शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पडघा उपकेंद्राची केंद्रीय सुरक्षा दलाकडून पाहणी; मुंबईसह पाच जिल्ह्यांना वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 13:57 IST

नेमकी पाहणी कशासाठी, माहित नसली तरी बोरिवली घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली असावी, असा अंदाज

मेघनाथ विशे, लोकमत न्यूज नेटवर्क, पडघा: बोरिवली गावातून काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विद्युत उपकेंद्र पडघा याच परिसरात आहे. अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या या उपकेंद्राची नुकतीच दिल्लीतील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत पाहणी करण्यात आली. नेमकी ही पाहणी कशासाठी झाली, हे स्पष्ट झाले नसले तरी बोरिवली घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली असावी, असा अंदाज आहे.

या उपकेंद्रासाठी पडघा, वांद्रे, जुहूपाडा, भादाणे या गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. याच उपकेंद्रातून संपूर्ण ठाणे जिल्हा, गुजरातचा काही भाग, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, पालघर, रायगड, मुंबई, नवी मुंबई येथे वीजपुरवठा केला जातो. चंद्रपूर केंद्रात वीजनिर्मिती करून ती वाहिन्यांद्वारे पडघा उपकेंद्रात आणली जाते. येथे तिचे रूपांतर करून तिचा पुरवठा केला जातो. केवळ पडघाच नव्हे, तर कळवा, खारघर, लोणीकंद येथील छोट्या उपकेंद्रांचीही सुरक्षा दलाने पाहणी केली. सध्या येथे ठाणे ग्रामीण पोलिसांंबरोबरच भांडूप सुरक्षारक्षक मंडळाचे ५८ जवान तैनात आहेत. यातील बहुतांश सुरक्षारक्षक  प्रकल्पग्रस्त, तसेच स्थानिक आहेत.

स्थानिक सुरक्षारक्षकांमध्ये अस्वस्थता

या केंद्रात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करणार असल्याच्या चर्चेमुळे स्थानिक, तसेच प्रकल्पग्रस्त सुरक्षारक्षक हवालदिल झाले आहेत. यामुळेच सुरक्षारक्षकांच्या शिष्टमंडळाने या संदर्भात अधीक्षक अभियंता राम कोल्हे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

पडघा विद्युत उपकेंद्र हे अतिसंवेदनशील असल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अतिरिक्त बळाला आमचा विरोध नाही. मात्र, यामुळे आमच्या नोकऱ्या धोक्यात येऊ नयेत, अशीच आमची मागणी आहे.-बिरबल विशे, सुरक्षा पर्यवेक्षक

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून पडघा उपकेंद्राची पाहणी करण्यात आली. त्यांनी हे अतिसंवेदनशील क्षेत्र असल्याने याची सुरक्षाव्यवस्था केंद्रीय दलाकडे असावी, असा अहवाल दिला आहे. मात्र, येथे वीस ते पंचवीस वर्षे सेवा करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर अन्याय न होता त्यांनी हे काम करावे.- अनिल बाबर, सहायक सुरक्षा अधिकारी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून राज्यातील चार प्रमुख उपकेंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा अन्य दलाकडे देण्यात यावी, या संदर्भात कोणत्याही प्रकारचा लेखी अहवाल सादर झालेला नाही.- राम कोल्हे, अधीक्षक अभियंता

 

टॅग्स :thaneठाणे