शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

वसईतील तोडू मोहीम ठप्प

By admin | Updated: April 4, 2016 01:54 IST

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तीन सहाय्यक आयुक्तांवर हल्ले झाले असून येथील पोलीस बळ भरतीच्या बंदोबस्तात गुंतल्याने त्याचे संरक्षण या मोहिमेला मिळेनासे झाल्यचे

शशी करपे, वसईअनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तीन सहाय्यक आयुक्तांवर हल्ले झाले असून येथील पोलीस बळ भरतीच्या बंदोबस्तात गुंतल्याने त्याचे संरक्षण या मोहिमेला मिळेनासे झाल्यचे पाहून या पथकाला रोखण्यासाठी मोठा पूर्वनियोजित जमाव जमा होऊ लागला आहे. गेल्या दीड-दोन महिन्यात शिवीगाळ, धक्काबुक्की आणि हल्ल्याचे प्रकार वाढल्याने अनधिकृत बांधकामविरोधी पथकातील अधिकारी-कर्मचारी चिंंताग्रस्त झाले असून ही मोहिम ठप्प झाली आहे. आयुक्त सतीश लोखंडे यांनी सध्या शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहिम अधिक तीव्र केली आहे. विरार, नालासोपारा, वालीव, पेल्हार, गोखीवरे परिसरातील अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर पाडली जात आहेत. मात्र, गेल्या महिन्यापासून पोलीस संरक्षण मिळत नसल्याने अनधिकृत बांधकामे तोडण्यास गेलेल्या पथकाच्या अंगावर मोठा जमाव धावून जाऊन शिवीगाळ, धकाबुक्कीसह थेट हल्ला करू लागल्याने अधिकारी-कर्मचारी धास्तावले आहेत. गेल्या महिन्यात पेल्हार प्रभागात अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला होता. व्दारकानाथ पतंगराव यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त स्मिता भोईर घटनास्थळी पोचल्या असता मोठ्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी एका महिलेने कोयत्याने भोईर यांच्यावर हल्ला केला होता. सुदैवाने एका नागरीकांने तो वार स्वत:वर घेतल्याने भोईर थोडक्यात बचावल्या होत्या. त्यानंतर नालासोपारा शहरात उपायुक्त किशोर गवस यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम तोडत असलेल्या पथकावर पाचशेहून अधिक लोकांच्या जमावाने हल्ला चढवला होता. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव आणि अशोक गुरव यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार घय्ऋल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. विरार येथील कारगील नगरातही जमावाने पथकाला रोखून धरले होते. मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरून कारवाई करीत असताना येथील लोकांनी पथकाला तीन वेळा रोखून परत पाठवले. त्यामुळे कारगील नगरमधील कारवाई बंद करण्यात आली आहे. शनिवारी पेल्हार प्रभागात कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्तांसह अतिक्रमण प्रतिबंधक अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी मोठा जमाव जमा झाल्याने पथकाला कारवाई करणे अशक्य होऊन बसले होते. शुक्रवारी दुपारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव आणि अशोक गुरव नालासोपारा परिसरात कारवाईसाठी गेले असता मोठा जमाव आडवा आला. त्यानंतर एका ठिकाणी पाण्याचा टँकर उभा करून पथकाला कारवाई करण्यापासून रोखण्यात आले. कारवाईच्या वेळी पोलीस नसतात याची जाणिव असलेल्या चाळमाफियांनी जमाव गोळा करून कारवाईत अडथळा आणण्याची नवी शक्कल लढवली असून त्यात ते यशस्वीही होऊ लागले आहेत.