शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाणी पुनर्वापराची वेळ येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:02 IST

पांडुरंग अमृतकर : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’वर व्याख्यान

अंबरनाथ : कोकणात प्रचंड पाऊस पडतो. या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवल्यास भरपूर पाणी मिळून पाणीटंचाई भासणार नाही. तसेच इस्रायलप्रमाणे पाण्याचा पुनर्वापर करण्याची वेळही येणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता पांडुरंग अमृतकर यांनी व्यक्त केला.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’साठी मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि नगरसेविका अपर्णा भोईर यांनी रविवारी सायंकाळी कार्यक्र म आयोजित केला होता. यामध्ये अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या आधी खुशी खैरनार, पूर्वा पाटील, कृपा डोंगरे, सिद्धी सावंत आणि आभा गोखले या युवतींनी ‘निसर्गाची लूट केल्याने टंचाई झाली, आता पाणी अडवा’ हे पथनाट्य सादर करून भविष्यातील धोक्याकडे लक्ष वेधले.अमृतकर म्हणाले की, आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे तीन ऋतू आहेत. जगात असे ऋतुचक्र क्वचितच आढळेल. कोकणात जास्त पाऊस पडतो. सध्या निसर्गाचे चक्र उलटे फिरू लागले आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने पाऊस हळूहळू कमी होत आहे. जलचक्र ही नैसर्गिक शक्ती आहे. त्यात ढवळाढवळ केल्याने दिवसेंदिवस पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी वर्षा जलसंचयन करणे आवश्यक आहे, असे पांडुरंग अमृतकर यांनी सांगितले.स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी हे जलसंकट आधीच ओळखले होते. त्यांनी ४० वर्षांपूर्वी राजस्थानसारख्या वाळूच्या प्रदेशात विहिरी व कूपनलिका पुनर्भरणाचे काम सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता त्या वाळवंटाच्या प्रदेशात मुबलक पाणी उपलब्ध असल्याचे अमृतकर म्हणाले.विहीर पुनर्भरण करण्याची चळवळ भक्तीच्या मार्गाने सुरू केली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेला अध्यात्म आणि धार्मिक जोड दिल्यास ही चळवळ अधिक जोमाने फैलावेल, असा विश्वास अमृतकर यांनी व्यक्त केला.अपुरा पाऊ स आणि जमिनीत पाणी मुरत नसल्याने दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. आपण आतापासूनच हालचाल केली नाही तर भविष्यात ही परिस्थिती आणखी भीषण होऊ न बसेल आणि तेव्हा आपल्या हाती काहीच नसेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.एकही थेंब वाया जाऊ देऊ नका!पाणी अडवण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. काँक्रि टीकरण वाढल्याने पाणी जिरत नाही. सरकारी योजना राबवण्यात येतात. मात्र, त्यातही अनेक तांत्रिक बाबी अडथळा ठरतात. निवासी सोसायटीच्या आवारातून एकही थेंब बाहेर जाऊ देणार नाही, असा निश्चयच प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे, असे अमृतकर यांनी सांगितले. छतावरून येणारे सर्व पाणी जमिनीत मुरवून धरतीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, ही खरी ईश्वरसेवा असल्याचे अमृतकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे