शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या रिकॅलिब्रेशनसाठी लागणार तीन महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST

डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. ते काम ...

डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रातील ६० हजार रिक्षांच्या मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. ते काम पूर्ण होईस्तोवर ३१ मेपर्यंतची डेडलाइन आहे. तोपर्यंत रिक्षाचालकांनी टेरिफ कार्ड बाळगून प्रवाशांना योग्य ते भाडे आकारून वाद, संभ्रम टाळण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी केले आहे.

चव्हाण यांच्या माहितीनुसार, आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर अपडेट केले जातील. त्यासाठी आवश्यक त्या सॉफ्टवेअर तंत्रप्रणाली येण्यास पुढील आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे. मंगळवारी ते मुंबईतून मिळेल, त्यानंतर त्याचे काम करणाऱ्या संबंधितांना ते देण्यात येईल, त्याचे वाटप झाल्यावर अंतिमतः अंमलबजावणीची चाचणी झाल्यानंतर त्यास गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत रिक्षाचालकांनी टेरिफ कार्ड बाळगणे गरजेचे आहे. आरटीओ तसेच रिक्षा युनियन, आदींनी काही प्रमाणात गुरुवारी टेरिफ कार्डचे वाटप करण्याचे नियोजन केले. तरीही ज्या रिक्षाचालकांना संगणकाद्वारे ऑनलाईन साक्षांकित केलेले टेरिफ कार्ड काढता येत असेल, ते काढून त्यांनीच प्रवाशांना मार्गदर्शन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

आरटीओने असे आवाहन केलेले असतानाच काही प्रवाशांनी मात्र जोपर्यंत रिक्षांच्या मीटरची रिकॅलिब्रेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या रिक्षाचालकांना सुधारित भाडे देऊ नये, असे आवाहन सहप्रवाशांना केले आहे.