शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

दहिसर टोल नाका वसुली बंद झाल्याने मीरा भाईंदरमध्ये आनंद; टोलसह कोंडीतून सुटका

By धीरज परब | Updated: October 15, 2024 09:41 IST

मध्यरात्री पासून हलक्या चारचाकी वाहनां कडून टोल घेणे बंद झाले आहे.

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून दहिसर टोल नाका येथील टोलचा भुर्दंड आणि टोल नाका मुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीने त्रस्त मीरा भाईंदरच्या नागरिकांना कारचा टोल रद्द झाल्याने दिलासा मिळाला आहे . मध्यरात्री पासून हलक्या चारचाकी वाहनां कडून टोल घेणे बंद झाले आहे.

 दहिसर येथील टोल नाका मुळे मीरा भाईंदरच्या नागरिकांना तसेच मुंबईतून मीरा भाईंदर मध्ये येणाऱ्या नागरिकांना टोलचा भुर्दंड पडत होता . शिवाय येथे मोठी वाहतूक कोंडी होऊन लोकांचा वेळ आणि इंधन वाया जात होते . 

मीरा भाईंदरच्या नागरिकांना ह्या टोल मधून सुटका मिळावी म्हणून आमदार गीता जैन व आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यां पासून संबंधित मंत्री आणि शासना कडे पाठपुरावा केला होता. अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्या पासून बैठका व आंदोलनाचे इशारे देखील त्यांनी दिले होते . टोल हटवण्या बाबत विविध मुद्दे आणि पर्याय मांडले गेले असे त्यांच्या पदाधिकारी यांनी टोल बंद झाल्या नंतर   सांगितले. 

 गेल्या अनेक वर्षां पासून येथील टोल नाका विरोधात विविध राजकीय पक्ष - संघटनांनी आंदोलने केली होती . नागरिक देखील टोल वसुली सह वाहतूक कोंडी आणि वेळ - इंधन वाया जात असल्याने संतप्त होते . निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण आता चारचाकी वाहनांना टोल मधून वगळण्यात आल्याने सदर नाक्या वरून ये - जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे . 

आमदार गीता जैन व समर्थकांनी टोल नाक्यावर जाऊन वाहन चालकांना लाडू वाटून , ढोल ताशे वाजवत आनंद व्यक्त केला . गेल्या अनेक वर्षां पासूनचा टोल आणि वाहतूक कोंडीचा जाच मधून मीरा भाईंदरच्या नागरिकांची सुटका झाल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले . ज्यांनी शहराचे वाटोळे केले, विकास कामे रोखली त्यांना आता नागरिकांचा टोल माफ झाल्याने मोठी पोटदुखी झाली आहे . त्यांची मळमळ दूर करण्यासाठी जमालगोटा उपलब्ध असल्याचा टोला आ. जैन यांनी लगावला .

शासनाला केवळ दहिसर टोल नाका वरील चारचाकी वाहनांना टोल माफ करता येत नाही , निर्णय घ्यायचा तर मुंबई प्रवेशद्वारावरील सर्वच टोल नाक्यां बद्दल घ्यावा लागतो व त्यानुसार शासनाने निर्णय घेऊन सर्वच नागरिकांना दिलासा दिला आहे .  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती शासनाने नागरिकांच्या कार आदींना ना टोल मधून मुक्ती देऊन ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले . 

भाजपाचे एड रवी व्यास यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह टोल नाक्यावर लाडू वाटून घोषणाबाजी केली. मनसेचे संदीप राणे सह मनसैनिकांनी टोलनाक्यावर घोषणा दिल्या. रात्री शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर सह विक्रम प्रताप सिंह व शिवसैनिकांनी टोलनाक्यावर जल्लोष केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरdahisar-acदहिसर