शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सरपंच ते खासदारकीचा प्रवास, राष्ट्रवादीपासून झाली कारकिर्दीस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:22 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. कपिल पाटील यांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने त्यांना राजकीय वारसा आपल्या वडिलांपासून लाभला. याची चुणूक त्यांनी कॉलेज जीवनातदेखील निवडणूक लढवून दाखवली होती. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खरी सुरुवात सन १९८८ पासून झाली.कपिल पाटील हे १९८८ साली प्रथम दिवे-अंजूर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंच झाले. चार वर्षे ते सरपंच होते. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी घेऊन सन १९९२ मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवली. सन २००२ मध्ये काल्हेर-अंजूर गटातून निवडणूक लढवून ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. या सर्व निवडणुका त्यांनी राष्ट्रवादी पक्षातर्फे लढवल्याने ते ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. २००५-०७ दरम्यान उपाध्यक्ष असताना त्यांनी शिक्षण विभागात आपला ठसा उमटवला आणि याच काळात त्यांच्यातील उत्तम वक्ता घडला. त्यानंतर, २००९ मध्ये ते ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. हीच कारकीर्द त्यांना खासदारकीच्या निवडणुकीत यश देण्यास कारणीभूत ठरली. त्यातच, ते काही वर्षे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन होते. मात्र, २०१४ मध्ये जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचे वारे पाहून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली आणि मोदीलाटेचा फायदा घेत निवडून आले. कार्यकर्त्यांची टीम आणि विकासकामांचा पाठपुरावा करण्याची धमक ठेवत त्यांनी आपली प्रतिमा बनवली.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाविरोधात वातावरण असताना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा विश्वास संपादन करून त्यांनी अभूतपूर्व विजय मिळवला.>भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पाऊलभिवंडी लोकसभा क्षेत्रातील खाजगी व सार्वजनिक वाहतुकीसाठी तसेच प्रवासी वाहतुकीसाठी प्रयत्नशील असून त्यासाठी विविध उपाययोजना व उपक्रम हाती घेतले आहेत.खासदार होताच त्यांनी भिवंडीतील उड्डाणपुलांना चालना दिली. तर, एमएमआरडीएच्या माध्यमांतून शहरात ५२ आरसीसी रस्ते बनवून महानगरपालिकेचा भार हलका केला. जकात बंद झाल्याने पालिका डबघाईला आली असताना शहरातील मागरिकांना सोयीसुविधा मिळण्यासाठी डांबरी रस्त्यांऐवजी आरसीसी रस्ते बनवले. त्यामुळे पालिकेच्या खर्चात करोडो रूपयांची बचत झाली आहे.>शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल : साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या सर्वांतून समाजाची अभिरुची घडत असते आणि सुसंस्कृत समाज तयार होत असतो, त्यासाठी त्यांनी मतदारसंघातील उत्सवांना पुढाकार देऊन या उत्सवांना भेटी देत त्यांचा उत्साह वाढवला. कल्याण पश्चिममध्ये त्यांनी दिवाळी पहाट हा कार्यक्रम सन २०१४ पासून सुरू केला. तर, भिवंडीसह मतदारसंघातील साजºया होणाºया शिवजयंती उत्सवांना आवर्जून भेटी दिल्या. उत्सव ही परंपरा मानत त्यांनी सर्व जातीधर्मांच्या उत्सवांना प्रोत्साहन दिले.>लोकसेवेचा वसा :वडिलांकडून मिळवलेला लोकसेवेचा वसा ग्रामपंचायतीपासून ते खासदार बनण्यापर्यंत कायम ठेवला असून भिवंडी लोकसभा मतदारसंघाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा वसा त्यांनी अंगीकारला आहे. त्यामधून पॉवरलूम, गोदामहब अद्ययावत सरकारी रूग्णालये आणि इतर सोयींकडे त्यांचे जास्त लक्ष असून ते त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यामधून मोठा रोजगार या मतदारसंघात निर्माण होणार आहे.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९