शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

भारताने अनुकरणाऐवजी नावीन्याचा ध्यास घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:25 IST

भारताने अनुकरण किंवा प्रतिबंधापुरते मर्यादित न राहता सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

ठाणे : भारताने अनुकरण किंवा प्रतिबंधापुरते मर्यादित न राहता सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांचा गडकरी रंगायतन येथे शनिवारी अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. माशेलकर बोलत होते. ते म्हणाले की, देव आपल्याला घडवत असतो, असे म्हणतात. परंतु, देव काही माणसे फुरसतीने घडवत असतो. देवाने समेळांना घडवले, तेव्हा त्याच्याकडे फुरसत होती, वेळ होता. खरी मोठी माणसं ही झपाटलेली असतात व समेळांसारखा झपाटलेला मित्र मला मिळाला, याचा अभिमान आहे. १२ मे २०४३ रोजीही आपण इथे भेटू, असे समेळ यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.समेळ यांनी ७५ व्या वर्षाप्रमाणे १०० व्या वर्षीही बोलवावे, ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीची १०० वी आवृत्ती प्रकाशित करावी आणि ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’प्रमाणे ‘मी अशोक समेळ चिरंजीव’ हे पुस्तक यावे, या तीन इच्छा डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, व्यक्ती या निघून जातात; पण संस्था कधीही जात नसतात. समेळ ही एक संस्था आहे आणि संस्था या नेहमीच चिरंजीव राहतात.ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर म्हणाले की, अश्रूंची झाली फुले या नाटकात मी आणि समेळ यांनी एकत्र काम केले आहे. सर्व क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. प्रत्येक जण पंचाहत्तरी पूर्ण करतो, परंतु यशस्वी व्यक्तीचाच अमृत महोत्सव अशा पद्धतीने साजरा होत असतो.समेळ यांच्या लेखणीची जोरदार ताकद आहे. त्यांचे लिखाण अद्भुत, अप्रतिम आहे, अशा शब्दांत राजेंद्र बुटाला यांनी त्यांचे कौतुक केले. जी मैत्री पारदर्शी व निरपेक्ष असते, ती खूप वर्षे टिकते, अशीच माझी आणि समेळ यांची मैत्री असल्याचे अभिनेत्री फय्याज म्हणाल्या.समेळ लिखित ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीवर मालिका, चित्रपट निघाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी त्यांचे लेखन थांबवू नये, असे पंचागकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले. त्यानिमित्ताने त्यांच्या ‘स्वगत’ या आत्मचिंतनाचे व ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. संजय केळकर, डॉ. नरेश शहा, जयेंद्र साळगावकर, उपेंद्र दाते, प्रसाद कांबळी, भूषण तेलंग, अशोक बागवे उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले.