शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

अंबरनाथमध्ये बुधवारी ‘इंडिया प्लॉग रन’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:53 IST

अंबरनाथ : अंबरनाथ शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शहरात चालतचालत प्लास्टिक कचऱ्याचे संकलन ( इंडिया प्लॉग रन) चे २ आॅक्टोबर रोजी ...

अंबरनाथ : अंबरनाथ शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शहरात चालतचालत प्लास्टिक कचऱ्याचे संकलन ( इंडिया प्लॉग रन) चे २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाने ‘स्वच्छता ही सेवा’ योजनेंतर्गत देशातील ५२ शहरांची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील सात शहरांमधून अंबरनाथ शहराची निवड केली आहे, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी देविदास पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालिकेचे स्वच्छतादूत सलील जव्हेरी, आरोग्य अधिकारी सुरेश पाटील, प्रकल्पप्रमुख काशीद आणि संचित आदी यावेळी उपस्थित होते.घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्तीसाठी पालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध स्तरांवर निर्णय घेण्यात आले. शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची बैठक बोलावून विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांपर्यंत प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती केली. याशिवाय, प्रभागातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती. या उपक्र माला सर्व लोकप्रतिनिधी, बचत गट, धार्मिक संस्था यांचे योग्य सहकार्य लाभल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.गांधी जयंतीला २ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून इंडिया प्लॉग रनला आर्ट आॅफ लिव्हिंग, योगाचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सुरु वात होणार आहे. सकाळपासूनच शहरातील प्रत्येक प्रभागांत शालेय विद्यार्थी, पालक घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करणार आहेत. याशिवाय, रस्त्यावरील प्लास्टिक गोळा करून शहराच्या ठरवून दिलेल्या ठिकाणी जमा केले जाईल. त्यानंतर जमा झालेले प्लास्टिक पालिकेकडे जमा केले जाणार आहे. जमा झालेल्या प्लास्टिकवर पुनर्वापर प्रक्रि या केली जाणार आहे. यासाठी एका कंपनीशी करार झाला आहे. त्यामुळे अंबरनाथ प्लास्टिकमुक्त शहर होण्यास हातभार लागणार आहे. यासाठी शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातून सायकल रॅली काढण्यात येणार आहे. प्लास्टिकचा वापर करणाºया २८३ जणांवर नगरपालिकेने कारवाई करून साडेआठ कोटी दंडवसुली केल्याचे मुख्याधिकारी पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीthaneठाणे