शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून विसर्जन घाटाची पाहणी, निर्माल्याचे होणार खत

By सदानंद नाईक | Updated: August 29, 2022 21:28 IST

उल्हासनगरातील गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी महापालिकेने, कैलास कॉलनी, हिराघाट, रेल्वे स्टेशन जवळ, गोल मैदान, आयडिआय कंपनी आदी ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहे.

उल्हासनगर: महापालिकेने बाप्पाच्या विसर्जनासाठी ५ ठिकाणी कुत्रीम तलावाची उभारणी करून आयडिआय कंपनी जवळील उल्हास नदी किनारी मोठ्या मूर्त्यांसाठी विसर्जन घाट बांधण्यात आला. आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी आदींनी सोमवारी कृत्रिम तलाव व विसर्जन घाटाची पाहणी केली.

उल्हासनगरातील गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी महापालिकेने, कैलास कॉलनी, हिराघाट, रेल्वे स्टेशन जवळ, गोल मैदान, आयडिआय कंपनी आदी ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहे. विसर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून पोलीस व महापालिका कर्मचारी याठिकाणी तैनात असणार आहेत. तसेच नारळ व निर्मल्य एका ठिकाणी जमा करून हिराघाट येथे निर्मल्यावर प्रक्रिया करून खत करण्यात येणार असल्याची माहिती वैधकीय अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली. आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी आदींनी कृत्रिम तलाव व विसर्जन घाटाची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामा बाबत सूचना केल्या आहेत.

 महापालिकेने आयडिआय कंपनी जवळ उल्हास नदी किनारी विसर्जन घाट बांधला असून याठिकाणी बाप्पाच्या उंच मूर्तीचे विसर्जन होणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील सार्वजनिक मंडळाच्या उंच मूर्तीला प्राधान्य दिले जाणार असून कल्याण व मुंबई आदी ठिकाणी बाप्पाचे विसर्जन न करता त्याऐवजी उल्हास नदीच्या विसर्जन करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले. 

नागरिक व गणेश मंडळासाठी विसर्जन ठिकाणी लायटिंग, मंडप व महापालिका कर्मचारी सेवेत दाखल असणार आहेत. तसेच सर्वच विसर्जन ठिकाणाहून निर्माल्य एकत्र करून त्यावर हिराघाट येथे प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. सार्वजनिक गणेश मंडळासह नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन