शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

भिवंडीतील इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयाचे होणार अधुनिकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:09 IST

शासनाच्या प्रॉपर्टी रजिस्टर बुकात इंदिरागांधी स्मृती रूग्णालयाच्या इमारतीची नोंद

ठळक मुद्देनाममात्र भाड्याने हॉस्पिटलचे शासनाकडे ३० वर्षाकरीता हस्तांतरणडॉक्टरांच्या कमतरतेमुळे रूग्णांना उपचारासाठी मुंबईतील रूग्णालयांत न्यावे लागत होतेआयसीयूच्या सुविधेसह स्कॅनमशीन,डायलेसीस मशीन सारख्या विविध मोठ्या अत्याधुनिक मशीन लागणार

भिवंडी : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रॉपर्टी रजिस्टर बुकात शहरातील इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांच्या इमारतीची नोंद झाल्याने इमारतीच्या नुतनीकरणासह अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे हॉस्पिटल काही महिन्यात रूग्णाच्या सोयीसाठी सज्ज होणार आहे.शासनाच्या निर्णयाने होणाºया अधुनिकीकरणाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे.शहरात भव्य बांधकाम असलेल्या पालिकेच्या स्व.इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांचे उद््घाटन सन १९८५ साली झाले. जकातीपासून मिळणाºया उत्पन्नामुळे श्रीमंत झालेल्या पालिकेने हे हॉस्पिटल चांगले चालविले होते. पंरतू शासनाने जकात बंद केल्याने हा सफेदहत्ती पोसता येणे अशक्य झाल्याने स्थानिक लोकप्रतिनीधींनी व पालिका प्रशासनाने नाममात्र भाड्याने हॉस्पिटलचे शासनाकडे ३० वर्षाकरीता हस्तांतरण केले. त्यामुळे शासनाने २०११साली या रुग्णालयांस उपजिल्ह्याचा दर्जा देऊन रूग्णांना सोयी देण्याचा प्रयत्न केला. परंतू रूग्णालयांत दररोजची ८००पेक्षा जास्त बाह्यरूग्ण व डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रूग्णांना उपचारासाठी मुंबईतील रूग्णालयांत न्यावे लागत होते. त्यामुळे रूग्णांना येथेच उपचार व सुविधा मिळण्याच्या हेतूने शहरातील स्थानिक नागरिक व लोकप्रतिनीधींनी शासनाकडे पत्र व्यवहार सुरू केला. त्यास ‘लोकमत’ने वाचा फोडून शासनापुढे रूग्णालयांची बाजू मांडली. शासनाने त्याची दखल घेत रूग्णांच्या हितासाठी विशेष प्रयोजनाने इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांची इमारतीची नोंद शासनाच्या दप्तरी करण्यात पुढाकार घेतला. वास्तविक नाममात्र भाड्याच्या इमारतीवर शासननियमाप्रमाणे मान्यता मिळत नाही. परंतू लोकहितातून शासनाने हा निर्णय घेतल्याचे पत्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांच्या व्यवस्थापनाला पाठविले आहे.मागील आठवड्यात अन्न विषबाधा झालेल्या मदरशामधील २८ विद्यार्थ्यांना मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. ही घटना ताजी असताना हे रूग्णालय शासनाच्या दप्तरी नोंद होऊन त्याचे अधुनिकीकरण होणार असल्याची बातमी मिळाल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.या इमारतीमध्ये नवीन अत्याधुनिक मशीन लावण्यासाठी योग्य तो बदल करण्यात येणार असुन रूग्णांसाठी आयसीयूची देखील सुविधा होणार आहे.तसेच स्कॅनमशीन,डायलेसीस मशीन सारख्या विविध मोठ्या अत्याधुनिक मशीन येणार आहेत.तसेच डॉक्टरांच्या संख्येत व खाटांच्या संख्येत वाढ होणार असल्याने शक्यतोवर रूग्णांना मुंबईला पाठविण्याऐवजी या रूग्णालयांत उपचार मिळावेत अशी सोय उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे,अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनिल थोरात यांनी दिली.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीhospitalहॉस्पिटल