शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

पडघा उपकेंद्राची केंद्रीय सुरक्षा दलाकडून पाहणी; मुंबईसह पाच जिल्ह्यांना वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 13:57 IST

नेमकी पाहणी कशासाठी, माहित नसली तरी बोरिवली घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली असावी, असा अंदाज

मेघनाथ विशे, लोकमत न्यूज नेटवर्क, पडघा: बोरिवली गावातून काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विद्युत उपकेंद्र पडघा याच परिसरात आहे. अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या या उपकेंद्राची नुकतीच दिल्लीतील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत पाहणी करण्यात आली. नेमकी ही पाहणी कशासाठी झाली, हे स्पष्ट झाले नसले तरी बोरिवली घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली असावी, असा अंदाज आहे.

या उपकेंद्रासाठी पडघा, वांद्रे, जुहूपाडा, भादाणे या गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. याच उपकेंद्रातून संपूर्ण ठाणे जिल्हा, गुजरातचा काही भाग, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, पालघर, रायगड, मुंबई, नवी मुंबई येथे वीजपुरवठा केला जातो. चंद्रपूर केंद्रात वीजनिर्मिती करून ती वाहिन्यांद्वारे पडघा उपकेंद्रात आणली जाते. येथे तिचे रूपांतर करून तिचा पुरवठा केला जातो. केवळ पडघाच नव्हे, तर कळवा, खारघर, लोणीकंद येथील छोट्या उपकेंद्रांचीही सुरक्षा दलाने पाहणी केली. सध्या येथे ठाणे ग्रामीण पोलिसांंबरोबरच भांडूप सुरक्षारक्षक मंडळाचे ५८ जवान तैनात आहेत. यातील बहुतांश सुरक्षारक्षक  प्रकल्पग्रस्त, तसेच स्थानिक आहेत.

स्थानिक सुरक्षारक्षकांमध्ये अस्वस्थता

या केंद्रात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करणार असल्याच्या चर्चेमुळे स्थानिक, तसेच प्रकल्पग्रस्त सुरक्षारक्षक हवालदिल झाले आहेत. यामुळेच सुरक्षारक्षकांच्या शिष्टमंडळाने या संदर्भात अधीक्षक अभियंता राम कोल्हे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

पडघा विद्युत उपकेंद्र हे अतिसंवेदनशील असल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अतिरिक्त बळाला आमचा विरोध नाही. मात्र, यामुळे आमच्या नोकऱ्या धोक्यात येऊ नयेत, अशीच आमची मागणी आहे.-बिरबल विशे, सुरक्षा पर्यवेक्षक

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून पडघा उपकेंद्राची पाहणी करण्यात आली. त्यांनी हे अतिसंवेदनशील क्षेत्र असल्याने याची सुरक्षाव्यवस्था केंद्रीय दलाकडे असावी, असा अहवाल दिला आहे. मात्र, येथे वीस ते पंचवीस वर्षे सेवा करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर अन्याय न होता त्यांनी हे काम करावे.- अनिल बाबर, सहायक सुरक्षा अधिकारी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून राज्यातील चार प्रमुख उपकेंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा अन्य दलाकडे देण्यात यावी, या संदर्भात कोणत्याही प्रकारचा लेखी अहवाल सादर झालेला नाही.- राम कोल्हे, अधीक्षक अभियंता

 

टॅग्स :thaneठाणे