शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

जिल्ह्यात काल्हेरमधून राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे वाटपास प्रारंभ

By सुरेश लोखंडे | Updated: August 6, 2022 18:55 IST

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे शेकडो नागरिकांना वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना, १३ ते १५ ऑगस्टपर्यंत घराघरांवर तिरंगा फडकविण्यासाठी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने काल्हेर येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे शेकडो नागरिकांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांची उपस्थिती होती.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात असून, ठिकठिकाणी राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे वितरण केले. प्रत्येक घराबरोबरच महत्वाच्या इमारती, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींची कार्यालये आदी ठिकाणी तिरंगा फडकविला जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात तिरंगा वाटप कार्यक्रमाला सुरूवात झाली.जिल्हा परिषदेच्या भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शाळेत तिरंगा ध्वजाचे आज वितरण करण्यात आले. यावेळी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, प्रकल्प संचालिका छाया शिसोदे, तहसीलदार अधिक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंत पाटील, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे आदींची उपस्थिती होती.

प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाविषयी आत्मियता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. तर देशप्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने मोहिमेत हिरीरीने सहभागी व्हावे, असे आवाहन बोर्हाडे  यांनी केले. स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याबरोबरच राष्ट्राभिमान जागविण्यासाठी घराघरावर झेंडा फडकवावा, असे आवाहन सुभाष पवार यांच्याकडून करण्यात आले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनthaneठाणे