शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स कारखान्यांना मंगळवारी दिलासा?अंबरनाथ, बदलापूरचे एक हजार रासायनिक कारखाने लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:46 IST

वारंवार सूचना देऊनही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास तयार न झालेल्या जीन्स कारखान्यांनी प्रक्रियेची हमी द्यावी आणि कारखान्यांवर आलेली बंदी टाळावी, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी मंगळवारी पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे.

उल्हासनगर : वारंवार सूचना देऊनही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास तयार न झालेल्या जीन्स कारखान्यांनी प्रक्रियेची हमी द्यावी आणि कारखान्यांवर आलेली बंदी टाळावी, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी मंगळवारी पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आमच्यामुळे अवघे दोन टक्के प्रदूषण होते. उरलेले प्रदूषण अंबरनाथ, बदलापूरचे रासायनिक कारखाने करतात, असा दावा जीन्स कारखान्यांनी केल्याने राष्ट्रीय हरित लवादापुढे सोमवारी होणाºया सुनावणीत या कारखान्यांवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत.जीन्स कारखाने बंद न करता तोडगा काढावा, यासाठी वेगवेगळे दबावगट कामाला लागले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर यांनी शुक्रवारी चालीया हॉलमध्ये कारखानदारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक होणार आहे. डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यांना ज्याप्रमाणे प्रक्रिया न केलेले पाणी न सोडता उद्योग सुरू ठेवण्यास मुभा मिळाली, तसा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. रासायनिक कारखान्यांबाबत सुनावणी सोमवारी असल्याची माहिती वनशक्तीचे अश्विन अघोर यांनी दिली.उल्हास आणि वालधुनी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गाजतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने वालधुनी नदी प्रदूषित करणाºया जीन्स कारखान्यांचे वीज व पाणी तोडण्याचे आदेश पालिकेसह वीज मंडळाला दिले. ती तोडण्यापूर्वीच शुक्रवारपासून कारखानदारांनी बंद पाळला. त्यानंतर त्यांनी खासदार, आमदारांकडे भूमिका मांडली. त्यात जीन्समुळे वालधुनी नदीचे फक्त दोन टक्के पाणी प्रदूषित होत असल्याचा दावा केला आणि एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांना जबाबदार धरले. त्यामुळे मंत्रालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कारखानदारांची बैठक घेत तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कारखाने बंद असल्याने अजून त्यांचे वीज-पाणी तोडलेले नाही. मंगळवारच्या बैठकीतील निर्णयानंतर ते तोडले जाणार आहे. मात्र ते न तोडल्यास पालिका, वीज वितरण कंपनीला हरित लवादाच्या अवमानाला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत.अंबरनाथ आणि बदलापुर एमआयडीसीतील रासायनिक कारखाने अतीविषारी रंगहीन सांडपाणी थेट नाल्यात सोडत आहेत. ते पाणी वालधुनी नदीला मिळते. त्यामुळे नदी सर्वाधिक प्रदूषित झाल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत मांडण्यात आला. ही सुनावणी आता हरित लवादापुढे घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावर सोमवारी निर्णय होणार असल्याची माहिती वनशक्ती संस्थेचे पदाधिकारी अश्विनी अघोर यांनी दिली.बेकार झालेल्या कामगारांच्या आडून जीन्स उद्योग वाचवण्याचा प्रयत्नमहापालिका आणि वीज वितरण कंपनीने पाणी आणि वीज तोडण्यापूर्वीच जीन्स कारखानदारांनी बंद पाळला आहे. त्यामुळे कारखान्यांवर अवलंबून असलेले हजारो कामगार बेकार झाले आहेत.त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांच्या कुटुंबांचे भांडवल करून जीन्स उद्योग वाचवण्याचा कारखानदारांचा प्रयत्न आहे.त्यामुळे पर्यायी जागेची मागणी, केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एफटीपी प्लान्ट उभारण्याचा मुद्दा ते मंगळवारच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :thaneठाणे