शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी करा; बसच्या दुरवस्थेबाबत सदस्य संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:49 IST

केडीएमटीच्या ६९ बसची समितीकडून पाहणी

कल्याण : जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत केडीएमसीच्या परिवहन विभागाने खरेदी केलेल्या ६९ बस देखभाल दुरुस्तीअभावी लिलावात काढण्याची वेळ का आली, बसच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, सात वर्षांतच बस भंगारात निघण्याचे कारण काय?, असा सवाल पाहणी समितीने मंगळवारी केला. दरम्यान, आता समितीच्या निर्णयानंतर बस भंगारात अथवा लिलावात काढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.केडीएमटीच्या ६९ बस भंगार अथवा लिलावात काढण्याचा प्रस्ताव आगस्टच्या महासभेच चर्चेला आला होता. त्यावेळी त्याला शिवसेना सदस्य सचिन बासरे यांनी जोरदार विरोध केला होता. इतक्या कमी कालावधीत देखभाल दुरुस्तीअभावी बस भंगार अथवा लिलावात काढणे योग्य आहे का? या बसची पाहणी केल्याशिवाय निर्णय घेऊ नये, असा मुद्दा उपस्थित केल्याने हा विषय स्थगित ठेवला होता. त्यामुळे महापौर विनीता राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंगळवारी मेट्रो मॉलच्या आवारातील ६९ बसची पाहणी केली. यावेळी राणे, स्थायीचे सभापती दीपेश म्हात्रे, भाजप गटनेते विकास म्हात्रे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी, शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर, परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी, नगरसेवक सचिन बासरे, सुधीर बासरे, अभिमन्यू गायकवाड आणि परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके आदी उपस्थित होते.बसच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करावी, अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली. मेट्रो मॉलमधील बसवर वेली, तर इंजिनमध्ये झुडुपे उगविली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.केडीएमसीने नेहरु नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत मिळालेल्या निधीतून ६९ बस २०११ मध्ये खरेदी केल्या होत्या. या बस २०१७ पासून मेट्रो मॉलच्या परिसरात उभ्या आहेत. केवळ सहा ते सात वर्षेच त्या रस्त्यावर धावल्या. देखभाल दुरुस्ती व पुरेसे कर्मचारी नसल्याने या बस धूळ खात पडलेल्या आहेत. सातच वर्षांत या बस भंगारात कशा निघल्या, असा सवाल यावेळी सदस्यांनी केला.महापालिकेतील १२२ नगरसेवकांनी त्यांच्या निधीतील एक लाख रुपये बसच्या दुरुस्तीसाठी दिल्यास एक कोटी २२ लाखांचा निधी जमू शकतो. निधी देण्याची सदस्यांची तयारी असली तरी ६९ बस चालविण्यासाठी २३८ कर्मचारी लागणार आहेत. तो कुठून आणणार, असा सवाल प्रशासनाचा आहे. त्यामुळे या बस जेसीसी तत्वावर दिल्यास कंत्राटदार उर्वरित सगळा खर्च करणार आहे. त्यातून एका बसमागे केवळ दोन हजार रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळणार आहे. महापालिकेचा हा तोटा विचारात घेऊन सदस्यांनी जेसीसीला विरोध केला आहे.मेट्रो मॉल परिसरातील बसच्या पाहणीनंतर समितीने त्यांचा मोर्चा गणेशघाट येथील परिवहन कार्यशाळेकडे वळविला. तेथे ४९ बस भंगारात सडत आहेत. या बस इंजिन घोटाळ्यातील असल्याने त्या भंगारात काढण्याविषयीचा निर्णय घेतला जात नसल्याचे प्रशासनाकडून समितीला सांगण्यात आले. यंदा झालेल्या अतिवृष्टीचा फटका या कार्यशाळेस बसला. कार्यशाळा पडण्याच्या बेतात असल्याने तेथे जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे कार्यशाळा दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडून का आणला जात नाही, असा सवाल सदस्यांनी यावेळी केला.एसी बस ठरताहेत पांढरा हत्तीसमितीने वसंत व्हॅली येथील बाळासाहेब ठाकरे परिवहन डेपोचीही पाहणी केली. तेथे दोन एसी बस होत्या. तर, अन्य बसची चाके काढून ठेवलेली होती. परिवहनकडे केवळ ८० बस चालविण्याचे कर्मचारी आहेत.परिवहनने घेतलेल्या एसी व्होल्वो बसचे इंजिन ‘बीएस-३’ प्रकारातील होते. परंतु, या बसच्या एका किलोमीटरमागे ४८ रुपये तोटा होत आहे.त्यामुळे बसखरेदी करताना याबाबी विचारात घेतल्या नाहीत का? या बसच्या देखभाल दुरुस्तीचे नियोजन नसल्याने बस असूनही प्रवाशांच्या सेवेत नसल्याचा मुद्दाही सदस्यांनी यावेळी मांडला.