शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

उल्हासनगर चालिया मंदिरातील ज्योतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By सदानंद नाईक | Updated: August 15, 2023 16:32 IST

पवित्र ज्योतीला ७५ वर्ष पूर्ण झाले आहे. सतत तेवत राहत असलेल्या या ज्योतीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. 

उल्हासनगर : फाळणीनंतर सिंधी बांधवानी स्थापन केलेल्या चालिया मंदिरात पाकिस्तानमधील मुख्य चालिया मंदिरातून आणलेल्या पवित्र ज्योतीला ७५ वर्ष पूर्ण झाले आहे. सतत तेवत राहत असलेल्या या ज्योतीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. 

फाळणीच्या वेळी विस्थापित झालेल्या काही सिंधी बांधवाना कल्याण शेजारील ब्रिटिश छावणीत वसविण्यात आले. तसेच या विस्थापित छावणीला शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून भारताचे पहिले गव्हर्नर सी गोपालचार्य यांनी उल्हासनगर नाव देण्यात आले. सॅन १९४७ पूर्वी अखंड हिंदुस्थान असताना पाकिस्तानातील सिंध प्रांतात असणाऱ्या पिरघोट शहरात प्रसिद्ध चालिया मंदिरात ही ज्योत ५० वर्षे तेवत होती. सिंधी बांधवाची श्रद्धास्थान असलेल्या चालिया मंदिराची आठवण म्हणून कॅम्प नं-५ परिसरात दुसरे नवीन चालिया मंदिर बांधून पाकिस्तान मधील मुख्य चालिया मंदिरातून सतत तेवत असलेली ज्योत उल्हासनगरातील चालिया मंदिरात सुरक्षितपणे आणली. याच ठिकाणी चालिया उत्सव धुमधडाक्यातत साजरा होत असून देशविदेशातील लाखो सिंधी बांधव याठिकाणी दर्शन करण्यासाठी येतात.

शहरातील चालिया मंदिरात सतत ७५ वर्ष ज्योत तेवत आहे. पाकिस्तान ते उल्हासनगर अशा १२५ वर्षांपासून ही ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यात आली आहे. या ज्योतीची अखंडपणे तेवत राहण्याची माहिती गंगोत्री फाऊंडेशनचे भारत गंगोत्री, सोनिया धामी यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडे पाठवली होती. लक्ष वेधणारी आणि अवाक करून सोडणारी ही माहिती बघितल्यावर या ज्योतची रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची टीम १७ ऑगस्ट रोजी मंदिरात येणार असून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुरस्कार, ट्रॉफी देण्यात येणार आहे. 

याशिवाय इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड यांनीही सतत तेवत राहणाऱ्या ज्योतीचे कौतूक करून तसे पत्र पाठवले आहे. या पवित्र ज्योतची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुक मध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती भारत गंगोत्री,सोनिया धामी यांनी दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर