शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

रेलनीरच्या उत्पादनांवर काकोळे गावाचा उल्लेख करावा; काकोळे ग्रामस्थांचा गांधी जयंतीला सत्याग्रह

By पंकज पाटील | Updated: October 2, 2023 19:19 IST

काकोळे ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामस्वराज सत्याग्रह आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

अंबरनाथ - रेल्वे प्रशासनातर्फे उत्पादित केल्या जाणाऱ्या रेलनीर उत्पादनांवर काकोळे गावाचा ठळक उल्लेख करावा, या मागणीला घेऊन आणि पाण्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी अनागोंदी कारभारा विरोधात, काकोळे ग्रामस्थांच्या वतीने आज महात्मा गांधी जयंतीदिनी ग्रामस्वराज सत्याग्रह आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

अंबरनाथ तालुक्यातील काकोळे गावात रेल्वेच्या मालकीचे जीआयपी तलाव असून त्याठिकाणी 2013 साली रेल्वे प्रवाश्यांना बाटलीबंद पाणी पुरवठा करण्यासाठी आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेलनीर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. निसर्गरम्य ठिकाण असलेल्या काकोळे गावात रेल्वेने ब्रिटिशकाळात जीआयपी तलाव बांधला पण रेलनीर प्रकल्पावर काकोळे गावाचा कुठेही उल्लेख नाही. रेलनीर प्रकल्पावर काकोळे गावाचा नाव असावे या मागणीसाठी काकोळे गावचे सरपंच नरेश गायकर यांनी आज महात्मा गांधी जयंतीला रेलनीर प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले आहे. 

यासंदर्भात रेल्वे प्रशासन, रेल्वे राज्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याला प्रतिसाद लाभला नाही, त्यामुळे रेल प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन सुरू केल्याची माहिती गायकर यांनी दिली. त्याचप्रमाणे रेलनीर प्रकल्पाला लागणारी वाहतूक सेवा टीसीसीय वाहतूक संघटनेच्या माध्यमातून सुरळीत सुरू आह. असे असताना रेलनीरचे उतपादन घटत असल्याचे कारण सांगून विविध रेल्वे स्थानकांवर रेलनीर पाणीपुरवठा बंद केल्याने वाहतूक व्यवस्था करणाऱ्या मालवाहतूकदारांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. 

संबंबधित मालवाहतूकदार स्थानिक ग्रामस्थ असून त्यांच्यावरील अन्याय देखील दूर करावा या दोन्ही मागण्यांसाठी सरपंच गायकर यांनी आंदोलन सुरू केले आहे. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, बंडू देशमुख, चैनू जाधव, विलास पाटील, सचिन जाधव, सुरेश जाधव, देविदास पाटील, गणेश गायकर, प्रकाश गायकर, सूर्यकांत गायकर आदींनी सहभागी होऊन सरपंच गायकर यांना पाठिंबा दर्शवला.

टॅग्स :agitationआंदोलनambernathअंबरनाथIndian Railwayभारतीय रेल्वे