शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या रिकॅलिब्रेशनसाठी लागणार तीन महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST

डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. ते काम ...

डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. ते काम पूर्ण होईस्तोवर ३१ मेपर्यंतची डेडलाइन आहे. तोपर्यंत रिक्षाचालकांनी टेरिफ कार्ड बाळगून प्रवाशांना योग्य ते भाडे आकारून वाद, संभ्रम टाळण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी केले आहे.

चव्हाण यांच्या माहितीनुसार, आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर अपडेट केले जातील. त्यासाठी आवश्यक त्या सॉफ्टवेअर तंत्रप्रणाली येण्यास पुढील आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे. मंगळवारी ते मुंबईतून मिळेल, त्यानंतर त्याचे काम करणाऱ्या संबंधितांना ते देण्यात येईल, त्याचे वाटप झाल्यावर अंतिमतः अंमलबजावणीची चाचणी झाल्यानंतर त्यास गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत रिक्षाचालकांनी टेरिफ कार्ड बाळगणे गरजेचे आहे. आरटीओ तसेच रिक्षा युनियन, आदींनी काही प्रमाणात गुरुवारी टेरिफ कार्डचे वाटप करण्याचे नियोजन केले. तरीही ज्या रिक्षाचालकांना संगणकाद्वारे ऑनलाईन साक्षांकित केलेले टेरिफ कार्ड काढता येत असेल, ते काढून त्यांनीच प्रवाशांना मार्गदर्शन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

आरटीओने असे आवाहन केलेले असतानाच काही प्रवाशांनी मात्र जोपर्यंत रिक्षांच्या मीटरची रिकॅलिब्रेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या रिक्षाचालकांना सुधारित भाडे देऊ नये, असे आवाहन सहप्रवाशांना केले आहे.