शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या उमेदवारीचा मुद्दाच सर्वाधिक महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:19 IST

उल्हासनगरात मूलभूत सुविधांची वानवा : कलानी कुटुंबास शिवसेनेचीही मिळू शकते उमेदवारी

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील कॅम्प नं-१, २, व ३ विभागासह म्हारळ, कांबा, वरप आदी गावांचा समावेश असलेल्या उल्हासनगर मतदारसंघावर आधी जनसंघ-भाजपचे वर्चस्व होते. त्यानंतर दोन दशके कलानीराज होते. सलग चारवेळा निवडून आलेल्या पप्पू कलानीचा २००९ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे कुमार आयलानी यांनी तब्बल १२ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला. मोदी लाटेत पप्पू कलानीच्या पत्नी ज्योती कलानी आमदार म्हणून निवडून आल्या. सद्य:स्थितीत कलानी कुटुंब भाजपच्या वाटेवर असल्याने शहरात विरोधीपक्ष नावालाच उरणार आहे. अशा स्थितीत विधानसभेची युतीची उमेदवारी कुणाला मिळणार कलानी की आयलानी यांना, हाच तुर्तास या मतदारसंघातील कळीचा आहे.उल्हासनगर शहर कल्याण पूर्व, अंबरनाथ व उल्हासनगर अशा तीन मतदारसंघांत विभागले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना उल्हासनगर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याची आशा होती. भाजप, शिवसेना, साई पक्ष व ओमी टीम एकत्र असतानाही शिंदे यांना फक्त ७३ हजार ३४५, तर राष्ट्रवादी पक्षाचे बाबाजी पाटील यांना १५ हजार ५६४ आणि वंचित आघाडीचे संजय हेडाव यांना १२ हजार ४१५ मतदान झाले. युती झाल्यास माजी आमदार व शहराध्यक्ष कुमार आयलानी इच्छुक आहेत.युतीचे कट्टर विरोधक असणाऱ्या कलानी कुटुंबाने महापालिका निवडणुकीपासून भाजपशी घरोबा केला. कलानी कुटुंबाच्या सून पंचम कलानी भाजपच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आल्या असून त्या महापौर आहेत. ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या आमदार असून त्या भाजपच्या वाटेवर आहेत. मुलगा ओमी कलानी यांनी महापालिका निवडणुकीत ओमी टीमची स्थापना करून भाजपसोबत आघाडी केली आणि पालिकेत भाजपची सत्ता आणून दिली. उल्हासनगर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, पीआरपी, भारिप, रिपाइं गवई गट आदींचा एकही नगरसेवक नाही. रिपाइं आठवले गटाचे मात्र ३ नगरसेवक असून त्यांची भाजपसोबत युती आहे. रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. आमदार कलानी हे भाजपच्या वाटेवर असल्याने, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. काँग्रेसकडून शहराध्यक्ष राधाचरण करोतीया, डॉ. जयराम लुल्ला, जया साधवानी तर वंचित आघाडीकडून भारिपचे सुधीर बागूल व शिवसेनेकडून राजेंद्र चौधरी हे इच्छुक आहेत. २०१४ च्या निवडणुकीत युती नसल्याने भाजपच्या तिकीटावर कुमार आयलानी, शिवसेनेचे धनंजय बोडारे, तर राष्ट्रवादीच्या तिकीटावर ज्योती कलानी उभ्या होत्या. कलानी यांना ४३ हजार ७६०, आयलानी यांना ४१ हजार ८९७, तर बोडारे यांना २३ हजार ८६८ मते मिळाली होती. युती झाली नाही, तर भाजप कलानी कुटुंबाला रितसर प्रवेश देवून त्यापैकी एकाला उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. भाजपने कलानी कुटुंबाला उमेदवारी दिली नाही, तर त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.भाजप-शिवसेनेवर नागरिक नाराजमहापालिकेत भाजप-शिवसेना युतीची १० वर्ष सत्ता होती. त्यानंतर भाजपने ओमी टीमसोबत आघाडी करून पालिकेत सत्ता मिळविली. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना अप्रत्यक्ष सत्तेत सहभागी झाली. मात्र शहराचा विकास होण्याऐवजी शहर बकाल झाल्याची टीका होत आहे. धोकादायक इमारती, पाणीटंचाई, आरोग्य, साफसफाई, डम्पिंग ग्राऊंड, शहर विकास आराखडा, भुयारी गटार, खेमानी नाला, रस्त्याची दुरवस्था, बेकायदा बांधकामे आदी अनेक समस्या तशाच आहेत. मूलभूत सुविधा मिळत नसल्याने सत्ताधाऱ्यांवर नागरिक नाराज आहेत.वंचित आघाडी, रिपाइं पर्याय : शहरात दलित, मुस्लिम, उत्तर भारतीय समाजाची संख्या लक्षणीय आहे. रिपाइं गटतट एकत्र येवून त्यांनी वंचित आघाडीला सोबत घेतल्यास शिवसेना-भाजपला पर्याय ठरू शकतात. काँग्रेसची ताकद मर्यादित असून राष्ट्रवादीची ताकद कलानी कुटुंबामुळे शहरात होती.शिवसेनेने लावली फिल्डिंग : ऐनवेळी युती तुटल्यास शिवसेनेकडून शहरप्रमुख राजेंद्र चौधरी निवडणूक रिंगणात असतील असे बोलले जात आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून गेल्यावेळी धनजंय बोडारे यांना २३ हजार मते मिळाली होती.