शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

एसी लोकल लादल्यास लढा आणखी तीव्र करू, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 08:53 IST

AC Local: एसी लोकलविरोधात नुकतीच झालेली आंदोलने ही प्रवाशांच्या मनातील खदखद आहे. रेल्वेने ती गांभीर्याने समजून घ्यावी, नाहीतर शेकडो प्रवाशांचे आंदोलन हजारो प्रवाशांत रूपांतरित होऊ शकते, असा इशारा माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला.

ठाणे : एसी लोकलचे तिकीट भरमसाठ आहे. साध्या लोकलने प्रवास करणाऱ्यांना ते परवडू शकत नाही. एसी लोकलविरोधात नुकतीच झालेली आंदोलने ही प्रवाशांच्या मनातील खदखद आहे. रेल्वेने ती गांभीर्याने समजून घ्यावी, नाहीतर शेकडो प्रवाशांचे आंदोलन हजारो प्रवाशांत रूपांतरित होऊ शकते, असा इशारा माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला. प्रवाशांच्या प्रश्नावर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीला दांडी यात्रेप्रमाणे रेल मार्च काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

गर्दीच्यावेळी साध्या लोकमलमध्ये सुमारे सहा हजार प्रवासी असतात. मात्र तेवढे प्रवाशी नेण्याची एसी लोकलची क्षमता नाही. तेवढे प्रवासी एसीत शिरले, तर ते गुदमरण्याची भीती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गर्दीच्या वेळी एसी लोकल चालवू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर त्यांनी संवाद साधला. संतप्त प्रवासी एक दिवस चालत रेल्वे ट्रॅकवरून जातील. तेव्हा काय कराल? असा सवालही त्यांनी केला. 

उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनीही प्रवाशांवर लादलेल्या एसी लोकल बंद करण्याची मागणी केली. मुंब्रा प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी ए. आर. पठाण यांनी मुंब्रा आणि कळव्यामध्ये सेमी फास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांच्यासह प्रवाशांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या.

दाेनशे रुपये दिवसाला कसे परवडणार? कोरोना काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या प्रवाशांना एसी लाेकलचे एका दिवसाचे दोनशे रुपयांचे तिकीट कसे परवडेल? एसीच्या एका लोकलमधून केवळ ६००, तर साध्या ट्रेनमधून सहा हजार प्रवासी प्रवास करतात. साध्या लोकलचा पास दोनशे, तर एसीचा महिन्याचा पास १ हजार ८०० रुपये हे कसे परवडणार, असा सवालही आव्हाड यांच्यासह प्रवाशांनी केला 

आवाजाविरोधात नोटीस द्या पारसिकच्या बोगद्यातून पूर्वी मेल-एक्स्प्रेस जात होत्या. त्यांना तो मार्ग राखून ठेवलेला असताना त्या लोकलच्या मार्गावरूनच नेल्या जातात. त्यामुळे लोकलचा खोळंबा होतो. शिवाय त्यांचा आवाज १७५ डेसिबल्सपेक्षा अधिक आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रात्री १० नंतर ४५ डेसिबलपेक्षा अधिकआवाज नको. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्याकडे तक्रार करीत रेल्वेला याबाबत नोटीस बजावण्याचा आग्रह त्यांनी रेल्वे प्रवाशांसमोर धरला.

टॅग्स :AC localएसी लोकलMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे