शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

खाजगी कंपन्यांचा पुढाकार; गावपाड्यांची तीव्र पाणीटंचाई संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:57 IST

मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे.

ठाणे : मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांतील गाळ काढून त्यांची पाणीसाठवण क्षमता वाढवणार आहे. तर, काढलेला गाळ माळरानावर पसरवून गाळयुक्त शिवाराची ११६ कामे खाजगी कंपन्यांद्वारे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.जागतिक जल दिनाचा कार्यक्रम नियोजन भवन सभागृहात गुरुवारी पार पडला. त्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी ११६ कामे सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून हाती घेण्यासाठी छोट्यामोठ्या कंपन्या पुढे आल्याची माहिती उघड झाली. या कार्यक्रमास माजी आ. दिगंबर विशे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, अधीक्षक अभियंता बा.भा. लोहार, सहा. आयुक्त उदयकुमार शिरूरकर, वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील लहान, मोठ्या कंपन्यांना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्र देऊन आदिवासी गावांमध्ये पाणीसाठवण क्षमता वाढेल, असे तलाव, बंधाऱ्यांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, छोटे बंधारे, रिचार्ज शाफ्ट, विहिरी नूतनीकरण, दुरुस्तीकरण अशी विविध कामे सीएसआरमधून करण्याचे आवाहन कंपन्यांना केले. त्यास अनुसरून यंदा ११६ कामे जिल्ह्यात विविध ठिकाणी कंपन्यांकडून केली जात आहेत.जिल्ह्यातील ११६ कामांपैकी लघुपाटबंधारे विभागाकडून ५० कामे, विहीर दुरु स्तीसारखी ३६ कामे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे होणार आहेत. जलसंधारणच्या नियंत्रणातून केटी बंधाºयांसारख्या १० कामांसह छोटे बंधारे बांधले जाणार आहेत. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून १० कामे प्राधान्याने यंदा होतील. या कामांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करून शेतीला देखील मुबलक पाणी देणे शक्य असल्याचे उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी यांनी सांगितले.जलयुक्त शिवार कामांसाठी यंदा ४४ गावांची निवडयंदा शहापूर, मुरबाड, भिवंडी या ग्रामीण तालुक्यांसह कल्याण, अंबरनाथ या शहरी तालुक्यांच्या ग्रामीण क्षेत्रातील जलयुक्त शिवारच्या कामांसाठी ४४ गावांची निवड झाली आहे. यातील काही गावे आदिवासी क्षेत्रातील आहेत, तर २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवारसाठी २६ आणि २०१६ -१७ साठी १८ गावे निवडली होती. मागील वर्षीदेखील पाण्यासाठी जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत विविध कंपन्या आणि संस्थांचे पाठबळ घेतले होते.यादरम्यान जिल्हा प्रशासनाने ८० कामे करून १.१७ लाख घनमीटर गाळ काढला होता. याप्रमाणेच यंदाही या योजनेतूनच जिल्ह्यात ११६ कामे कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून घेण्यात आली आहेत. मुरबाड तालुक्यातील कनकवीरा नदी जिवंत झाल्याचे आनंद भागवत यांनी यावेळी सांगितले. पाण्याची निर्मिती करता येत नाही, पण पाण्याची बचत आपण करू शकतो.याशिवाय, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला पाहिजे, असे उदयकुमार शिरूरकर यांनी नमूद केले. ठाणे पाटबंधारे विभागाने जलजागृती सप्ताहात विविध कार्यक्र म, स्पर्धा, पथनाट्ये, जलरथ या माध्यमांतून जनजागृती केली आणि नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्याचे लोहार यांनी स्पष्ट केले. पाण्याचे रिसायकलिंग केल्यास पाण्याचा नाश थांबवणेदेखील शक्य असल्याचे त्यांनी यावेळी पटवून दिले.

टॅग्स :thaneठाणे