शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

जांभूळ गाव हा विकासाचा आदर्श पॅटर्न- किसन कथोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 23:49 IST

ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांनी हातात हात घालून चांगल्या योजना हाती घेतल्या आणि त्याला ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्यावर गावाचा कसा चांगला विकास होऊ शकतो,

बदलापूर : ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांनी हातात हात घालून चांगल्या योजना हाती घेतल्या आणि त्याला ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्यावर गावाचा कसा चांगला विकास होऊ शकतो, याचा ‘आदर्श पॅटर्न’ म्हणजे जांभूळ गाव. त्यात सुभाष पिसाळ यांच्यासारख्या विकासाची दृष्टी ठेवून कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन लाभल्यावर गावात चांगला इतिहास घडू शकतो, हे आजच्या या विकासकामाच्या धडाक्याने सिद्ध केले, असे गौरवोद्गार आमदार किसन कथोरे यांनी काढले.तालुक्यातील जांभूळ गावात चौदाव्या वित्त योजनेंतर्गत आदिवासी समाजासाठी उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयाचे उद्घाटन, जिल्हा क्रीडा विभागांतर्गत कबड्डीपटूंसाठी जिल्ह्यातील पहिले मॅट क्र ीडांगण, ग्रामपंचायत ग्रामनिधीमधून आगरी, बौद्ध, आदिवासी, मराठा आदी समाजबांधवांसाठी भांडी व साहित्यवाटप असे विविध कार्यक्र म शनिवारी रात्री कथोरे यांच्या उपस्थितीमध्ये झाले.जांभूळ गावाचे सॅटेलाइटमार्फत सर्वेक्षण करून घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते झाल्यावर गावातील प्रत्येक ग्रामस्थांना अद्ययावत मोजणी झालेले प्रॉपर्टीकार्ड देण्यात येईल. त्यामुळे भविष्यात या गावात जमिनीच्या हद्दीवरून भांडणे होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असा विश्वास कथोरे यांनी व्यक्तकेला.भविष्यात पाण्यावरून भांडणे होण्याची शक्यता लक्षात घेऊन जांभूळ गावात पंतप्रधान जलजीवन मिशनअंतर्गत जलकुंभ उभारण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. जांभूळ गावाचा समावेश अंबरनाथ तालुक्यात लवकरच होईल, मात्र पालिकेत त्याचा समावेश न होता भविष्यात महापालिका होईल, त्यावेळी मात्र जांभूळचा समावेश महापालिकेत होईल. जांभूळ गावाला कबड्डीपटूंचा फार मोठा इतिहास आहे. तसाच इतिहास घडला आहे. ठाणे जिल्ह्यातील कबड्डीचे पहिले मॅटचे क्रीडांगण गावाला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.।सरकार बदलले तरी माणसांनी बदलू नये : सरकार बदलले तरी माणसे बदलू नये. जांभूळ गाव हे विकासाच्या धाग्याने एकत्र बांधले गेले आहे. या विकासकामांमुळेच जांभूळ गावात एकोपा, शांती, सुबत्ता नांदत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पिसाळ यांनी सांगितले. सरपंच नरेश गायकवाड, उपसरपंच परीक्षित पिसाळ, माजी सरपंच अर्चना राणे, ग्रामसेवक बाळू कोकणे, पोलीस पाटील दत्ता सावंत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भगवान पिसाळ, चंद्रकांत पिसाळ, काशिनाथ आयरेकर, लक्ष्मणबुवा जाधव आदी उपस्थित होते.