शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक, ५९७ गुंतवणूकदारांना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 00:08 IST

पातलीपाडा येथील त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक शेलार याने सोनेखरेदी करणाऱ्यांना विविध योजनांच्या नावाखाली आकृष्ट केले होते.

ठाणे : सुवर्णयोजनेमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संतोष शेलार (५१) या ज्वेलर्समालकाला ठाणे न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या योजनेतून ५९७ जणांची एक कोटी ११ लाखांची फसवणूक झाल्याचे नौपाडा पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले आहे.पातलीपाडा येथील त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक शेलार याने सोनेखरेदी करणाऱ्यांना विविध योजनांच्या नावाखाली आकृष्ट केले होते. त्याच्या योजनेनुसार १५ महिन्यांमध्ये १५ हजार रुपये तसेच व्याजाचे तीन हजार असे प्रत्येकी १८ हजार रुपये किंवा त्याच भावातील सोन्याची वस्तू देण्याचे ठरले होते. त्यानुसार, त्याने काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा दिला. काहींना पैसे आणि सोनेही मिळवून दिले. फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात राबवलेल्या या योजनेमध्ये रामचंद्रनगर, वैतीवाडीतील प्रिया जाधव आणि त्यांचा मुलगा यांच्याकडून प्रतिमहिना एक हजार रुपये असे १५ महिने ३० हजार रुपये घेतले. त्यांना मुदतपूर्तीनंतर देय असलेली ३६ हजारांची रक्कम त्याने दिलीच नाही. अशा प्रकारे सुमारे १५० गुंतवणूकदारांकडून चार लाख १७ हजार ५०० रुपये त्याने उकळले. याप्रकरणी २७ जून २०१७ रोजी फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर आणि संजय धुमाळ यांच्या पथकाने शेलारला काही तासांमध्ये अटक केली.चौकशीमध्ये या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे उघड झाले आहे. पाच दिवसांमध्ये ५९७ गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ११ लाखांची रक्कम शेलारने उकळल्याचे उघड झाले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये त्याने सुमारे ६०० जणांची अशा प्रकारे एक कोटी ११ लाखांची फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासामध्ये उघड झाले आहे. यात आणखीही आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या गुंतवणूकदारांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी नौपाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सोंडकर यांनी केले आहे.दलालांना एक ते तीन टक्क्यांची ‘बक्षिसी’कळवा, रामचंद्रनगर, नौपाडा, पाचपाखाडी आदी ठाणे परिसरातील गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. काहींना त्याने दलाल म्हणून नियुक्ती करून त्यांना एक ते तीन टक्केदलाली तो ‘बक्षिसी’ म्हणून देत होता. अशा सुमारे ४०० दलालांनी त्यांचे मित्र, नातेवाइकांना या सुवर्णभिशीच्या भरीस पाडले. दलालांना या साखळीतून पैशांचा परतावा मिळण्यासाठी त्याने एका संगणकीय सॉफ्टवेअरचाही उपयोग केला होता. चार पगारी कर्मचारीही त्याने आपल्या दुकानात या योजनेसाठी नेमले होते.

टॅग्स :fraudधोकेबाजी