शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

भारताने अनुकरणाऐवजी नावीन्याचा ध्यास घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:25 IST

भारताने अनुकरण किंवा प्रतिबंधापुरते मर्यादित न राहता सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

ठाणे : भारताने अनुकरण किंवा प्रतिबंधापुरते मर्यादित न राहता सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांचा गडकरी रंगायतन येथे शनिवारी अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. माशेलकर बोलत होते. ते म्हणाले की, देव आपल्याला घडवत असतो, असे म्हणतात. परंतु, देव काही माणसे फुरसतीने घडवत असतो. देवाने समेळांना घडवले, तेव्हा त्याच्याकडे फुरसत होती, वेळ होता. खरी मोठी माणसं ही झपाटलेली असतात व समेळांसारखा झपाटलेला मित्र मला मिळाला, याचा अभिमान आहे. १२ मे २०४३ रोजीही आपण इथे भेटू, असे समेळ यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.समेळ यांनी ७५ व्या वर्षाप्रमाणे १०० व्या वर्षीही बोलवावे, ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीची १०० वी आवृत्ती प्रकाशित करावी आणि ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’प्रमाणे ‘मी अशोक समेळ चिरंजीव’ हे पुस्तक यावे, या तीन इच्छा डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, व्यक्ती या निघून जातात; पण संस्था कधीही जात नसतात. समेळ ही एक संस्था आहे आणि संस्था या नेहमीच चिरंजीव राहतात.ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर म्हणाले की, अश्रूंची झाली फुले या नाटकात मी आणि समेळ यांनी एकत्र काम केले आहे. सर्व क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. प्रत्येक जण पंचाहत्तरी पूर्ण करतो, परंतु यशस्वी व्यक्तीचाच अमृत महोत्सव अशा पद्धतीने साजरा होत असतो.समेळ यांच्या लेखणीची जोरदार ताकद आहे. त्यांचे लिखाण अद्भुत, अप्रतिम आहे, अशा शब्दांत राजेंद्र बुटाला यांनी त्यांचे कौतुक केले. जी मैत्री पारदर्शी व निरपेक्ष असते, ती खूप वर्षे टिकते, अशीच माझी आणि समेळ यांची मैत्री असल्याचे अभिनेत्री फय्याज म्हणाल्या.समेळ लिखित ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीवर मालिका, चित्रपट निघाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी त्यांचे लेखन थांबवू नये, असे पंचागकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले. त्यानिमित्ताने त्यांच्या ‘स्वगत’ या आत्मचिंतनाचे व ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. संजय केळकर, डॉ. नरेश शहा, जयेंद्र साळगावकर, उपेंद्र दाते, प्रसाद कांबळी, भूषण तेलंग, अशोक बागवे उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले.