शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जांभूळ गाव हा विकासाचा आदर्श पॅटर्न- किसन कथोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 23:49 IST

ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांनी हातात हात घालून चांगल्या योजना हाती घेतल्या आणि त्याला ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्यावर गावाचा कसा चांगला विकास होऊ शकतो,

बदलापूर : ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांनी हातात हात घालून चांगल्या योजना हाती घेतल्या आणि त्याला ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्यावर गावाचा कसा चांगला विकास होऊ शकतो, याचा ‘आदर्श पॅटर्न’ म्हणजे जांभूळ गाव. त्यात सुभाष पिसाळ यांच्यासारख्या विकासाची दृष्टी ठेवून कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन लाभल्यावर गावात चांगला इतिहास घडू शकतो, हे आजच्या या विकासकामाच्या धडाक्याने सिद्ध केले, असे गौरवोद्गार आमदार किसन कथोरे यांनी काढले.तालुक्यातील जांभूळ गावात चौदाव्या वित्त योजनेंतर्गत आदिवासी समाजासाठी उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयाचे उद्घाटन, जिल्हा क्रीडा विभागांतर्गत कबड्डीपटूंसाठी जिल्ह्यातील पहिले मॅट क्र ीडांगण, ग्रामपंचायत ग्रामनिधीमधून आगरी, बौद्ध, आदिवासी, मराठा आदी समाजबांधवांसाठी भांडी व साहित्यवाटप असे विविध कार्यक्र म शनिवारी रात्री कथोरे यांच्या उपस्थितीमध्ये झाले.जांभूळ गावाचे सॅटेलाइटमार्फत सर्वेक्षण करून घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते झाल्यावर गावातील प्रत्येक ग्रामस्थांना अद्ययावत मोजणी झालेले प्रॉपर्टीकार्ड देण्यात येईल. त्यामुळे भविष्यात या गावात जमिनीच्या हद्दीवरून भांडणे होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असा विश्वास कथोरे यांनी व्यक्तकेला.भविष्यात पाण्यावरून भांडणे होण्याची शक्यता लक्षात घेऊन जांभूळ गावात पंतप्रधान जलजीवन मिशनअंतर्गत जलकुंभ उभारण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. जांभूळ गावाचा समावेश अंबरनाथ तालुक्यात लवकरच होईल, मात्र पालिकेत त्याचा समावेश न होता भविष्यात महापालिका होईल, त्यावेळी मात्र जांभूळचा समावेश महापालिकेत होईल. जांभूळ गावाला कबड्डीपटूंचा फार मोठा इतिहास आहे. तसाच इतिहास घडला आहे. ठाणे जिल्ह्यातील कबड्डीचे पहिले मॅटचे क्रीडांगण गावाला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.।सरकार बदलले तरी माणसांनी बदलू नये : सरकार बदलले तरी माणसे बदलू नये. जांभूळ गाव हे विकासाच्या धाग्याने एकत्र बांधले गेले आहे. या विकासकामांमुळेच जांभूळ गावात एकोपा, शांती, सुबत्ता नांदत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पिसाळ यांनी सांगितले. सरपंच नरेश गायकवाड, उपसरपंच परीक्षित पिसाळ, माजी सरपंच अर्चना राणे, ग्रामसेवक बाळू कोकणे, पोलीस पाटील दत्ता सावंत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भगवान पिसाळ, चंद्रकांत पिसाळ, काशिनाथ आयरेकर, लक्ष्मणबुवा जाधव आदी उपस्थित होते.