शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

युतीच्या उमेदवारीचा मुद्दाच सर्वाधिक महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:19 IST

उल्हासनगरात मूलभूत सुविधांची वानवा : कलानी कुटुंबास शिवसेनेचीही मिळू शकते उमेदवारी

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील कॅम्प नं-१, २, व ३ विभागासह म्हारळ, कांबा, वरप आदी गावांचा समावेश असलेल्या उल्हासनगर मतदारसंघावर आधी जनसंघ-भाजपचे वर्चस्व होते. त्यानंतर दोन दशके कलानीराज होते. सलग चारवेळा निवडून आलेल्या पप्पू कलानीचा २००९ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे कुमार आयलानी यांनी तब्बल १२ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला. मोदी लाटेत पप्पू कलानीच्या पत्नी ज्योती कलानी आमदार म्हणून निवडून आल्या. सद्य:स्थितीत कलानी कुटुंब भाजपच्या वाटेवर असल्याने शहरात विरोधीपक्ष नावालाच उरणार आहे. अशा स्थितीत विधानसभेची युतीची उमेदवारी कुणाला मिळणार कलानी की आयलानी यांना, हाच तुर्तास या मतदारसंघातील कळीचा आहे.उल्हासनगर शहर कल्याण पूर्व, अंबरनाथ व उल्हासनगर अशा तीन मतदारसंघांत विभागले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना उल्हासनगर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याची आशा होती. भाजप, शिवसेना, साई पक्ष व ओमी टीम एकत्र असतानाही शिंदे यांना फक्त ७३ हजार ३४५, तर राष्ट्रवादी पक्षाचे बाबाजी पाटील यांना १५ हजार ५६४ आणि वंचित आघाडीचे संजय हेडाव यांना १२ हजार ४१५ मतदान झाले. युती झाल्यास माजी आमदार व शहराध्यक्ष कुमार आयलानी इच्छुक आहेत.युतीचे कट्टर विरोधक असणाऱ्या कलानी कुटुंबाने महापालिका निवडणुकीपासून भाजपशी घरोबा केला. कलानी कुटुंबाच्या सून पंचम कलानी भाजपच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आल्या असून त्या महापौर आहेत. ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या आमदार असून त्या भाजपच्या वाटेवर आहेत. मुलगा ओमी कलानी यांनी महापालिका निवडणुकीत ओमी टीमची स्थापना करून भाजपसोबत आघाडी केली आणि पालिकेत भाजपची सत्ता आणून दिली. उल्हासनगर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, पीआरपी, भारिप, रिपाइं गवई गट आदींचा एकही नगरसेवक नाही. रिपाइं आठवले गटाचे मात्र ३ नगरसेवक असून त्यांची भाजपसोबत युती आहे. रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. आमदार कलानी हे भाजपच्या वाटेवर असल्याने, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. काँग्रेसकडून शहराध्यक्ष राधाचरण करोतीया, डॉ. जयराम लुल्ला, जया साधवानी तर वंचित आघाडीकडून भारिपचे सुधीर बागूल व शिवसेनेकडून राजेंद्र चौधरी हे इच्छुक आहेत. २०१४ च्या निवडणुकीत युती नसल्याने भाजपच्या तिकीटावर कुमार आयलानी, शिवसेनेचे धनंजय बोडारे, तर राष्ट्रवादीच्या तिकीटावर ज्योती कलानी उभ्या होत्या. कलानी यांना ४३ हजार ७६०, आयलानी यांना ४१ हजार ८९७, तर बोडारे यांना २३ हजार ८६८ मते मिळाली होती. युती झाली नाही, तर भाजप कलानी कुटुंबाला रितसर प्रवेश देवून त्यापैकी एकाला उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. भाजपने कलानी कुटुंबाला उमेदवारी दिली नाही, तर त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.भाजप-शिवसेनेवर नागरिक नाराजमहापालिकेत भाजप-शिवसेना युतीची १० वर्ष सत्ता होती. त्यानंतर भाजपने ओमी टीमसोबत आघाडी करून पालिकेत सत्ता मिळविली. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना अप्रत्यक्ष सत्तेत सहभागी झाली. मात्र शहराचा विकास होण्याऐवजी शहर बकाल झाल्याची टीका होत आहे. धोकादायक इमारती, पाणीटंचाई, आरोग्य, साफसफाई, डम्पिंग ग्राऊंड, शहर विकास आराखडा, भुयारी गटार, खेमानी नाला, रस्त्याची दुरवस्था, बेकायदा बांधकामे आदी अनेक समस्या तशाच आहेत. मूलभूत सुविधा मिळत नसल्याने सत्ताधाऱ्यांवर नागरिक नाराज आहेत.वंचित आघाडी, रिपाइं पर्याय : शहरात दलित, मुस्लिम, उत्तर भारतीय समाजाची संख्या लक्षणीय आहे. रिपाइं गटतट एकत्र येवून त्यांनी वंचित आघाडीला सोबत घेतल्यास शिवसेना-भाजपला पर्याय ठरू शकतात. काँग्रेसची ताकद मर्यादित असून राष्ट्रवादीची ताकद कलानी कुटुंबामुळे शहरात होती.शिवसेनेने लावली फिल्डिंग : ऐनवेळी युती तुटल्यास शिवसेनेकडून शहरप्रमुख राजेंद्र चौधरी निवडणूक रिंगणात असतील असे बोलले जात आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून गेल्यावेळी धनजंय बोडारे यांना २३ हजार मते मिळाली होती.