शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

‘काकस्पर्श’ दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ; पितृ पंधरवड्यात कावळ्यांना विशेष महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:07 IST

पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त

- राहुल वाडेकर विक्रमगड : उकिरड्यावरील खाद्य शोधणारा, मेलेले प्राणी खाणारा कावळा सहसा कुणालाच आवडत नाही. त्याचे ओरडणे कर्कश असल्याने त्यांना लोकांकडून तुच्छतेची वागणूक मिळते, मात्र याच कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की सुगीचे दिवस येतात. परंतु गेल्या काही वर्षांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे.

गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसात आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास) ठेवण्याची रूढी-परंपरा खूप जुन्या काळापासून आजही चालत आलेली आहे. ही परंपरा ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही जोपासली जात आहे. या दिवसात पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची परंपरा आहे.

आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार नैवेद्य देण्याची प्रथा-परंपरा असल्याने या दिवसांत महत्त्व असते ते कावळ्याला. कावळ्याने जर घास घेतला नाही, किंवा घास घेण्यास उशीर झाला तरी घरातील कुणीही माणसे जेवणास बसत नाहीत. आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. एरवी उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पंधरवड्यात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो. सध्या मात्र या कावळ्यांची संख्याच कमी झालेली दिसून येत आहे. पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बºयाचदा केवळ साकडे घालून जेवण आटपावे लागते. या वेळी घरातल्या बुजुर्गानाही दु:ख वाटते. कावळा हा पक्षी इतर वेळी उपद्रवी, अस्पृश्य समजला जातो.

पितृ पंधरवड्याव्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही फारशी आठवण येत नाही. मात्र, या दिवसांत त्यांची काव-काव ऐकण्यासाठी आणि आपण टाकलेल्या नैवेद्यामध्ये कावळ्याने चोच लावण्यासाठी त्यांची तासन्तास अनेक घाटांवर वाट पाहिली जाते. आजच्या आधुनिक युगातही पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलावर, पत्र्यांवरही ठेवले जातात. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या प्रथा-परंपरेचा उलगडा होत नसला तरी हा पितृपंधरवडा मात्र मोठ्या श्रद्धेने प्रत्येक घरात तसेच खेड्यापाड्यात आजही पाळला जात आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र