शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भारताने अनुकरणाऐवजी नावीन्याचा ध्यास घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:25 IST

भारताने अनुकरण किंवा प्रतिबंधापुरते मर्यादित न राहता सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

ठाणे : भारताने अनुकरण किंवा प्रतिबंधापुरते मर्यादित न राहता सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांचा गडकरी रंगायतन येथे शनिवारी अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. माशेलकर बोलत होते. ते म्हणाले की, देव आपल्याला घडवत असतो, असे म्हणतात. परंतु, देव काही माणसे फुरसतीने घडवत असतो. देवाने समेळांना घडवले, तेव्हा त्याच्याकडे फुरसत होती, वेळ होता. खरी मोठी माणसं ही झपाटलेली असतात व समेळांसारखा झपाटलेला मित्र मला मिळाला, याचा अभिमान आहे. १२ मे २०४३ रोजीही आपण इथे भेटू, असे समेळ यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.समेळ यांनी ७५ व्या वर्षाप्रमाणे १०० व्या वर्षीही बोलवावे, ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीची १०० वी आवृत्ती प्रकाशित करावी आणि ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’प्रमाणे ‘मी अशोक समेळ चिरंजीव’ हे पुस्तक यावे, या तीन इच्छा डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, व्यक्ती या निघून जातात; पण संस्था कधीही जात नसतात. समेळ ही एक संस्था आहे आणि संस्था या नेहमीच चिरंजीव राहतात.ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर म्हणाले की, अश्रूंची झाली फुले या नाटकात मी आणि समेळ यांनी एकत्र काम केले आहे. सर्व क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. प्रत्येक जण पंचाहत्तरी पूर्ण करतो, परंतु यशस्वी व्यक्तीचाच अमृत महोत्सव अशा पद्धतीने साजरा होत असतो.समेळ यांच्या लेखणीची जोरदार ताकद आहे. त्यांचे लिखाण अद्भुत, अप्रतिम आहे, अशा शब्दांत राजेंद्र बुटाला यांनी त्यांचे कौतुक केले. जी मैत्री पारदर्शी व निरपेक्ष असते, ती खूप वर्षे टिकते, अशीच माझी आणि समेळ यांची मैत्री असल्याचे अभिनेत्री फय्याज म्हणाल्या.समेळ लिखित ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीवर मालिका, चित्रपट निघाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी त्यांचे लेखन थांबवू नये, असे पंचागकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले. त्यानिमित्ताने त्यांच्या ‘स्वगत’ या आत्मचिंतनाचे व ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. संजय केळकर, डॉ. नरेश शहा, जयेंद्र साळगावकर, उपेंद्र दाते, प्रसाद कांबळी, भूषण तेलंग, अशोक बागवे उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले.