून पाणी आणावे लागत आहे. संपूर्ण दिवस पाणी भरण्यातच जातो असे या महिलांनी सांगितले. प्रशासनाने उपाययोजना करावी असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई