शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

इशरत जहाँचा मुद्दा पदवीधरमध्ये तापला; शिवसेनेचा आरोप, भाजपाचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:51 IST

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात गुजरातेत एन्काऊंटरमध्ये मारलेली गेलेली कथित दहशतवादी इशरत जहाँचा मुद्दा शिवसेनेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी तापवला.

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात गुजरातेत एन्काऊंटरमध्ये मारलेली गेलेली कथित दहशतवादी इशरत जहाँचा मुद्दा शिवसेनेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी तापवला. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी इशरतच्या घरी जाऊन एक लाख रुपयांचा धनादेश दिला होता. त्याचा उल्लेख करुन मोरे म्हणाले की, ज्यांनी दहशतवादी लोकांना मदत केली त्यांच्या मुलाला भाजपाने तिकीट दिले. भाजपाचे नेते व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आरोपांचे खंडन करताना इशरतला मदतीचा धनादेश देण्यामागे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची प्रेरणा असल्याचा दावा केला. पालघर पाठोपाठ कोकण पदवीधरच्या निवडणुकीतही शिवसेना रडीचा डाव खेळत असल्याचे चव्हाण म्हणाले.मोरे म्हणाले की, डावखरे यांनी दहशवाद्यांना मदत केली व राष्ट्रप्रेमाची भाषा करणाऱ्या भाजपाने त्यांच्याच मुलाला निरंजनला उमेदवारी दिली. ज्या वसंत डावखरे यांनी निरंजनला मोठे केले, त्यांचा एक साधा फोटो बॅनरवर लावण्याची धमक त्यांच्यात का नाही, असा सवालही त्यांनी केला. केवळ वडिलांच्या पुण्याईवर उमेदवारी मिळालेल्या निरंजन यांना लोकांकरिता अंगावर घेतलेल्या केसेसचे काय महत्व असणार, असा प्रश्न त्यांनी केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपाने वर्षाला दोन कोटी नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात आतापर्यंत ४० ते ५० लाख लोकांचा रोजगार बुडाला. ५० हजारांच्यावर शासकीय शाळा बंद झाल्याचा त्यांनी दावा केला. शिक्षण हा सुदृढ समाजाचा, देशाच्या प्रगतीचा पाया असून विद्यार्थी आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठीच शिवसेना मैदानात उतरली असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.शिवसेना प्रत्येक निवडणुकीत रडीचा डाव खेळते. २०१४ मध्ये मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने सीडी काढली होती, त्यानंतर पालघर पोटनिवडणुकीच्या वेळी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची काटछाट केलेली सीडी दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. आताही तोच प्रयत्न सुरु आहे, असे चव्हाण म्हणाले. वसंत डावखरे यांचे फोटे बॅनवर नसल्याबद्दल विचारले असता निरंजन म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांना बॅनरचे काम सोपविण्यात आले होते, त्यांनीच हे बॅनर लावले.संजय मोरे यांच्यावर महापालिका शाळांतील सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीपोटी तीन कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार केला म्हणूनच त्यांना शिवसेनेने या निवडणुकीची बक्षिसी दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.