शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे- किरण पुरदंरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 20:26 IST

इंदिरा प्रिय दर्शनी पुरस्कार माणसांना दिला जातो. खरे तर हा पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे. कारण पक्षी जंगल तयार करतात. मनुष्य जंगल निर्माण करू शकत नाही, असे मत राष्ट्रीय ख्यातीचे पक्षीमित्र किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.

डोंबिवली- निसर्गात अनेक झाडे नकळत येत असतात. ती झाडे पक्ष्यांनी वाढविलेली असतात. पक्षी फळे खातात. त्यापासून दूर जाऊन त्यांची विष्ठा फैलाविलेली दिसते. बीज प्रसार होतो. निसर्गातील  विविध घटकांनी , पक्ष्यांनी ती झाडे लावलेली असतात. इंदिरा प्रिय दर्शनी पुरस्कार माणसांना दिला जातो. खरे तर हा पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे. कारण पक्षी जंगल तयार करतात. मनुष्य जंगल निर्माण करू शकत नाही, असे मत राष्ट्रीय ख्यातीचे पक्षीमित्र किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.    सवाई कट्टा यांच्यातर्फे  स.वा. जोशी विद्यालयाच्या पटांगणात ‘‘पक्ष्यांच्या दुनियेत फेरफटका’’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पुरंदरे बोलत होते. तब्बल 1क्क् हून अधिक पक्ष्यांचे हुबेहुबे आवाज काढणा:या पुरंदरे यांनी अनेक पक्ष्यांचे आवाज काढून प्रेक्षकांची दाद मिळविली. यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.    पुरंदरे म्हणाले, पक्ष्यांची निर्मिती सुमारे 15 कोटी वर्षापूर्वी झाली आहे. अंगावर पिसे आहे, त्याला चोच आहे, साधारणपणो उडणारा त्याला पक्षी म्हणतात. पक्ष्यांचा रंग , आकार वेगवेगळा आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ते वेगवेगळे आवाज करतात. पक्षी वेगवेगळ्य़ा ठिकाणी सापडतात. झाडावर, जंगलात, मनुष्यवस्तीच्या आसपास आणि पाण्यात आढळतात. भारतात 13क्क् जातीचे पक्षी आढळतात. पक्ष्यांना संरक्षणासाठी निसर्गाने काहीतरी दिले आहे. पक्षी ज्या अवयवांचा जास्तीत जास्त वापर करतात त्याचा जास्तीत जास्त विकास होतो. पक्षांचे डोळे लहान असतात तरी देखील त्यांनी जमिनीत चोच घुसविली की त्याठिकाणी काय आहे ते त्यांना समजते. स्पर्शाने पक्षी भक्ष्य शोधून काढू शकतात. कारण त्यांची चोच संवदेनशील असते. वटवाघूळ एका दिवसात 8क् किमी प्रवास करतात. कारण त्यांचे पंख शक्तीशाली असतात. पक्षी कोणत्या पर्यावरणात राहतात. त्यावर ते किती वर्ष जगणार हे ठरते. पक्ष्यांचे अन्न काय आहे हे शोधले की ते कुठे राहतात हे शोधता येते. आपल्याकडे अनेक लहान- मोठे पक्षी आढळतात. निसर्गात ते महत्त्वाचे भूमिका बजावित असतात. म्हणून त्यांना पाहिले पाहिजे. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांचे संरक्षण केले पाहिजे. पक्ष्यांची विष्ठेचा वापर उत्तम खत म्हणून केला जाऊ शकतो. त्यांची विष्ठा, जीवामृत आणि त्यावर पेंडा टाकल्यास ते उत्तम खत होते. त्यावर कोणतेही प्रक्रिया करावी लागत नाही. त्यामुळे जमीन सुपीक होते. पक्षी अंडी ठेवण्याची सुरक्षित जागा म्हणून घरटयाकडे पाहतात. धामण सुगरणांची घरटय़ात जाऊन अंडी खातात. किडय़ाच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम पक्षी करतात. गरूडाचे घरटे 16 फूट उंच होते. त्याच घरटय़ाच्या खाली इतर पक्षीही राहतात. निसर्गातील कोणतेची गोष्ट काढून टाकू नका. म्हणोच त्यांची घरटी काढू नका. पक्षी आपल्या घरटय़ांना प्लॉस्टिक वापरू लागले आहे हे आढळून आले आहे. सलीम अली यांचे बुक ऑफ इंडियन बर्डस हे पुस्तक वाचायला खूप चांगले आहे. कारण त्यांनी स्वत: निरीक्षण करून ते पुस्तक लिहीले आहे, असे ही पुरंदरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Natureनिसर्गthaneठाणे