शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कामावर जाण्यासाठी लागतात पाच ते सहा तास, दिवेकरांचे हाल सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:41 IST

अनलॉक सुरु झाला आणि शासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये जाण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ सुरु झाली आहे. दिव्यात अनेक चाकरमानी वास्तव्यास असून त्यांची आता कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी तारेवरची कसरत सुरु झाली आहे. कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना पाच ते सहा तासांचा कालावधी जात आहे.

ठाणे : अनाधिकृत बांधकाम, पाणी, लोकलची अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या दिव्यातील नागरिकांना अनलॉक नंतर नवीन समस्येला तोंड द्यावे लागते आहे. आपल्या पोटापाण्यासाठी ठाणे मुंबईसारख्या शहरात कामावर जाताना रोज सहा ते सात तास आपला जीव मुठीत घेऊन येथील चाकरमान्यांना प्रवास करावा लागत आहे. लोकल सेवा नसल्याने अतिशय कमी वाहतुकीच्या पर्यायामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे. पहाटे पाच पासून बसच्या रांगेत उभे राहावे लागत असून कामावर जाण्यास ९ ते १० वाजत आहेत. त्यातही उशिरा पोहचल्यास लेट मार्क किंवा गैरहजेरी लावली जात आहे.               दिव्यातील लोकांना मुंबईत कामावर जायचे असेल तर एकमेव आधार म्हणजे लोकल ट्रेनचा. मात्र सरकारने लॉक डाऊनचे नियम शिथिल केल्यापासून खाजगी आणि सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात जे दिवेकर कामाला जाण्यास निघत आहे, त्यांना रस्ते वाहतुकी शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आधी टीएमटी बस आणि त्यानंतर बेस्टच्या बसेस मधून प्रवास करत त्यांना आॅफिस गाठावे लागत आहे. या बसेस मध्ये चढण्यासाठी दिव्यात तब्बल एक ते दीड किलोमीटरच्या रोजच रांगा लागत आहेत. सकाळी पाच वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे असतात. सोशल डिस्टेसींगचे नियम पाळून बस मध्ये बसवले जाते. त्यामुळे अधिक गर्दी, भांडणे, मारामारी इथे रोज होत असते. टीएमटी बस मधून ठाण्यापर्यंत आल्यानंतर पुन्हा बेस्टच्या बसची वाट बघून त्यातून मुंबईतील आॅफिस पर्यंत पोचावे लागते. हीच कसरत घरी येताना देखील करावी लागते. आॅफिसमध्ये वेळेत न गेल्याने कधी लेट मार्कतर कधी थेट गैरहजेरी लावली जाते असल्याचे येथील चाकरमान्यांचे म्हणने आहे.दरम्यान दिवा ते ठाणे अशा टी एम टी बसेसच्या एकूण ४० फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यातील दिवा येथून ठाण्यात येणाऱ्या २० फेऱ्या, ठाणे येथून दिव्याला जाणाऱ्या ११ फेऱ्या आणि आनंद नगर डेपो येथून दिव्याला जाणाऱ्या ८ फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र त्या देखील अपुऱ्या पडत असल्याचे चारकमानी सांगतात. त्यामुळे पहिल्या बसमध्ये जागा मिळावी आणि पुढे ठाण्यातून बेस्ट बस वेळेत मिळावी यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून येथे बस मिळविण्यासाठी चाकरमानी रांगा लावत असतात. एकीकडे कोरोना चे संकट तर दुसरीकडे पोट भरण्यासाठी कामावर जाण्याची मजबुरी, त्यामुळे दिव्यातून जास्तीत जास्त बसेस सोडण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. सरकारने कामावर जाण्यास मुभा तर दिली, मात्र त्यासाठी किती अपरिमित कष्ट नागरिकांना घ्यावे लागत आहेत याचा थांगपत्ता देखील सरकारला नाही.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या