शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आजूबाजूचे लोक अजित पवारांकडे जातील याची जितेंद्र आव्हाडांना भीती - आनंद परांजपे

By अजित मांडके | Updated: March 5, 2024 15:22 IST

आव्हाड यांना भीती वाटतेय की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने जाऊ नये, आनंद परांजपे यांची टीका

ठाणे -  जितेंद्र आव्हाड यांना भीती वाटतेय. की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने जाईल. यामुळेच ते वाटेल ते बोलत सुटलेत.आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या केसेस, किडनॅपिंगच्या केसेस, ३०७ ची केस, अशावेळी आव्हाड हे कुठल्या नैतीकतेचे उपदेश देतात ? आम्हीही यावर बोलायचे का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांचे भर अधिवेशनात धिंडवडे काढले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अजित पवार  हे आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. महायुतीचे ४५ प्लस उमेदवार विजयी होतील ठाणे जिल्ह्यातील तिनही लोकसभेचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असे सडेतोड फटकारे ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ओढले.

कळवा विधानसभा मतदारसंघात पण मतदार त्यांना फार सिरियसली घेत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव, पक्षाचे घड्याळ हे चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. यामुळे आव्हाड यांना अजित पवार यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? असा सवालहि त्यांनी केला.  ज्या सनातन संस्थेवर बंदी आणा आणि ज्या सनातन संस्थेबद्दल कायम  आव्हाड बोलत असतात त्या संस्थेच्या कार्यक्रमाला ते गेले होते आणि जिथे प्रभू श्रीरामाचे कथा होती तिथे त्यांनी तुतारी वादन केले ! रायगडावर त्यांनीखरीच तुतारी वाजवली की खोटी तुतारी वाजवली मला माहित नाही. पण ज्या कार्यक्रमात सामाजिक आणि धार्मिक व्यासपीठ होते त्या कार्यक्रमांमध्ये जाऊन त्यांनी तुतारी वाजवली. त्यांनी जर तिथे जाऊन बोलण्याची हिम्मत, धारिष्ट दाखवले असते की  प्रभू श्रीराम मांसाहारी होते ! मग यावर तिथून काय प्रतिक्रिया रामभक्तांकडून आली असती ? असा सवाल त्यांनी विचारला. 

कळव्याच्या मतदारसंघांमधून... ते त्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहित पडले असते ! आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे ज्या निवडणुकीत महायुतीमध्ये लढू. जिथे तिथे लोकसभेला घड्याळ चिन्ह घेऊन आमचे उमेदवार असतील तिथे आम्ही घड्याळाचा प्रचार करू. जास्तीत जास्त मतांनी आमचे लोकसभेचे उमेदवार जिंकतील. भाजपचे केंद्रीय शिर्ष नेतृत्व, शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व राष्ट्रवादी काँग्रेसकडून  राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित  पवार हे महायुतीचे नेते चर्चेला एकत्र बसतील तेव्हा महायुतीचा फॉर्मुला डिक्लेअर होईल. याबाबतचा योग्य ते निर्णय महायुतीचे नेते घेतील. खेळीमेळीच्या वातावरणात सीट वाटप होईल. महायुतीचे उमेदवार ४५ प्लस विजयी झालेले असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड