शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

संच मान्यतेला आवर घाला : शिक्षकांचे मोतेंना साकडे

By admin | Updated: February 1, 2016 01:11 IST

राज्याच्या शिक्षण विभागात सध्या संच मान्यता विषयक नवीन रचना करण्याचे काम सुरू असून यामुळे सर्व शाळांतून १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी अशी रचना करून त्यानुसार शिक्षक

वाडा : राज्याच्या शिक्षण विभागात सध्या संच मान्यता विषयक नवीन रचना करण्याचे काम सुरू असून यामुळे सर्व शाळांतून १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी अशी रचना करून त्यानुसार शिक्षक पदांची रचना केली जाणार आहे. या पटानुसार अनेक शिक्षकांची उचलबांगडी होणार असल्याने शिक्षकात घबराट असून या संच मान्यतेला आवरा, असे साकडे शिक्षकांनी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना घातले आहे.राज्य सरकारने शिक्षण विभागात प्रगत शिक्षणाची घोषणा करीत प्राथमिक शिक्षणात आर टी ई नुसार १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी असे प्राथमिक शिक्षणाचे दोन विभाग करून त्या पटनिश्चीतीप्रमाणे मुख्याध्यापक व अन्य शिक्षकांच्या संचमान्यतेनुसार नेमणुका केल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.या मुळे सध्या असलेली मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकपदे रद्द होणार असून अशा शिक्षकांना अन्य शाळांत जावे लागेल. यामुळे अनेक मुख्याध्यापक व शिक्षक कमी होणार आहेत .पूर्वी १ ली ते ७ वी इयत्तेच्या शाळेवर पटाचा विचार न करता मुख्याध्यापक पद देण्यात येत असे. हे मुख्याध्यापक वर्ग अद्यापनासह शालेयव्यवस्थापन सांभाळीत असत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये रोज नवीन येणाऱ्या परिपत्रकामुळे मुख्याध्यापकाचे काम वाढले आहे.मुख्याध्यापक पद आवश्यक असतांना पटाचीअट घातल्याने अनेक शाळातून ही पदे रद्द होणार आहेत. इंग्रजी शाळांचे पेव गावोगावी झाल्याने मराठी शाळांची पटसंख्या कमी होत आहे. याचा विचार न करता मुख्याध्यापक पदाला कात्री लावली जात आहे असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.पूर्वीच्या संरचनेनुसार १ ली ते ७ वी किंवा नवीन रचनेनुसार १ ली ते ८ वी चा पट १५० विद्यार्थी असतील तर तेथे मुख्याध्यापक पद भरले जात होते.