शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलिअरची सक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलिअरची सक्ती केली जात आहे. ही सक्ती तातडीने मागे न घेतल्यास राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्य शासनाला दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना शुक्रवारी निवेदन दिले आहे.

मुंबई एमएमआर क्षेत्रासह राज्यातील अन्य भागांत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र देण्याची सक्ती विद्यार्थ्यांना केली जात आहे. त्याचा फटका राज्यातील ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी व एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बसत आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत ३० ऑगस्ट असून एवढ्या कमी कालावधीत नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालकांना कसरत करावी लागणार आहे. तर, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागणार असून, हा त्यांच्यावर अन्याय ठरणार आहे.

‘प्रवेश प्रक्रियेनंतर प्रमाणपत्र विद्यार्थी देऊ शकतात’

- मागील वर्षी अशा प्रमाणपत्राची अट शालेय शिक्षण विभागाने टाकली नव्हती. यंदाही कोरोनाकाळ पाहता नॉन क्रिमिलिअरची सक्ती करू नये. प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर नॉन क्रिमिलिअरचे प्रमाणपत्र विद्यार्थी देऊ शकतात.

- त्याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा नाइलाजास्तव या अन्यायाविरोधात शालेय शिक्षण विभागाविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा पवार यांनी शासनाला दिला.

-------------------