शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

आधी शेतकऱ्यांना न्याय द्या, मगच मेट्रो कारशेडचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 1:28 AM

घोडबंदर भागातील मोघरपाड्यात १०० एकर खारभूमी जमिनीवर मेट्रो कारशेडचे काम हाती घेण्यात येणार आहे.

ठाणे : घोडबंदर भागातील मोघरपाड्यात १०० एकर खारभूमी जमिनीवर मेट्रो कारशेडचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ओवळा, मोघरपाडा येथे शेतकऱ्यांची जमीन एमएमआरडीएला हवी आहे. मात्र, शेतकºयांना त्याचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, शेतकºयांचे पूर्ण समाधान करा, त्यांना न्याय द्या मगच पुढे कारशेडचे काम सुरू करा, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी घेतली. ओवळा, मोघरपाडा येथे जमलेल्या शेतकरी व एमएमआरडीएच्या अधिकाºयांसमोर त्यांनी ही मागणी केली.ठाण्यातील ओवळा, मोघरपाडा येथे खारभूमी परिसर असून जुना सर्व्हे नंबर २८ (नवीन सर्व्हे नंबर ३०) येथे वर्षानुवर्षे शेतकरी भातशेती करतात. पूर्वीच्या काळापासून जवळपास येथे एकूण १८७ कुटुंबे शेती करीत आहेत. प्रत्यक्षात आजही शेती करणाºयांची संख्या जास्त आहे. या जागेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकरी भातशेती करतात. काही लोक येथे खाडीकिनारी मासेमारी करायचे. खाडीचे भरतीओहोटीचे पाणी शेतात यायचे व यामुळे भातशेतीचे नुकसान व्हायचे, त्यामुळे या परिसरात त्यावेळच्या सरकारने १९६० साली शेतकºयांना येथे एक बंधारा बांधायला लावला. यामुळे जमिनीचे रक्षण होऊन शेतीचे क्षेत्र वाढले. १९६० मध्ये १६७ लोकांना भातशेती करण्यासाठी प्रत्येकी ६४ गुंठे जागा सरकारकडून देण्यात आली.इतरांना तोंडी भातशेती करण्यासाठी त्यावेळच्या अधिकाºयांनी येथील जमीन देण्यात आली. मात्र, ही जमीन कसणाºया शेतकºयांच्या नावाची नोंद सरकारदरबारी पुढे झाली नाही. परंतु, अनेक शेतकरी वर्षानुवर्षे ती करत आहेत.>शेतकºयांना नोटिसा दिल्याच नाहीतएमएमआरडीएने आता मेट्रो कारशेडचे आरक्षण ओवळा-मोघरपाडा येथील या खारभूमी जागेत टाकले आहे. यासाठी सुमारे १०० एकर जागा हवी आहे. या जागेच्या सर्व्हेसाठी एमएमआरडीएचे अधिकारी याठिकाणी गुरुवारी आले असता सुमारे २५० शेतकरी त्याठिकाणी हजर होते. यानंतर, आमदार सरनाईक यांनी याठिकाणी हजेरी लावली. एमएमआरडीएकडून या शेतकºयांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा देण्यात आलेल्या नसल्याचे निदर्शनास आणून त्यांनी आधी शेतकºयांचे समाधान करा. त्यांना शासकीय नोकरीत स्थान द्या, जमिनींचा योग्य मोबदला द्या, त्यांच्या इतर मागण्या मान्य करा. त्यानंतरच कारशेडचे काम सुरू करा, असे सांगितले. यावेळी स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका नम्रता घरत तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.