शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आगामी सर्वच निवडणुका एकत्रित लढणार, जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यात घोषणा

By अजित मांडके | Updated: October 4, 2023 16:34 IST

येत्या काळात ठाणे महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा फडकवायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आगामी सर्व निवडणुका एकत्रच लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात केली. तसेच या जिल्ह्यात मविआ मध्ये  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मोठा भाऊ आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणे महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा फडकवायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आव्हाड यांनी ही घोषणा केली.  लवकरच ठाण्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थितीत राहतील असा दावाही त्यांनी केला आहे.   येत्या वर्षभरात महाविकास आघाडीचे आम्ही सर्व प्रमुख नेते संपूर्ण जिल्ह्यात फिरून प्रचार करणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीन ही जागांवर महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्याला निवडून आणू अशी ग्वाही  ही त्यांनी दिली. केवळ लोकसभाच नाही तर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही तीन ही पक्ष महाविकास आघाडी म्हूणन सामोरे जाऊ.

ठाणे जिल्ह्यात जिंकायचे असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा आम्हाला खांद्यावर घ्यावाच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत ठाणे महापालिकेवर  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला फडकावयाचा आहे. त्यानुसार सर्वांनी कामाला लागले पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली. सध्या लोकसभा निवडणुकीचा जो सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत इंडिया आघाडीवर असून देशातील लोकांची मानसिकता बदलायला लागली आहे. असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे शहरअध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थितीत होते.

त्या वाघ नखांचा शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नाही

महाराष्ट्रात जी वाघ नखे आणली जात आहेत, त्या वाघ नखांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नसल्याची माहिती यावेळी आव्हाड यांनी दिली. जेथून ही वाघ नखे आणली जात आहेत, त्याच ठिकाणात तसा उल्लेख करुन ठेवला असल्याचाही दाखला त्यांनी यावेळी दिला. बिहारमध्ये ज्या पध्दतीने जात निहाय सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात देखील राज्य सरकारने तो जाहीर करावा असे आव्हान आव्हाड यांनी सरकाराला दिले.

होऊ द्या चर्चा अभियान ठाण्यात बंद करण्याचा घाट, राजन विचारे यांचा गंभीर आरोप

१ ऑक्टोबर पासून ठाण्यात विविध भागात होऊ द्या चर्चा हे अभियान सुरु करण्यात आले आहे. परंतु पोलिसांनी वाहतुक कोंडी होते म्हणून नोटीस बजावली आहे. तसेच हे अभियान थांबविण्यास सांगितले आहे. परंतु मिंधे सरकाराच्या माध्यमातून हे अभियानच ठाण्यात बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. दुसरीकडे अशा पध्दतीने जरी पोलिसांनी वटहुकम काढला असेल तरी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आता मोठ्या संख्येने गर्दी करुन हे अभियान यशस्वी करुन दाखवावे असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना केले. तसेच यापुढे साधी एनसी जरी दाखल झाली तरी त्याच्याविरोधात तीनही पक्ष एकत्रित पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे