शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

एसी लोकल लादल्यास लढा आणखी तीव्र करू, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 08:53 IST

AC Local: एसी लोकलविरोधात नुकतीच झालेली आंदोलने ही प्रवाशांच्या मनातील खदखद आहे. रेल्वेने ती गांभीर्याने समजून घ्यावी, नाहीतर शेकडो प्रवाशांचे आंदोलन हजारो प्रवाशांत रूपांतरित होऊ शकते, असा इशारा माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला.

ठाणे : एसी लोकलचे तिकीट भरमसाठ आहे. साध्या लोकलने प्रवास करणाऱ्यांना ते परवडू शकत नाही. एसी लोकलविरोधात नुकतीच झालेली आंदोलने ही प्रवाशांच्या मनातील खदखद आहे. रेल्वेने ती गांभीर्याने समजून घ्यावी, नाहीतर शेकडो प्रवाशांचे आंदोलन हजारो प्रवाशांत रूपांतरित होऊ शकते, असा इशारा माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला. प्रवाशांच्या प्रश्नावर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीला दांडी यात्रेप्रमाणे रेल मार्च काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

गर्दीच्यावेळी साध्या लोकमलमध्ये सुमारे सहा हजार प्रवासी असतात. मात्र तेवढे प्रवाशी नेण्याची एसी लोकलची क्षमता नाही. तेवढे प्रवासी एसीत शिरले, तर ते गुदमरण्याची भीती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गर्दीच्या वेळी एसी लोकल चालवू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर त्यांनी संवाद साधला. संतप्त प्रवासी एक दिवस चालत रेल्वे ट्रॅकवरून जातील. तेव्हा काय कराल? असा सवालही त्यांनी केला. 

उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनीही प्रवाशांवर लादलेल्या एसी लोकल बंद करण्याची मागणी केली. मुंब्रा प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी ए. आर. पठाण यांनी मुंब्रा आणि कळव्यामध्ये सेमी फास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांच्यासह प्रवाशांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या.

दाेनशे रुपये दिवसाला कसे परवडणार? कोरोना काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या प्रवाशांना एसी लाेकलचे एका दिवसाचे दोनशे रुपयांचे तिकीट कसे परवडेल? एसीच्या एका लोकलमधून केवळ ६००, तर साध्या ट्रेनमधून सहा हजार प्रवासी प्रवास करतात. साध्या लोकलचा पास दोनशे, तर एसीचा महिन्याचा पास १ हजार ८०० रुपये हे कसे परवडणार, असा सवालही आव्हाड यांच्यासह प्रवाशांनी केला 

आवाजाविरोधात नोटीस द्या पारसिकच्या बोगद्यातून पूर्वी मेल-एक्स्प्रेस जात होत्या. त्यांना तो मार्ग राखून ठेवलेला असताना त्या लोकलच्या मार्गावरूनच नेल्या जातात. त्यामुळे लोकलचा खोळंबा होतो. शिवाय त्यांचा आवाज १७५ डेसिबल्सपेक्षा अधिक आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रात्री १० नंतर ४५ डेसिबलपेक्षा अधिकआवाज नको. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्याकडे तक्रार करीत रेल्वेला याबाबत नोटीस बजावण्याचा आग्रह त्यांनी रेल्वे प्रवाशांसमोर धरला.

टॅग्स :AC localएसी लोकलMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे