शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर टोल नाका वसुली बंद झाल्याने मीरा भाईंदरमध्ये आनंद; टोलसह कोंडीतून सुटका

By धीरज परब | Updated: October 15, 2024 09:41 IST

मध्यरात्री पासून हलक्या चारचाकी वाहनां कडून टोल घेणे बंद झाले आहे.

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून दहिसर टोल नाका येथील टोलचा भुर्दंड आणि टोल नाका मुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीने त्रस्त मीरा भाईंदरच्या नागरिकांना कारचा टोल रद्द झाल्याने दिलासा मिळाला आहे . मध्यरात्री पासून हलक्या चारचाकी वाहनां कडून टोल घेणे बंद झाले आहे.

 दहिसर येथील टोल नाका मुळे मीरा भाईंदरच्या नागरिकांना तसेच मुंबईतून मीरा भाईंदर मध्ये येणाऱ्या नागरिकांना टोलचा भुर्दंड पडत होता . शिवाय येथे मोठी वाहतूक कोंडी होऊन लोकांचा वेळ आणि इंधन वाया जात होते . 

मीरा भाईंदरच्या नागरिकांना ह्या टोल मधून सुटका मिळावी म्हणून आमदार गीता जैन व आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यां पासून संबंधित मंत्री आणि शासना कडे पाठपुरावा केला होता. अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्या पासून बैठका व आंदोलनाचे इशारे देखील त्यांनी दिले होते . टोल हटवण्या बाबत विविध मुद्दे आणि पर्याय मांडले गेले असे त्यांच्या पदाधिकारी यांनी टोल बंद झाल्या नंतर   सांगितले. 

 गेल्या अनेक वर्षां पासून येथील टोल नाका विरोधात विविध राजकीय पक्ष - संघटनांनी आंदोलने केली होती . नागरिक देखील टोल वसुली सह वाहतूक कोंडी आणि वेळ - इंधन वाया जात असल्याने संतप्त होते . निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण आता चारचाकी वाहनांना टोल मधून वगळण्यात आल्याने सदर नाक्या वरून ये - जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे . 

आमदार गीता जैन व समर्थकांनी टोल नाक्यावर जाऊन वाहन चालकांना लाडू वाटून , ढोल ताशे वाजवत आनंद व्यक्त केला . गेल्या अनेक वर्षां पासूनचा टोल आणि वाहतूक कोंडीचा जाच मधून मीरा भाईंदरच्या नागरिकांची सुटका झाल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले . ज्यांनी शहराचे वाटोळे केले, विकास कामे रोखली त्यांना आता नागरिकांचा टोल माफ झाल्याने मोठी पोटदुखी झाली आहे . त्यांची मळमळ दूर करण्यासाठी जमालगोटा उपलब्ध असल्याचा टोला आ. जैन यांनी लगावला .

शासनाला केवळ दहिसर टोल नाका वरील चारचाकी वाहनांना टोल माफ करता येत नाही , निर्णय घ्यायचा तर मुंबई प्रवेशद्वारावरील सर्वच टोल नाक्यां बद्दल घ्यावा लागतो व त्यानुसार शासनाने निर्णय घेऊन सर्वच नागरिकांना दिलासा दिला आहे .  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती शासनाने नागरिकांच्या कार आदींना ना टोल मधून मुक्ती देऊन ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले . 

भाजपाचे एड रवी व्यास यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह टोल नाक्यावर लाडू वाटून घोषणाबाजी केली. मनसेचे संदीप राणे सह मनसैनिकांनी टोलनाक्यावर घोषणा दिल्या. रात्री शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर सह विक्रम प्रताप सिंह व शिवसैनिकांनी टोलनाक्यावर जल्लोष केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरdahisar-acदहिसर