शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

By अजित मांडके | Updated: April 21, 2023 17:02 IST

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खारघरच्या घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे. परंतु त्यावर एकही वरीष्ठ नेता बोलण्यास तयार नाही. उलट त्याचे पाप आता दुस-याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.

ठाणे : खारघर येथे झालेल्या दुर्घटनेची साधी चौकशी देखील केली जात नाही. मात्र तिकडे पप्पीची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाते हे फार दुर्देवी असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. त्यातही राजकीय ताकद दाखविण्यासाठी हा अट्टाहास केला गेला असतांना आता कार्यक्रम दुपारी घेण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच सांगितल्याचे सांगत त्यांच्यावर आपले पाप ढकलण्याचा प्रकार केला जात असल्याची टीका देखील त्यांनी केली. परंतु या प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशाच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खारघरच्या घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे. परंतु त्यावर एकही वरीष्ठ नेता बोलण्यास तयार नाही. उलट त्याचे पाप आता दुस-याच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्य समिती नेमली आहे.  करीर हे अतिशय चांगले अधिकारी आहेत. परंतु मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी एखाद्या फाईलवर सही करायला सांगितले तर, अधिकारी त्यास नकार देत नाहीत. त्याचप्रमाणे नोकरशहा म्हणून ते सरकार चुकले हे सांगू शकतील का, हा प्रश्न आहे. त्यामुळेच एक सदस्य समिती ऐवजी निवृत्त न्यायधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यातही राज्य सरकारची समिती अशा घटना पुढे घडू नयेत म्हणून पर्याय सुचवेल. पण, उद्याच कोणी बघितले आहे. 

तसेच त्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एक सदस्य समिती तयार करून राज्याला मुर्ख बनविण्याचे काम करू नका, धुळफेक करू नका. हि दुर्घटना नेमकी कशी घडली आणि काय चुका झाल्या हे सर्व समोर येऊ द्या. त्यासाठीच न्यायालयीन चौकशी महत्वाची आहे. त्यात सर्व काही समोर येईलच, असेही ते म्हणाले. यापुर्वी अशा दुर्घटना घडल्यानंतर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. खारघर येथे उन्हात नागरिकांना बसविणे हे अमानवी कृत्य होते. त्यामुळेच राज्य सरकारने या दुघर्टनेची जबाबदारी घ्यायला हवी, असेही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड