शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला सुरतकडून घेतला जातोय, जितेंद्र आव्हाड यांची टीका

By अजित मांडके | Updated: October 27, 2023 16:23 IST

गेली अनेक वर्षे मुंबईत असलेला हा हिरे बाजार स्थलांतरित करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. 

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली होती. या स्वारीत सुरतकडून मोठी लूट करून स्वराज्य उभे केले होते. त्याचा बदला आता घेतला जात आहे. या बदल्याचा एक भाग म्हणूनच मुंबईतील हिरे बाजार सुरतला नेण्यात आला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईतील हिरे बाजार सुरतला स्थलांतरित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे मुंबईत असलेला हा हिरे बाजार स्थलांतरित करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. 

आव्हाड म्हणाले की, जगभरातील प्रमुख हिरे बाजारात मुंबईतील हिरे बाजाराचा समावेश होत आहे. पण, आता हा हिरेबाजार आता सुरतला नेण्यात आला आहे. केवळ हिरेबाजारच नव्हे तर अनेक बड्या संस्था आणि मुंबईत येऊ घातलेले उद्योग गुजरातला पळविण्यात येत आहेत. या मागील मूळ कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर केलेली स्वारी हेच मुख्य कारण आहे. १६६४मध्ये मोगल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून शाहिस्तेखान याने पुण्यात येऊन केलेल्या लुटीची सव्याज वसुली केली होती. याचा राग आजही काही गुजरात्यांच्या मनात आहे. सुरतेवरील या स्वारीचा वचपा काढण्यासाठीच आज महाराष्ट्र, मुंबईतील उद्योग, व्यापार केंद्र सुरतला नेले जात आहेत.  एकूणच सुरतच्या स्वारीमागे शिवरायांचा बदला घेऊन मुंबईचे आंतराष्ट्रीय पातळीवरील महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आपण हे सर्व सहन करत आहोत, हे दुर्देवी आहे, अशी टीकाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

दरम्यान,  कतारमध्ये आठ माजी नौसैनिकांना ईस्रायालसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून फाशी दिली जाणार आहे. मूळात या संदर्भात खटला सुरू आहे, याची माहितीच देशाला परराष्ट्र मंत्रालयाने दिली नव्हती. इस्रायलची  मोसाद गुप्तहेर संघटना ही जगातील सर्वोत्तम गुप्तहेर संघटना आहे. अशा स्थितीत भारतीय इस्रायलसाठी हेरगिरी करतील, हे अनाकलनीय आहे. पण, आपला आंतराष्ट्रीय पातळीवरील दबदबा आहे, अशी आवई उठविणाऱ्यांनी त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  त्या आठ जणांना फासावर चढवल्याने त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर पडणार आहे, याची जाणीव ठेऊन त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन आव्हाड  यांनी केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड