शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

आगामी सर्वच निवडणुका एकत्रित लढणार, जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यात घोषणा

By अजित मांडके | Updated: October 4, 2023 16:34 IST

येत्या काळात ठाणे महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा फडकवायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आगामी सर्व निवडणुका एकत्रच लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात केली. तसेच या जिल्ह्यात मविआ मध्ये  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मोठा भाऊ आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणे महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा फडकवायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आव्हाड यांनी ही घोषणा केली.  लवकरच ठाण्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थितीत राहतील असा दावाही त्यांनी केला आहे.   येत्या वर्षभरात महाविकास आघाडीचे आम्ही सर्व प्रमुख नेते संपूर्ण जिल्ह्यात फिरून प्रचार करणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीन ही जागांवर महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्याला निवडून आणू अशी ग्वाही  ही त्यांनी दिली. केवळ लोकसभाच नाही तर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही तीन ही पक्ष महाविकास आघाडी म्हूणन सामोरे जाऊ.

ठाणे जिल्ह्यात जिंकायचे असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा आम्हाला खांद्यावर घ्यावाच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत ठाणे महापालिकेवर  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला फडकावयाचा आहे. त्यानुसार सर्वांनी कामाला लागले पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली. सध्या लोकसभा निवडणुकीचा जो सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत इंडिया आघाडीवर असून देशातील लोकांची मानसिकता बदलायला लागली आहे. असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे शहरअध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थितीत होते.

त्या वाघ नखांचा शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नाही

महाराष्ट्रात जी वाघ नखे आणली जात आहेत, त्या वाघ नखांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नसल्याची माहिती यावेळी आव्हाड यांनी दिली. जेथून ही वाघ नखे आणली जात आहेत, त्याच ठिकाणात तसा उल्लेख करुन ठेवला असल्याचाही दाखला त्यांनी यावेळी दिला. बिहारमध्ये ज्या पध्दतीने जात निहाय सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात देखील राज्य सरकारने तो जाहीर करावा असे आव्हान आव्हाड यांनी सरकाराला दिले.

होऊ द्या चर्चा अभियान ठाण्यात बंद करण्याचा घाट, राजन विचारे यांचा गंभीर आरोप

१ ऑक्टोबर पासून ठाण्यात विविध भागात होऊ द्या चर्चा हे अभियान सुरु करण्यात आले आहे. परंतु पोलिसांनी वाहतुक कोंडी होते म्हणून नोटीस बजावली आहे. तसेच हे अभियान थांबविण्यास सांगितले आहे. परंतु मिंधे सरकाराच्या माध्यमातून हे अभियानच ठाण्यात बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. दुसरीकडे अशा पध्दतीने जरी पोलिसांनी वटहुकम काढला असेल तरी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आता मोठ्या संख्येने गर्दी करुन हे अभियान यशस्वी करुन दाखवावे असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना केले. तसेच यापुढे साधी एनसी जरी दाखल झाली तरी त्याच्याविरोधात तीनही पक्ष एकत्रित पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे