शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘काकस्पर्श’ दिवसेंदिवस होतोय दुर्मीळ; पितृ पंधरवड्यात कावळ्यांना विशेष महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:07 IST

पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त

- राहुल वाडेकर विक्रमगड : उकिरड्यावरील खाद्य शोधणारा, मेलेले प्राणी खाणारा कावळा सहसा कुणालाच आवडत नाही. त्याचे ओरडणे कर्कश असल्याने त्यांना लोकांकडून तुच्छतेची वागणूक मिळते, मात्र याच कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की सुगीचे दिवस येतात. परंतु गेल्या काही वर्षांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे.

गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसात आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास) ठेवण्याची रूढी-परंपरा खूप जुन्या काळापासून आजही चालत आलेली आहे. ही परंपरा ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही जोपासली जात आहे. या दिवसात पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची परंपरा आहे.

आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार नैवेद्य देण्याची प्रथा-परंपरा असल्याने या दिवसांत महत्त्व असते ते कावळ्याला. कावळ्याने जर घास घेतला नाही, किंवा घास घेण्यास उशीर झाला तरी घरातील कुणीही माणसे जेवणास बसत नाहीत. आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. एरवी उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पंधरवड्यात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो. सध्या मात्र या कावळ्यांची संख्याच कमी झालेली दिसून येत आहे. पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बºयाचदा केवळ साकडे घालून जेवण आटपावे लागते. या वेळी घरातल्या बुजुर्गानाही दु:ख वाटते. कावळा हा पक्षी इतर वेळी उपद्रवी, अस्पृश्य समजला जातो.

पितृ पंधरवड्याव्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही फारशी आठवण येत नाही. मात्र, या दिवसांत त्यांची काव-काव ऐकण्यासाठी आणि आपण टाकलेल्या नैवेद्यामध्ये कावळ्याने चोच लावण्यासाठी त्यांची तासन्तास अनेक घाटांवर वाट पाहिली जाते. आजच्या आधुनिक युगातही पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलावर, पत्र्यांवरही ठेवले जातात. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या प्रथा-परंपरेचा उलगडा होत नसला तरी हा पितृपंधरवडा मात्र मोठ्या श्रद्धेने प्रत्येक घरात तसेच खेड्यापाड्यात आजही पाळला जात आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र