शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

हरित लवादाच्या समितीकडून काशीमीराच्या मन ओपस संकुलाची पाहणी

By धीरज परब | Updated: December 7, 2023 11:41 IST

पर्यावरणाची हानी आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे मुद्दे

मीरारोड- काशीमीराच्या मन ओपस ह्या गृहसंकुलात विकासकाने केलेल्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणी दाखल याचिकेवर हरित लवादाच्या आदेशाने स्थापन झालेल्या समितीने संकुलाची पाहणी केली . यावेळी पर्यावरणाची हानी आणि मानवी आरोग्यास अपायकारक परिस्थिती व नियमबाह्य कामे आदी बाबी याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. 

पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते इरबा कोनापुरे व सदर संकुलात राहणारे पर्यावरणासाठी कार्यरत सय्यद साबीर यांनी विकासकाने पर्यावरण नियमांचे उल्लंघन करत केलेली कामे, गैरसोयी व रहिवाश्याना भेडसावणाऱ्या समस्या आदी बाबतीत हरित लवाद कडे याचिका दाखल केली आहे. खंडपीठाच्या आदेशाने भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय भूजल प्राधिकरण यांच्या ४ जणांच्या समितीने संकुलाची पाहणी केली. 

यावेळी कोनापुरे व साबीर यांनी समितीच्या निदर्शनास अनेक मुद्दे आणून दिले . कायद्याने बंधनकारक असून देखील  गृहनिर्माण प्रकल्प हा २० हजार चौ. मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळचा बांधत असताना ६ वर्षे ९ महिन्या नंतर प्रकल्प बांधणी साठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घेतली आहे. मलनिस्सारण केंद्र मध्ये त्रुटी असून सांडपाणी प्रक्रिया न करताच महापालिकेच्या गटारात १० एचपी पावरच्या मोटारी द्वारे बेकायदा सोडले जाते. सदर सांडपाणी संकुलात पसरून दुर्गंधी येते. गंभीर बाब म्हणजे  गृहसंकुलात लोक राहण्यास आल्यानंतर प्रकल्प चालविण्याची सम्मती हि एका वर्षानंतर घेण्यात आली. 

 एवढ्या मोठ्या गृहसंकुलात मनोरंजन मैदान जमिनीवर न दाखवता पोडियमवर बंद जागेत दाखवले आहे. बगीचा विकसित केलेला नाही. विकासकाने झाडे ही पोडियमवर लावलेली असल्याने झाडांची नैसर्गिक वाढच होणार नाही. झाडे ही जमिनीवर लावणे गरजेचे असते. पोडियमवरील मनोरंजन जागेत वाहनांची पार्किंग दाखवली आहे.

गृहसंकुलात कचरा विघटिकरण प्रकिया प्रकल्प बांधलाच नसून सरसकट कचरा महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वर नेला जातो. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाची परवानगी नघेता गृह संकुलाची बांधणी करताना बोरिंग द्वारे भूगर्भातील पाण्याचा उपसा केला गेला. सोलार पॅनल सिस्टीम बसवली नसून रेन वॉटर हार्वेस्टिंग सुद्धा कार्यान्वितनाही. गृहसंकुलाची बांधणी करताना सुपीक मातीचे जतन परीक्षण केले नाही. चारचाकी वाहने वळविण्यासाठी ७.५ मीटर इतकी जागा सोडलेली नाही आहे. पर्यावरण व्यवस्थापन हाताळणी योजनांची अमलबजावणी व त्याचा पर्यावरण अनुपालन अहवाल सादर केला नाही नसल्याचे मुद्दे समिती समोर मांडले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर