शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

आव्हाडच सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे, आनंद परांजपे यांची टीका

By अजित मांडके | Updated: April 8, 2024 14:34 IST

Lok Sabha Election 2024 : रविवारी आव्हाडांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी सोमवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेत प्रतिहल्ला चढविला आहे.

ठाणे :  सूयार्जी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर केली होती. त्याला अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर करीत जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले असल्याचा आरोप केला आहे.

रविवारी आव्हाडांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी सोमवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेत प्रतिहल्ला चढविला आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करीत असल्याचे सांगत, शरद पवारांना त्यांनी विचारावे की २०१४ चा निकाल येण्याआधीच भाजपाला बिनशर्थ पाठिंबा द्यायला कोणी सांगितला? पहाटेचा शपथविधी कोणाच्या आर्शिवादाने झाला, राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठविली गेली, २०२२ मध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होत असल्याने त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या हे सगळे प्रश्न आव्हाडांनी शरद पवारांना विचारावे असा सल्लाही त्यांनी दिला.  

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर अजित पवार, सुनील तटकरे आणि भुजबळ यांचे मोठे योगदान होते, असेही ते म्हणाले. त्यातही भाऊ बहिणीच्या नात्यावर आव्हाड यांनी बोलू नये, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची फक्त राजकीय भूमिका वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्यावर आव्हाड यांनी न बोललेच बरे असा सल्लाही परांजपे यांनी दिला. आव्हाड यांना आधी मी इतिहासकार किंवा डॉक्टर म्हणायचे पण त्यांना आता नकलाकार म्हणण्याची वेळ आली असल्याची टीकाही त्यांनी केली. 

गणेश नाईक आणि वसंत डावखरे यांचा कायम आव्हाड यांनी दुस्वास केला. शरद पवार यांना कायम खोटे नाटे सांगण्याचे काम आव्हाड यांनी केले. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी संपविण्याचे मोठे कामही त्यांनी केले असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. एकनाथ खडसे हे आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांना विचारले का? साहेबांनी आपल्याला काय कमी केले होते. भिवंडीची जागा हट्टापाई घेतली असून आता त्या जागेवर आपला उमेदवार कसा निवडून येईल याची काळजी आव्हाड यांनी करावी, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी सदिच्छाही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthane-pcठाणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४