शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला सुरतकडून घेतला जातोय, जितेंद्र आव्हाड यांची टीका

By अजित मांडके | Updated: October 27, 2023 16:23 IST

गेली अनेक वर्षे मुंबईत असलेला हा हिरे बाजार स्थलांतरित करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. 

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली होती. या स्वारीत सुरतकडून मोठी लूट करून स्वराज्य उभे केले होते. त्याचा बदला आता घेतला जात आहे. या बदल्याचा एक भाग म्हणूनच मुंबईतील हिरे बाजार सुरतला नेण्यात आला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईतील हिरे बाजार सुरतला स्थलांतरित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे मुंबईत असलेला हा हिरे बाजार स्थलांतरित करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. 

आव्हाड म्हणाले की, जगभरातील प्रमुख हिरे बाजारात मुंबईतील हिरे बाजाराचा समावेश होत आहे. पण, आता हा हिरेबाजार आता सुरतला नेण्यात आला आहे. केवळ हिरेबाजारच नव्हे तर अनेक बड्या संस्था आणि मुंबईत येऊ घातलेले उद्योग गुजरातला पळविण्यात येत आहेत. या मागील मूळ कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर केलेली स्वारी हेच मुख्य कारण आहे. १६६४मध्ये मोगल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून शाहिस्तेखान याने पुण्यात येऊन केलेल्या लुटीची सव्याज वसुली केली होती. याचा राग आजही काही गुजरात्यांच्या मनात आहे. सुरतेवरील या स्वारीचा वचपा काढण्यासाठीच आज महाराष्ट्र, मुंबईतील उद्योग, व्यापार केंद्र सुरतला नेले जात आहेत.  एकूणच सुरतच्या स्वारीमागे शिवरायांचा बदला घेऊन मुंबईचे आंतराष्ट्रीय पातळीवरील महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आपण हे सर्व सहन करत आहोत, हे दुर्देवी आहे, अशी टीकाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

दरम्यान,  कतारमध्ये आठ माजी नौसैनिकांना ईस्रायालसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून फाशी दिली जाणार आहे. मूळात या संदर्भात खटला सुरू आहे, याची माहितीच देशाला परराष्ट्र मंत्रालयाने दिली नव्हती. इस्रायलची  मोसाद गुप्तहेर संघटना ही जगातील सर्वोत्तम गुप्तहेर संघटना आहे. अशा स्थितीत भारतीय इस्रायलसाठी हेरगिरी करतील, हे अनाकलनीय आहे. पण, आपला आंतराष्ट्रीय पातळीवरील दबदबा आहे, अशी आवई उठविणाऱ्यांनी त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  त्या आठ जणांना फासावर चढवल्याने त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर पडणार आहे, याची जाणीव ठेऊन त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन आव्हाड  यांनी केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड