शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

खाजगी कंपन्यांचा पुढाकार; गावपाड्यांची तीव्र पाणीटंचाई संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:57 IST

मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे.

ठाणे : मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांतील गाळ काढून त्यांची पाणीसाठवण क्षमता वाढवणार आहे. तर, काढलेला गाळ माळरानावर पसरवून गाळयुक्त शिवाराची ११६ कामे खाजगी कंपन्यांद्वारे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.जागतिक जल दिनाचा कार्यक्रम नियोजन भवन सभागृहात गुरुवारी पार पडला. त्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी ११६ कामे सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून हाती घेण्यासाठी छोट्यामोठ्या कंपन्या पुढे आल्याची माहिती उघड झाली. या कार्यक्रमास माजी आ. दिगंबर विशे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, अधीक्षक अभियंता बा.भा. लोहार, सहा. आयुक्त उदयकुमार शिरूरकर, वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील लहान, मोठ्या कंपन्यांना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्र देऊन आदिवासी गावांमध्ये पाणीसाठवण क्षमता वाढेल, असे तलाव, बंधाऱ्यांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, छोटे बंधारे, रिचार्ज शाफ्ट, विहिरी नूतनीकरण, दुरुस्तीकरण अशी विविध कामे सीएसआरमधून करण्याचे आवाहन कंपन्यांना केले. त्यास अनुसरून यंदा ११६ कामे जिल्ह्यात विविध ठिकाणी कंपन्यांकडून केली जात आहेत.जिल्ह्यातील ११६ कामांपैकी लघुपाटबंधारे विभागाकडून ५० कामे, विहीर दुरु स्तीसारखी ३६ कामे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे होणार आहेत. जलसंधारणच्या नियंत्रणातून केटी बंधाºयांसारख्या १० कामांसह छोटे बंधारे बांधले जाणार आहेत. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून १० कामे प्राधान्याने यंदा होतील. या कामांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करून शेतीला देखील मुबलक पाणी देणे शक्य असल्याचे उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी यांनी सांगितले.जलयुक्त शिवार कामांसाठी यंदा ४४ गावांची निवडयंदा शहापूर, मुरबाड, भिवंडी या ग्रामीण तालुक्यांसह कल्याण, अंबरनाथ या शहरी तालुक्यांच्या ग्रामीण क्षेत्रातील जलयुक्त शिवारच्या कामांसाठी ४४ गावांची निवड झाली आहे. यातील काही गावे आदिवासी क्षेत्रातील आहेत, तर २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवारसाठी २६ आणि २०१६ -१७ साठी १८ गावे निवडली होती. मागील वर्षीदेखील पाण्यासाठी जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत विविध कंपन्या आणि संस्थांचे पाठबळ घेतले होते.यादरम्यान जिल्हा प्रशासनाने ८० कामे करून १.१७ लाख घनमीटर गाळ काढला होता. याप्रमाणेच यंदाही या योजनेतूनच जिल्ह्यात ११६ कामे कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून घेण्यात आली आहेत. मुरबाड तालुक्यातील कनकवीरा नदी जिवंत झाल्याचे आनंद भागवत यांनी यावेळी सांगितले. पाण्याची निर्मिती करता येत नाही, पण पाण्याची बचत आपण करू शकतो.याशिवाय, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला पाहिजे, असे उदयकुमार शिरूरकर यांनी नमूद केले. ठाणे पाटबंधारे विभागाने जलजागृती सप्ताहात विविध कार्यक्र म, स्पर्धा, पथनाट्ये, जलरथ या माध्यमांतून जनजागृती केली आणि नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्याचे लोहार यांनी स्पष्ट केले. पाण्याचे रिसायकलिंग केल्यास पाण्याचा नाश थांबवणेदेखील शक्य असल्याचे त्यांनी यावेळी पटवून दिले.

टॅग्स :thaneठाणे