शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाणी पुनर्वापराची वेळ येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:02 IST

पांडुरंग अमृतकर : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’वर व्याख्यान

अंबरनाथ : कोकणात प्रचंड पाऊस पडतो. या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवल्यास भरपूर पाणी मिळून पाणीटंचाई भासणार नाही. तसेच इस्रायलप्रमाणे पाण्याचा पुनर्वापर करण्याची वेळही येणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता पांडुरंग अमृतकर यांनी व्यक्त केला.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’साठी मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि नगरसेविका अपर्णा भोईर यांनी रविवारी सायंकाळी कार्यक्र म आयोजित केला होता. यामध्ये अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या आधी खुशी खैरनार, पूर्वा पाटील, कृपा डोंगरे, सिद्धी सावंत आणि आभा गोखले या युवतींनी ‘निसर्गाची लूट केल्याने टंचाई झाली, आता पाणी अडवा’ हे पथनाट्य सादर करून भविष्यातील धोक्याकडे लक्ष वेधले.अमृतकर म्हणाले की, आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे तीन ऋतू आहेत. जगात असे ऋतुचक्र क्वचितच आढळेल. कोकणात जास्त पाऊस पडतो. सध्या निसर्गाचे चक्र उलटे फिरू लागले आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने पाऊस हळूहळू कमी होत आहे. जलचक्र ही नैसर्गिक शक्ती आहे. त्यात ढवळाढवळ केल्याने दिवसेंदिवस पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी वर्षा जलसंचयन करणे आवश्यक आहे, असे पांडुरंग अमृतकर यांनी सांगितले.स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी हे जलसंकट आधीच ओळखले होते. त्यांनी ४० वर्षांपूर्वी राजस्थानसारख्या वाळूच्या प्रदेशात विहिरी व कूपनलिका पुनर्भरणाचे काम सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता त्या वाळवंटाच्या प्रदेशात मुबलक पाणी उपलब्ध असल्याचे अमृतकर म्हणाले.विहीर पुनर्भरण करण्याची चळवळ भक्तीच्या मार्गाने सुरू केली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेला अध्यात्म आणि धार्मिक जोड दिल्यास ही चळवळ अधिक जोमाने फैलावेल, असा विश्वास अमृतकर यांनी व्यक्त केला.अपुरा पाऊ स आणि जमिनीत पाणी मुरत नसल्याने दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. आपण आतापासूनच हालचाल केली नाही तर भविष्यात ही परिस्थिती आणखी भीषण होऊ न बसेल आणि तेव्हा आपल्या हाती काहीच नसेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.एकही थेंब वाया जाऊ देऊ नका!पाणी अडवण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. काँक्रि टीकरण वाढल्याने पाणी जिरत नाही. सरकारी योजना राबवण्यात येतात. मात्र, त्यातही अनेक तांत्रिक बाबी अडथळा ठरतात. निवासी सोसायटीच्या आवारातून एकही थेंब बाहेर जाऊ देणार नाही, असा निश्चयच प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे, असे अमृतकर यांनी सांगितले. छतावरून येणारे सर्व पाणी जमिनीत मुरवून धरतीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, ही खरी ईश्वरसेवा असल्याचे अमृतकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे