शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श आचारसंहितेच्या तक्रारीची अवघ्या तासाभरात घेतली जाणार दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 22:57 IST

एखाद्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळले तर ‘सी व्हीजिल’ या अ‍ॅपद्वारे मतदारांनाही नजर ठेवता येणार आहे. या तक्रारीवर तासाभरातच आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देमतदारांना ‘सी व्हीजिल’ अ‍ॅपद्वारे ठेवता येणार नजरकोणत्याही नागरिकाला करता येणार तक्रार निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिली माहिती

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आता आदर्श आचारसंहिता लागू झाली असून एखाद्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळले तर ‘सी व्हीजिल’ या अ‍ॅपद्वारे मतदारांनाही नजर ठेवता येणार आहे. यातून कोणाही नागरिकाने तक्रार केली तर त्याची तत्काळ दखल घेऊन तासाभरातच तक्रारीवर आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.आदर्श आचारसंहितेचे राजकीय पक्षांकडून किंवा संबंधित उमेदवारांकडून काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत मतदारराजालाही करडी नजर ठेवता येणार आहे. त्यासाठी आपल्या मोबाइलद्वारे सी व्हीजिल अर्थात सिटीजन व्हीजिल हे अ‍ॅप डाउनलोड केल्यास कोणालाही, कोणत्याही ठिकाणावरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणच्या प्रचाराबाबतचे वेगळे फोटो किंवा व्हिडीओ आढळल्यास ते याठिकाणी पाठवता येतील. ते फोटो जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाकडे पाठविले जातील. याची माहिती तातडीने भरारी पथकाला दिली जाईल. ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी अशा चार भरारी पथकांची नियुक्ती झालेली आहे. साधारण २० ते २५ मिनिटांमध्ये हे पथक तिथे पोहोचल्यानंतर एका तासात यासंदर्भातील कार्यवाही ते करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आचारसंहिताभंगाबाबतचे कोणतेही गैरप्रकार आढळल्यास ते तातडीने या अ‍ॅपद्वारे अथवा थेट निवडणूक निर्णय अधिका-यांकडेही नोंदविल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार असल्याचे बागल यांनी सांगितले............................मतदारयादीत अजूनही नाव नोंदवू शकताएखाद्याचे नाव गेल्या निवडणुकीच्यावेळी गहाळ झाल्याचे आढळले असेल, तर त्यांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे याबाबतची चौकशी करावी. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांची नावे होती, तीच यादी आता विधानसभेलाही असेल. पण, ज्यांची नावे त्यावेळी नव्हती. पत्ते बदलले असतील, अशा मतदारांनी ६ क्रमांकाचा अर्ज भरून द्यायचा आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी हे अर्ज देण्याची मुदत आहे. त्यामुळे अजूनही मतदार आपले नाव मतदारयादीत नोंदवू शकतात, असेही बागल यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगovala-majiwada-acओवाला मजिवाडा