शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामास आता जूनची डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:00 IST

ठाणे स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामास लवकरच सुरुवात

ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकातील अतिरिक्त वाढणारा भार कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या कळवा-ऐरोली एलिव्हेटेड या रेल्वेमार्गाच्या दुसरा टप्प्यातील कामाची गती वाढवून प्रवाशांची गर्दी टाळण्याकरिता तसेच फेऱ्या वाढविण्यास आवश्यक पाचव्या व सहाव्या लाइनचे हे काम ३० जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले.

रेल्वेच्या विविध समस्यांबाबत प्रशासनास सूचना करण्यास रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या दालनात होणारी खासदारांची बैठक यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक खासदाराला त्यांच्या समस्या व सूचना मांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वैयक्तिक वेळ देणे गरजेचे असल्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल व मध्य रेल्वेचे प्रबंधक शलभ गोयल तसेच एमआरव्हीसीचे चेअरमन रवी खुराना तसेच इतर खासदार उपस्थित होते.

ठाणे रेल्वेस्थानकातील मुंबई दिशेने असणाऱ्या पादचारी पुलाचे काम १० डिसेंबर रोजी व कल्याण दिशेस असणाऱ्या पादचारी पुलाचे काम १५ डिसेंबर रोजी सुरू करण्यात येईल, असे सांगितले. मध्य रेल्वेमार्गावरील १५ डब्यांच्या लोकलफेऱ्या, महिला विशेष लोकल, सरकते जिने, नवीन तिकीट खिडकी, शौचालयांची संख्या वाढविण्याची मागणी केली.१६ एप्रिल १८५३ रोजी ठाणे ते बोरीबंदर अशी भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली होती. त्या ठाणे रेल्वेस्थानकातील धोकादायक इमारत पाडून नव्या इमारतीसाठी निधीची उपलब्धता केली असून ती पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच याचे काम सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले.

ठाण्याजवळ पूर्व द्रुतगती महामार्गावरील अरुंद रेल्वेपुलावरील नवीन गर्डर टाकण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होऊन त्यावरील मार्गिकेचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून देऊ. तसेच कोपरी सॅटिस २ च्या इमारतीच्या आराखड्यास इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ॲथॉरिटीकडून लवकरच मान्यता मिळवून देऊ, असे आश्वासनही दिले.

लोकग्राम पूल, चिखलोली स्थानक प्रकल्पांना गतीकल्याण : पूर्वेला जोडणाऱ्या लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. सध्याचा जुना पूल दोन महिन्यांत पाडून लगेचच नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. जुना पूल पाडण्यासाठी कंत्राटदार नेमला असून हे काम सुरू असतानाच नवीन पुलाच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सूचना मध्य रेल्वेने मान्य केली आहे. तसेच चिखलोली रेल्वेस्थानकासाठी जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेलाही गती मिळाली आहे.

लोकग्राम येथील पुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात होऊन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या पुलासाठी कल्याण-डोंबिवली मनपातर्फे लवकरच रेल्वेकडे ७८ कोटी रुपये जमा केले जातील, असेही शिंदे यांनी सांगितले. अंबरनाथ व बदलापूरदरम्यान चिखलोली स्थानकासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संयुक्त सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. आता अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली असून, काही अडचणी येत असल्याची माहिती बैठकीत रेल्वेने दिली असता त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने एक बैठक घेण्याचे आश्वासन खासदारांनी दिले.

पारसिक येथून खाडीच्या दिशेने जाणाऱ्या एलिव्हेटेड मार्गिकांचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून महत्त्वाच्या गर्डरचे लाँचिंग पुढील महिन्यात होईल. कोपर, अंबरनाथ स्थानकांमधील होम प्लॅटफॉर्मचे काम प्रगतिपथावर आहे. कोपर येथील काम ३१ मार्चपर्यंत, तर अंबरनाथ येथील काम ३१ जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वे