शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जिल्ह्यात काल्हेरमधून राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे वाटपास प्रारंभ

By सुरेश लोखंडे | Updated: August 6, 2022 18:55 IST

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे शेकडो नागरिकांना वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना, १३ ते १५ ऑगस्टपर्यंत घराघरांवर तिरंगा फडकविण्यासाठी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने काल्हेर येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे शेकडो नागरिकांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांची उपस्थिती होती.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात असून, ठिकठिकाणी राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे वितरण केले. प्रत्येक घराबरोबरच महत्वाच्या इमारती, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींची कार्यालये आदी ठिकाणी तिरंगा फडकविला जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात तिरंगा वाटप कार्यक्रमाला सुरूवात झाली.जिल्हा परिषदेच्या भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शाळेत तिरंगा ध्वजाचे आज वितरण करण्यात आले. यावेळी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, प्रकल्प संचालिका छाया शिसोदे, तहसीलदार अधिक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंत पाटील, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे आदींची उपस्थिती होती.

प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाविषयी आत्मियता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. तर देशप्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने मोहिमेत हिरीरीने सहभागी व्हावे, असे आवाहन बोर्हाडे  यांनी केले. स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याबरोबरच राष्ट्राभिमान जागविण्यासाठी घराघरावर झेंडा फडकवावा, असे आवाहन सुभाष पवार यांच्याकडून करण्यात आले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनthaneठाणे