शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पात आहे का? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल, आयुक्तांना सुनावले खडे बोल..

By मुरलीधर भवार | Updated: September 12, 2022 20:05 IST

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना बसला रस्त्यावरील खड्यांचा फटका.

कल्याणकल्याणडोंबिवली शहरातील रस्ते इतके खराब आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. हे शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांत आहे का असा सवाल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उपस्थित करीत महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना खडे बोल सुनावणीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांचा फटका केंद्रीय मंत्री ठाकूर यांनाही बसला आहे. तसेच शहर अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत जोरदार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहे. हे खड्डे गणपती उत्सवापूर्वी बुजविले जातील असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले होते. गणपती उत्सव पार पडली तरी रस्त्यावरील अनेक ठिकाणचे खड्डे बुजविले गेले नाहीत. केंद्रीय मंत्री ठाकूर हे तीन दिवसाच्या कल्याण डोंबिवली दौ:यावर आहे. ते पक्षाच्या बैठका घेत आहे. तसेच व्यापारी वर्ग आणि प्रशासनाच्या अधिका:यांच्या भेटी गाठी घेत आहे.

आज सायंकाळी मंत्री ठाकूर यांनी महापालिका मुख्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रुमला भेट दिली. यावेळी आयुक्त दांगडे यांच्यासह मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, किसन कथोरे, संजय केळकर आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्पांसंदर्भात एक चित्रफित मंत्री ठाकूर यांना दाखविली जात होती. त्यांच्या शेजारीच आयुक्त बसले होते. यावेळी ठाकूर यांनी हे शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांत आहे. खड्डय़ामुळे रस्त्यांची स्थिती खूप खराब आहे. अन्य शहरातही स्मार्ट सिटी प्रकल्प राबविले जात आहे. त्या शहरात रस्ते चांगले झालेत. हॉटी कल्चर चा प्रयोग करुन शहर सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. तसेच शहरात स्वच्छता राखली जात आहे. याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यावर देशातील १०० शहरे स्मार्ट सिटी करण्यासाठी निवडली गेली. त्यापैकी कल्याण डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश केला गेला. एक हजार कोटीचे प्रकल्प या शहरात राबविले जात आहे. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाविषयी खुद्द केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केल्याने या प्रकल्पाच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरkalyanकल्याणdombivaliडोंबिवली