शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आजूबाजूचे लोक अजित पवारांकडे जातील याची जितेंद्र आव्हाडांना भीती - आनंद परांजपे

By अजित मांडके | Updated: March 5, 2024 15:22 IST

आव्हाड यांना भीती वाटतेय की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने जाऊ नये, आनंद परांजपे यांची टीका

ठाणे -  जितेंद्र आव्हाड यांना भीती वाटतेय. की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने जाईल. यामुळेच ते वाटेल ते बोलत सुटलेत.आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या केसेस, किडनॅपिंगच्या केसेस, ३०७ ची केस, अशावेळी आव्हाड हे कुठल्या नैतीकतेचे उपदेश देतात ? आम्हीही यावर बोलायचे का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांचे भर अधिवेशनात धिंडवडे काढले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अजित पवार  हे आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. महायुतीचे ४५ प्लस उमेदवार विजयी होतील ठाणे जिल्ह्यातील तिनही लोकसभेचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असे सडेतोड फटकारे ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ओढले.

कळवा विधानसभा मतदारसंघात पण मतदार त्यांना फार सिरियसली घेत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव, पक्षाचे घड्याळ हे चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. यामुळे आव्हाड यांना अजित पवार यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? असा सवालहि त्यांनी केला.  ज्या सनातन संस्थेवर बंदी आणा आणि ज्या सनातन संस्थेबद्दल कायम  आव्हाड बोलत असतात त्या संस्थेच्या कार्यक्रमाला ते गेले होते आणि जिथे प्रभू श्रीरामाचे कथा होती तिथे त्यांनी तुतारी वादन केले ! रायगडावर त्यांनीखरीच तुतारी वाजवली की खोटी तुतारी वाजवली मला माहित नाही. पण ज्या कार्यक्रमात सामाजिक आणि धार्मिक व्यासपीठ होते त्या कार्यक्रमांमध्ये जाऊन त्यांनी तुतारी वाजवली. त्यांनी जर तिथे जाऊन बोलण्याची हिम्मत, धारिष्ट दाखवले असते की  प्रभू श्रीराम मांसाहारी होते ! मग यावर तिथून काय प्रतिक्रिया रामभक्तांकडून आली असती ? असा सवाल त्यांनी विचारला. 

कळव्याच्या मतदारसंघांमधून... ते त्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहित पडले असते ! आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे ज्या निवडणुकीत महायुतीमध्ये लढू. जिथे तिथे लोकसभेला घड्याळ चिन्ह घेऊन आमचे उमेदवार असतील तिथे आम्ही घड्याळाचा प्रचार करू. जास्तीत जास्त मतांनी आमचे लोकसभेचे उमेदवार जिंकतील. भाजपचे केंद्रीय शिर्ष नेतृत्व, शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व राष्ट्रवादी काँग्रेसकडून  राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित  पवार हे महायुतीचे नेते चर्चेला एकत्र बसतील तेव्हा महायुतीचा फॉर्मुला डिक्लेअर होईल. याबाबतचा योग्य ते निर्णय महायुतीचे नेते घेतील. खेळीमेळीच्या वातावरणात सीट वाटप होईल. महायुतीचे उमेदवार ४५ प्लस विजयी झालेले असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड