शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

वसईतील तोडू मोहीम ठप्प

By admin | Updated: April 4, 2016 01:54 IST

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तीन सहाय्यक आयुक्तांवर हल्ले झाले असून येथील पोलीस बळ भरतीच्या बंदोबस्तात गुंतल्याने त्याचे संरक्षण या मोहिमेला मिळेनासे झाल्यचे

शशी करपे, वसईअनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तीन सहाय्यक आयुक्तांवर हल्ले झाले असून येथील पोलीस बळ भरतीच्या बंदोबस्तात गुंतल्याने त्याचे संरक्षण या मोहिमेला मिळेनासे झाल्यचे पाहून या पथकाला रोखण्यासाठी मोठा पूर्वनियोजित जमाव जमा होऊ लागला आहे. गेल्या दीड-दोन महिन्यात शिवीगाळ, धक्काबुक्की आणि हल्ल्याचे प्रकार वाढल्याने अनधिकृत बांधकामविरोधी पथकातील अधिकारी-कर्मचारी चिंंताग्रस्त झाले असून ही मोहिम ठप्प झाली आहे. आयुक्त सतीश लोखंडे यांनी सध्या शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहिम अधिक तीव्र केली आहे. विरार, नालासोपारा, वालीव, पेल्हार, गोखीवरे परिसरातील अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर पाडली जात आहेत. मात्र, गेल्या महिन्यापासून पोलीस संरक्षण मिळत नसल्याने अनधिकृत बांधकामे तोडण्यास गेलेल्या पथकाच्या अंगावर मोठा जमाव धावून जाऊन शिवीगाळ, धकाबुक्कीसह थेट हल्ला करू लागल्याने अधिकारी-कर्मचारी धास्तावले आहेत. गेल्या महिन्यात पेल्हार प्रभागात अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला होता. व्दारकानाथ पतंगराव यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त स्मिता भोईर घटनास्थळी पोचल्या असता मोठ्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी एका महिलेने कोयत्याने भोईर यांच्यावर हल्ला केला होता. सुदैवाने एका नागरीकांने तो वार स्वत:वर घेतल्याने भोईर थोडक्यात बचावल्या होत्या. त्यानंतर नालासोपारा शहरात उपायुक्त किशोर गवस यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम तोडत असलेल्या पथकावर पाचशेहून अधिक लोकांच्या जमावाने हल्ला चढवला होता. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव आणि अशोक गुरव यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार घय्ऋल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. विरार येथील कारगील नगरातही जमावाने पथकाला रोखून धरले होते. मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरून कारवाई करीत असताना येथील लोकांनी पथकाला तीन वेळा रोखून परत पाठवले. त्यामुळे कारगील नगरमधील कारवाई बंद करण्यात आली आहे. शनिवारी पेल्हार प्रभागात कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्तांसह अतिक्रमण प्रतिबंधक अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी मोठा जमाव जमा झाल्याने पथकाला कारवाई करणे अशक्य होऊन बसले होते. शुक्रवारी दुपारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव आणि अशोक गुरव नालासोपारा परिसरात कारवाईसाठी गेले असता मोठा जमाव आडवा आला. त्यानंतर एका ठिकाणी पाण्याचा टँकर उभा करून पथकाला कारवाई करण्यापासून रोखण्यात आले. कारवाईच्या वेळी पोलीस नसतात याची जाणिव असलेल्या चाळमाफियांनी जमाव गोळा करून कारवाईत अडथळा आणण्याची नवी शक्कल लढवली असून त्यात ते यशस्वीही होऊ लागले आहेत.