शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

आवक -जावक रजिस्टर फाडले,शिक्षण विभागाच्या नोंदी गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 03:35 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या.

- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. या दरम्यान सुमारे चार ते पाच महिन्यांच्या नोंदी असलेले आवक-जावक रजिस्टर फाडून पत्रव्यवहारांचा पुरावा नष्ट करण्याची मनमानी माध्यमिक शिक्षण विभागात झाल्यामुळे या गौडबंगालाविषयी जिल्हा परिषदेत तर्कवितर्क काढले जात आहेत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचे कामकाज मीना शेंडकर या महिला शिक्षणाधिकाºयांव्दारे पाहिले जात होते. त्यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त काम होते. परंतु, त्यांच्या बदलीनंतर आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागास शिक्षणाधिकारी मिळाले. या दोन्ही अधिकाºयांनी सुमारे दोन महिन्यापूर्वीच पदभार स्वीकारला. मात्र, माध्यमिक शिक्षण विभागाच्या या आधी केलेल्या पत्रव्यवहाराच्या आवक-जावक नोंदींच्या रजिस्टरचे चार ते पाच महिन्यांची पाने सील करून त्या पुढे नवीन पत्रव्यवहारांच्या नोंदी ठेवण्याचे सूचना होत्या. परंतु, काही दिवसांनी मात्र सील केलेल्या पत्रव्यवहाराची पानेरजिस्टरमधून फाडण्यात आल्याची गंभीर बाब लक्षात आली.>अधिकारी-कर्मचारी सीसीटीव्हीत कैदमाध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाची झाडाझडती सुरू असून या काळातील सीसीटीव्ही फुटेजही प्राप्त झाल्याची चर्चा आहे. यामध्ये एक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यापूर्वी कॅमेºयासमोर आढळले. काही वेळेनंतर कॅमेरे सुरू केले असता त्याच व्यक्ती कॅमेºयासमोर आढळल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यावरून संबंधितांकडे संशयाची सुई फिरत आहे..जि.प. अध्यक्षाही अंधारातसुमारे चार ते पाच महिन्यांच्या पत्रव्यवहारांच्यां नोंदी असलेल्या या रजिस्टरचा विषय सध्या गंभीर झाला आहे. याचा अहवाल तयार होऊनही संबंधित अधिकाºयांवर कारवाई होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी विचारणा केली, पण त्यांनाही गोंधळाची कल्पना वरिष्ठ अधिकाºयांसह स्वीय सहाय्यकांकडून कळली नसल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.>शेकडो शिक्षकांसह शाळांना होणार त्रासआवक- जावक रजिस्टरमधील फाडलेल्या पानांमध्ये कोणत्या संवेदनशील व अतिसंवेदन नोंदी होत्या, याविषयी उत्सुकता लागली असून, पद भरती, नियुक्ती, आदींच्या पत्रव्यवहाराबाबत अंदाज बांधले जात आहेत.याबाबत नवनिर्वाचित माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.या रजिस्टर विषयी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलण्याचा सल्ला बढे यांनी दिल्यामुळे या घटनेतील गांभीर्य गंभीर असल्यचे उघड होत आहे. मुख्यकार्यकारी अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.कर्मचाºयांमध्ये संतापआवक-जावक रजिस्टरमधील पाने फाडणाºया दोषींवर कारवाईचा बडगा उगारण्यासही विलंब झाल्यामुळे कर्मचाºयांमध्ये संताप व्यक्त होत असून, दोषींचा गॉडफादर कोण याविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे उपसंचालक यांच्या निदर्शनात आणले आहे.