शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ पांढरे पट्टे ठरणार निरर्थक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:34 IST

डोंबिवलीतही फेरीवाल्यांचा विरोध; विश्वासात घेतले नसल्याचा आरोप

कल्याण : प्रभागांमधील लोकसंख्येच्या तुलनेत शहरांतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केडीएमसीने प्रत्येक प्रभागांमध्ये पांढरे पट्टे मारले आहेत. मात्र, कल्याणमधील फेरीवाला संघटनांपाठोपाठ आता डोंबिवलीतही या धोरणाला विरोध सुरू झाला आहे. पट्टे मारण्यापूर्वी विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप फेरीवाला प्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे हे पांढरे पट्टे निरर्थक ठरण्याची चिन्हे आहेत.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केडीएमसीने फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली आहे. २०१४ मधील सर्वेक्षणानुसार केडीएमसीच्या हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. लवकरच त्यांना ओळखपत्रे देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी नुकत्याच झालेल्या नगरपथ विक्रेता समितीच्या बैठकीत दिली.दरम्यान, प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे धोरण राबविण्यास केडीएमसीने प्रारंभ केला आहे. त्यानुसार प्रभागांतील रस्त्यांवर पट्टे मारले आहेत. प्रभागांमधील एकंदरीतच लोकसंख्या पाहता २५० फेरीवाले प्रत्येक प्रभागात बसविले जाणार आहेत. परंतु, जिथे व्यवसाय होणार नाही, अशा ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हिताचे ठरणार नाही, याकडे कल्याणमधील फेरीवाला संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी आधीच विरोध दर्शविला आहे.अधिकारी म्हणतात पट्टे अधिकृत नाहीतसध्या फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या नगरपथ विक्रेता समितीला विश्वासात न घेता पांढरे पट्टे मारले गेले आहेत.एकीकडे आम्हाला रेल्वे स्थानकापासून १५० मीटर हद्दीत व्यवसाय करण्यास बंदी घालताना कायद्याचा बडगा दाखविला जातो तर दुसरीकडे केडीएमसी समितीला न विचारता पांढरे पट्टे मारून कायदा धाब्यावर बसविते, असा आरोप कष्टकरी हॉकर्स भाजी विक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी केला आहे.पट्ट्यांबाबत समितीच्या बैठकीत विचारले असता अधिकाऱ्यांनी ते अधिकृत नसल्याचे स्पष्टीकरण दिले, असे कांबळे म्हणाले.यासंदर्भात फेरीवाला अतिक्रमण विरोधी विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे