शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

‘त्या’ जागेवर आयटी कंपन्या आल्या पाहिजेत; राजू पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2022 15:07 IST

कल्याण ग्रामीणमधील 10 गावांच्या ठिकाणी सरकारने ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली.

डोंबिवली: येथील एमआयडीसीतील 156 रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक कंपन्या स्थलांतरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वागत केले आहे. सरकारचा निर्णय चांगला आहे. मात्र कंपन्या स्थलांतरीत झाल्यावर त्या जागेचा वाणिज्य वापर व्हावा.  त्याठिकाणी आयटी कंपन्या आल्या पाहिजेत. त्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे असे धोरण सरकारने ठरविले पाहिजे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रम्मोद (राजू) पाटील यांनी केली आहे.

रासायनिक कंपन्यांमधून होणारे वायू आणि जल प्रदूषण, कंपन्यांना आगी लागणो, जीवघेणो होणारे स्फोट या सगळया घटना पाहता नागरीकांनी केलेल्या तक्रारींवर धोकादायक, अतिधोकादायक आणि रासायनिक कंपन्या स्थलांतरीत करण्याची मागणी सरकारकडे आमदार पाटील यांनी केली होती. सरकारने या कंपन्यांना अनेकवेळा सुधारणा करण्याची संधी दिली होती. त्यांच्याकडून त्रूटींची पूर्तता केली जात नव्हती. तसेच सुधारणाही होत नव्हती. पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चरच नसल्याने त्यात सुधारणा होत नव्हती. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. 

कल्याण ग्रामीणमधील 10 गावांच्या ठिकाणी सरकारने ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा केली. हे ग्रोथ सेंटर अजून उभे राहिलेले नाही. त्यासाठी दहा गावात जे आरक्षण टाकले आहे त्यापैकी काही आरक्षण स्थलांतरीत करण्यात येणा-या कंपन्यांच्या जागेवर टाकले पाहिजे. ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार असे सांगण्यात आले होते. स्थलांतरीत कंपन्यांच्या जागेचा निवासीसाठी न करता वाणिज्यासाठी केला जावा. त्यातून रोजगार उपलब्ध होईल असे धोरण सरकारने ठरविले पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे