शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

‘ते’ पांढरे पट्टे ठरणार निरर्थक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:34 IST

डोंबिवलीतही फेरीवाल्यांचा विरोध; विश्वासात घेतले नसल्याचा आरोप

कल्याण : प्रभागांमधील लोकसंख्येच्या तुलनेत शहरांतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीने प्रत्येक प्रभागांमध्ये पांढरे पट्टे मारले आहेत. मात्र, कल्याणमधील फेरीवाला संघटनांपाठोपाठ आता डोंबिवलीतही या धोरणाला विरोध सुरू झाला आहे. पट्टे मारण्यापूर्वी विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप फेरीवाला प्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे हे पांढरे पट्टे निरर्थक ठरण्याची चिन्हे आहेत.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केडीएमसीने फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली आहे. २०१४ मधील सर्वेक्षणानुसार केडीएमसीच्या हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. लवकरच त्यांना ओळखपत्रे देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी नुकत्याच झालेल्या नगरपथ विक्रेता समितीच्या बैठकीत दिली.दरम्यान, प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे धोरण राबविण्यास केडीएमसीने प्रारंभ केला आहे. त्यानुसार प्रभागांतील रस्त्यांवर पट्टे मारले आहेत. प्रभागांमधील एकंदरीतच लोकसंख्या पाहता २५० फेरीवाले प्रत्येक प्रभागात बसविले जाणार आहेत. परंतु, जिथे व्यवसाय होणार नाही, अशा ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हिताचे ठरणार नाही, याकडे कल्याणमधील फेरीवाला संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी आधीच विरोध दर्शविला आहे.अधिकारी म्हणतात पट्टे अधिकृत नाहीतसध्या फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या नगरपथ विक्रेता समितीला विश्वासात न घेता पांढरे पट्टे मारले गेले आहेत.एकीकडे आम्हाला रेल्वे स्थानकापासून १५० मीटर हद्दीत व्यवसाय करण्यास बंदी घालताना कायद्याचा बडगा दाखविला जातो तर दुसरीकडे केडीएमसी समितीला न विचारता पांढरे पट्टे मारून कायदा धाब्यावर बसविते, असा आरोप कष्टकरी हॉकर्स भाजी विक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी केला आहे.पट्ट्यांबाबत समितीच्या बैठकीत विचारले असता अधिकाऱ्यांनी ते अधिकृत नसल्याचे स्पष्टीकरण दिले, असे कांबळे म्हणाले.यासंदर्भात फेरीवाला अतिक्रमण विरोधी विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे