शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आदर्श आचारसंहितेच्या तक्रारीची अवघ्या तासाभरात घेतली जाणार दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 22:57 IST

एखाद्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळले तर ‘सी व्हीजिल’ या अ‍ॅपद्वारे मतदारांनाही नजर ठेवता येणार आहे. या तक्रारीवर तासाभरातच आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देमतदारांना ‘सी व्हीजिल’ अ‍ॅपद्वारे ठेवता येणार नजरकोणत्याही नागरिकाला करता येणार तक्रार निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिली माहिती

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आता आदर्श आचारसंहिता लागू झाली असून एखाद्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळले तर ‘सी व्हीजिल’ या अ‍ॅपद्वारे मतदारांनाही नजर ठेवता येणार आहे. यातून कोणाही नागरिकाने तक्रार केली तर त्याची तत्काळ दखल घेऊन तासाभरातच तक्रारीवर आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.आदर्श आचारसंहितेचे राजकीय पक्षांकडून किंवा संबंधित उमेदवारांकडून काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत मतदारराजालाही करडी नजर ठेवता येणार आहे. त्यासाठी आपल्या मोबाइलद्वारे सी व्हीजिल अर्थात सिटीजन व्हीजिल हे अ‍ॅप डाउनलोड केल्यास कोणालाही, कोणत्याही ठिकाणावरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणच्या प्रचाराबाबतचे वेगळे फोटो किंवा व्हिडीओ आढळल्यास ते याठिकाणी पाठवता येतील. ते फोटो जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाकडे पाठविले जातील. याची माहिती तातडीने भरारी पथकाला दिली जाईल. ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी अशा चार भरारी पथकांची नियुक्ती झालेली आहे. साधारण २० ते २५ मिनिटांमध्ये हे पथक तिथे पोहोचल्यानंतर एका तासात यासंदर्भातील कार्यवाही ते करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आचारसंहिताभंगाबाबतचे कोणतेही गैरप्रकार आढळल्यास ते तातडीने या अ‍ॅपद्वारे अथवा थेट निवडणूक निर्णय अधिका-यांकडेही नोंदविल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार असल्याचे बागल यांनी सांगितले............................मतदारयादीत अजूनही नाव नोंदवू शकताएखाद्याचे नाव गेल्या निवडणुकीच्यावेळी गहाळ झाल्याचे आढळले असेल, तर त्यांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे याबाबतची चौकशी करावी. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांची नावे होती, तीच यादी आता विधानसभेलाही असेल. पण, ज्यांची नावे त्यावेळी नव्हती. पत्ते बदलले असतील, अशा मतदारांनी ६ क्रमांकाचा अर्ज भरून द्यायचा आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी हे अर्ज देण्याची मुदत आहे. त्यामुळे अजूनही मतदार आपले नाव मतदारयादीत नोंदवू शकतात, असेही बागल यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगovala-majiwada-acओवाला मजिवाडा