शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

‘त्या’ जागेवर आयटी कंपन्या आल्या पाहिजेत; राजू पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2022 15:07 IST

कल्याण ग्रामीणमधील 10 गावांच्या ठिकाणी सरकारने ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली.

डोंबिवली: येथील एमआयडीसीतील 156 रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक कंपन्या स्थलांतरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वागत केले आहे. सरकारचा निर्णय चांगला आहे. मात्र कंपन्या स्थलांतरीत झाल्यावर त्या जागेचा वाणिज्य वापर व्हावा.  त्याठिकाणी आयटी कंपन्या आल्या पाहिजेत. त्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे असे धोरण सरकारने ठरविले पाहिजे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रम्मोद (राजू) पाटील यांनी केली आहे.

रासायनिक कंपन्यांमधून होणारे वायू आणि जल प्रदूषण, कंपन्यांना आगी लागणो, जीवघेणो होणारे स्फोट या सगळया घटना पाहता नागरीकांनी केलेल्या तक्रारींवर धोकादायक, अतिधोकादायक आणि रासायनिक कंपन्या स्थलांतरीत करण्याची मागणी सरकारकडे आमदार पाटील यांनी केली होती. सरकारने या कंपन्यांना अनेकवेळा सुधारणा करण्याची संधी दिली होती. त्यांच्याकडून त्रूटींची पूर्तता केली जात नव्हती. तसेच सुधारणाही होत नव्हती. पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चरच नसल्याने त्यात सुधारणा होत नव्हती. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. 

कल्याण ग्रामीणमधील 10 गावांच्या ठिकाणी सरकारने ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली. हे ग्रोथ सेंटर अजून उभे राहिलेले नाही. त्यासाठी दहा गावात जे आरक्षण टाकले आहे त्यापैकी काही आरक्षण स्थलांतरीत करण्यात येणा-या कंपन्यांच्या जागेवर टाकले पाहिजे. ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार असे सांगण्यात आले होते. स्थलांतरीत कंपन्यांच्या जागेचा निवासीसाठी न करता वाणिज्यासाठी केला जावा. त्यातून रोजगार उपलब्ध होईल असे धोरण सरकारने ठरविले पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे