शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

रेलनीरच्या उत्पादनांवर काकोळे गावाचा उल्लेख करावा; काकोळे ग्रामस्थांचा गांधी जयंतीला सत्याग्रह

By पंकज पाटील | Updated: October 2, 2023 19:19 IST

काकोळे ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामस्वराज सत्याग्रह आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

अंबरनाथ - रेल्वे प्रशासनातर्फे उत्पादित केल्या जाणाऱ्या रेलनीर उत्पादनांवर काकोळे गावाचा ठळक उल्लेख करावा, या मागणीला घेऊन आणि पाण्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी अनागोंदी कारभारा विरोधात, काकोळे ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामस्वराज सत्याग्रह आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

अंबरनाथ तालुक्यातील काकोळे गावात रेल्वेच्या मालकीचे जीआयपी तलाव असून त्याठिकाणी 2013 साली रेल्वे प्रवाश्यांना बाटलीबंद पाणी पुरवठा करण्यासाठी आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेलनीर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. निसर्गरम्य ठिकाण असलेल्या काकोळे गावात रेल्वेने ब्रिटिशकाळात जीआयपी तलाव बांधला पण रेलनीर प्रकल्पावर काकोळे गावाचा कुठेही उल्लेख नाही. रेलनीर प्रकल्पावर काकोळे गावाचा नाव असावे या मागणीसाठी काकोळे गावचे सरपंच नरेश गायकर यांनी आज महात्मा गांधी जयंतीला रेलनीर प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले आहे. 

यासंदर्भात रेल्वे प्रशासन, रेल्वे राज्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याला प्रतिसाद लाभला नाही, त्यामुळे रेल प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन सुरू केल्याची माहिती गायकर यांनी दिली. त्याचप्रमाणे रेलनीर प्रकल्पाला लागणारी वाहतूक सेवा टीसीसीय वाहतूक संघटनेच्या माध्यमातून सुरळीत सुरू आह. असे असताना रेलनीरचे उतपादन घटत असल्याचे कारण सांगून विविध रेल्वे स्थानकांवर रेलनीर पाणीपुरवठा बंद केल्याने वाहतूक व्यवस्था करणाऱ्या मालवाहतूकदारांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. 

संबंबधित मालवाहतूकदार स्थानिक ग्रामस्थ असून त्यांच्यावरील अन्याय देखील दूर करावा या दोन्ही मागण्यांसाठी सरपंच गायकर यांनी आंदोलन सुरू केले आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, बंडू देशमुख, चैनू जाधव, विलास पाटील, सचिन जाधव, सुरेश जाधव, देविदास पाटील, गणेश गायकर, प्रकाश गायकर, सूर्यकांत गायकर आदींनी सहभागी होऊन सरपंच गायकर यांना पाठिंबा दर्शवला.

टॅग्स :agitationआंदोलनambernathअंबरनाथIndian Railwayभारतीय रेल्वे