शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

‘काकस्पर्श’ दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ; पितृ पंधरवड्यात कावळ्यांना विशेष महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:07 IST

पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त

- राहुल वाडेकर विक्रमगड : उकिरड्यावरील खाद्य शोधणारा, मेलेले प्राणी खाणारा कावळा सहसा कुणालाच आवडत नाही. त्याचे ओरडणे कर्कश असल्याने त्यांना लोकांकडून तुच्छतेची वागणूक मिळते, मात्र याच कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की सुगीचे दिवस येतात. परंतु गेल्या काही वर्षांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे.

गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसात आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास) ठेवण्याची रूढी-परंपरा खूप जुन्या काळापासून आजही चालत आलेली आहे. ही परंपरा ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही जोपासली जात आहे. या दिवसात पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची परंपरा आहे.

आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार नैवेद्य देण्याची प्रथा-परंपरा असल्याने या दिवसांत महत्त्व असते ते कावळ्याला. कावळ्याने जर घास घेतला नाही, किंवा घास घेण्यास उशीर झाला तरी घरातील कुणीही माणसे जेवणास बसत नाहीत. आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. एरवी उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पंधरवड्यात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो. सध्या मात्र या कावळ्यांची संख्याच कमी झालेली दिसून येत आहे. पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बºयाचदा केवळ साकडे घालून जेवण आटपावे लागते. या वेळी घरातल्या बुजुर्गानाही दु:ख वाटते. कावळा हा पक्षी इतर वेळी उपद्रवी, अस्पृश्य समजला जातो.

पितृ पंधरवड्याव्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही फारशी आठवण येत नाही. मात्र, या दिवसांत त्यांची काव-काव ऐकण्यासाठी आणि आपण टाकलेल्या नैवेद्यामध्ये कावळ्याने चोच लावण्यासाठी त्यांची तासन्तास अनेक घाटांवर वाट पाहिली जाते. आजच्या आधुनिक युगातही पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलावर, पत्र्यांवरही ठेवले जातात. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या प्रथा-परंपरेचा उलगडा होत नसला तरी हा पितृपंधरवडा मात्र मोठ्या श्रद्धेने प्रत्येक घरात तसेच खेड्यापाड्यात आजही पाळला जात आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र