शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दहिसर टोल नाका वसुली बंद झाल्याने मीरा भाईंदरमध्ये आनंद; टोलसह कोंडीतून सुटका

By धीरज परब | Updated: October 15, 2024 09:41 IST

मध्यरात्री पासून हलक्या चारचाकी वाहनां कडून टोल घेणे बंद झाले आहे.

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून दहिसर टोल नाका येथील टोलचा भुर्दंड आणि टोल नाका मुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीने त्रस्त मीरा भाईंदरच्या नागरिकांना कारचा टोल रद्द झाल्याने दिलासा मिळाला आहे . मध्यरात्री पासून हलक्या चारचाकी वाहनां कडून टोल घेणे बंद झाले आहे.

 दहिसर येथील टोल नाका मुळे मीरा भाईंदरच्या नागरिकांना तसेच मुंबईतून मीरा भाईंदर मध्ये येणाऱ्या नागरिकांना टोलचा भुर्दंड पडत होता . शिवाय येथे मोठी वाहतूक कोंडी होऊन लोकांचा वेळ आणि इंधन वाया जात होते . 

मीरा भाईंदरच्या नागरिकांना ह्या टोल मधून सुटका मिळावी म्हणून आमदार गीता जैन व आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यां पासून संबंधित मंत्री आणि शासना कडे पाठपुरावा केला होता. अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्या पासून बैठका व आंदोलनाचे इशारे देखील त्यांनी दिले होते . टोल हटवण्या बाबत विविध मुद्दे आणि पर्याय मांडले गेले असे त्यांच्या पदाधिकारी यांनी टोल बंद झाल्या नंतर   सांगितले. 

 गेल्या अनेक वर्षां पासून येथील टोल नाका विरोधात विविध राजकीय पक्ष - संघटनांनी आंदोलने केली होती . नागरिक देखील टोल वसुली सह वाहतूक कोंडी आणि वेळ - इंधन वाया जात असल्याने संतप्त होते . निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण आता चारचाकी वाहनांना टोल मधून वगळण्यात आल्याने सदर नाक्या वरून ये - जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे . 

आमदार गीता जैन व समर्थकांनी टोल नाक्यावर जाऊन वाहन चालकांना लाडू वाटून , ढोल ताशे वाजवत आनंद व्यक्त केला . गेल्या अनेक वर्षां पासूनचा टोल आणि वाहतूक कोंडीचा जाच मधून मीरा भाईंदरच्या नागरिकांची सुटका झाल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले . ज्यांनी शहराचे वाटोळे केले, विकास कामे रोखली त्यांना आता नागरिकांचा टोल माफ झाल्याने मोठी पोटदुखी झाली आहे . त्यांची मळमळ दूर करण्यासाठी जमालगोटा उपलब्ध असल्याचा टोला आ. जैन यांनी लगावला .

शासनाला केवळ दहिसर टोल नाका वरील चारचाकी वाहनांना टोल माफ करता येत नाही , निर्णय घ्यायचा तर मुंबई प्रवेशद्वारावरील सर्वच टोल नाक्यां बद्दल घ्यावा लागतो व त्यानुसार शासनाने निर्णय घेऊन सर्वच नागरिकांना दिलासा दिला आहे .  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती शासनाने नागरिकांच्या कार आदींना ना टोल मधून मुक्ती देऊन ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले . 

भाजपाचे एड रवी व्यास यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह टोल नाक्यावर लाडू वाटून घोषणाबाजी केली. मनसेचे संदीप राणे सह मनसैनिकांनी टोलनाक्यावर घोषणा दिल्या. रात्री शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर सह विक्रम प्रताप सिंह व शिवसैनिकांनी टोलनाक्यावर जल्लोष केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरdahisar-acदहिसर