शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
3
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
4
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
5
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
6
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
7
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
8
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
9
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
10
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
11
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
12
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
13
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
14
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
15
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
16
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
17
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
18
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
19
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
20
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कळमगावची पाणीटंचाई कधी दूर होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:16 IST

टँकरने पाणी पुरवण्याची मागणी : दोन्ही विहिरींतील पाणी पिण्यास अयोग्य

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यात अशी काही गावे आहेत की, कितीही उपाययोजना करूनही पाणीटंचाई त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. त्यापैकी एक गाव म्हणजे कळमगाव. दिवसेंदिवस येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर होते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे गावपाड्यांत पाणी पुरवणे आता कठीण होऊन बसले आहे.

तालुक्यातील कळमगाव हे मुंबई-नाशिक महामार्गाजवळ असलेले गाव. या गावातूनच रेल्वेमार्ग जातो. या गावाची लोकसंख्या आजमितीस दोन हजारांपर्यंत. गावात पाणीयोजना आहे खरी, मात्र तिला पाणी येणे शक्य नाही. या योजनेची अनेक लहानमोठी कामे होणे बाकी आहे. पण, या गावासाठी असणाऱ्या साखरोली तलावातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. या तलावातील पाण्याचे स्रोत पाऊस लवकर गेल्याने लवकरच बंद झाले आणि तलावातील पाणी झपाट्याने कमी झाले. त्याचा परिणाम असा झाला की, आज ज्या पाणीयोजना या पाण्यावर अवलंबून आहेत, त्या गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे.

या गावात तशा दोन विहिरी आहेत. या दोन्ही विहिरींना पिण्यासारखे पाणी नाही. आज जे पाणी आहे, त्या पाण्याचा सतत वापर न केल्याने ते खराब झाले असून ते पिण्यास लायक नाही. त्यामुळे या गावाला टँकरने पाणी पुरवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज गावात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. हे गाव तानसा तलावाच्या खोºयापासून दीड किमी अंतरावर असूनही या गावातील विहिरींमध्ये पाणी नाही. गावात असणाऱ्या बहुतांशी बोअरवेलही कोरड्या पडल्या आहेत.

दरम्यान, शहापूर तालुक्याच्या विविध भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना चार ते पाच किलोमीटर चालून पाणी आणावे लागत आहे. संपूर्ण दिवस पाणी भरण्यातच जातो असे या महिलांनी सांगितले. प्रशासनाने उपाययोजना करावी असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई