शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अकरावी प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलिअरची सक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलिअरची सक्ती केली जात आहे. ही सक्ती तातडीने मागे न घेतल्यास राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्य शासनाला दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना शुक्रवारी निवेदन दिले आहे.

मुंबई एमएमआर क्षेत्रासह राज्यातील अन्य भागांत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र देण्याची सक्ती विद्यार्थ्यांना केली जात आहे. त्याचा फटका राज्यातील ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी व एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बसत आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत ३० ऑगस्ट असून एवढ्या कमी कालावधीत नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालकांना कसरत करावी लागणार आहे. तर, या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागणार असून, हा त्यांच्यावर अन्याय ठरणार आहे.

‘प्रवेश प्रक्रियेनंतर प्रमाणपत्र विद्यार्थी देऊ शकतात’

- मागील वर्षी अशा प्रमाणपत्राची अट शालेय शिक्षण विभागाने टाकली नव्हती. यंदाही कोरोनाकाळ पाहता नॉन क्रिमिलिअरची सक्ती करू नये. प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर नॉन क्रिमिलिअरचे प्रमाणपत्र विद्यार्थी देऊ शकतात.

- त्याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा नाइलाजास्तव या अन्यायाविरोधात शालेय शिक्षण विभागाविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा पवार यांनी शासनाला दिला.

-------------------