शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचा केवळ फार्स

By अजित मांडके | Updated: April 3, 2023 17:57 IST

जे शासनाकडून आलेले सहाय्यक आयुक्त होते, त्यांची चौकशी शासनामार्फत सुरु आहे. तर उर्वरीतांची चौकशी ही महापालिकेमार्फत सुरु आहे.

ठाणे : अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन महापालिकेतील १४ आजी, माजी सहाय्यक आयुक्तांची दोन वर्षापूर्वी चौकशी लावण्यात आली होती. मात्र दोन वर्षानंतर देखील अद्यापही त्या चौकशीची काय झाले, याचे उत्तर पालिका अधिकाºयांकडे नाही. केवळ चौकशी सुरु असल्याचेच उत्तर दिले जात असून केवळ तारीख पे तारीखच यासाठी दिली जात आहे. एकूणच यात केवळ चौकशीचा फार्सच केला जात असल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या आड ठाण्यातील विविध भागात अनाधिकृत बांधकामांचा भस्मासुर वाढल्याचे दिसून आले होते. त्यानंतर कोरोना र्निबध शिथील झाल्यानंतर याच मुद्यावरुन दोन वर्षांपूर्वी स्थायी समिती, महासभेत गदारोळ झाला होता. परंतु ज्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यकाळात अनाधिकृत बांधकामे झाले असतील अशा सर्वच आजी, माजी सहाय्यक आयुक्तांची चौकशी करुन कारवाई करावी असा ठरावही झाला होता. त्यानंतर मागील वर्षभरापासून या सहाय्यक आयुक्तांची चौकशी समिती मार्फत चौकशी सुरु आहे. जे शासनाकडून आलेले सहाय्यक आयुक्त होते, त्यांची चौकशी शासनामार्फत सुरु आहे. तर उर्वरीतांची चौकशी ही महापालिकेमार्फत सुरु आहे.

मात्र चौकशी समिती स्थापन करून दोन वर्षांचा कालावधी उलटूनही या चौकशी समितीने अद्याप कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. नेमकी या चौकशीस समितीचे झाले काय याची माहिती घेण्याचा प्रयन्त केल्यानंतर अजूनही चौकशीसाठी तारीख पे तारीखच मिळत असून केवळ सहाय्यक आयुक्तांची बाजू ऐकून घेण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महापालिका आणि शासन स्तरावर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचे नेमके चालले काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दोन वर्षांपासून केवळ या सहाय्यक आयुक्तांची चौकशीच सुरु असून दुसरीकडे या कालावधीत विशेष करून कळवा प्रभाग समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. तसेच अजूनही काही भागात ही बांधकामे उभी राहत आहेत. त्यामुळे या चौकशीमधून साध्य काय होणार आहे असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

टॅग्स :thaneठाणे