शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाकरिता महिलांसाठी स्वतंत्र रांग कागदावरच !

By admin | Updated: February 29, 2016 01:43 IST

डोंबिवलीकर महिलांसाठी अधिकृत रिक्षा स्टँडवर स्वतंत्र रांगेचा प्रस्ताव १९ जुलै २०१४ रोजी शहर वाहतूक शाखा व रामनगर पोलीस ठाण्याला आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला होता.

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीडोंबिवलीकर महिलांसाठी अधिकृत रिक्षा स्टँडवर स्वतंत्र रांगेचा प्रस्ताव १९ जुलै २०१४ रोजी शहर वाहतूक शाखा व रामनगर पोलीस ठाण्याला आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला होता. मात्र त्यास आता दोन वर्षे उलटून गेली तरी त्याची अंंमलबजावणी झालेली नाही. याचा अर्थ आमदारांचा प्रस्ताव वाहतूक विभागाने बासनात गुंडाळल्याचे स्पष्ट झाले.महिलांची प्रचंड गर्दीतून आणि काही आबंटशौकीन पुरूषांच्या कचाट्यातून सुटका करण्याकरिता आ. चव्हाण यांनी हा प्रस्ताव दिला होता. महिलांनी त्या प्रस्तावाचे स्वागत केले होते. त्यावेळी शहर वाहतूक पोलिसांच्या दालनात झालेल्या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण एस.के.डुबल, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर, तत्कालीन शहर वाहतूक पोलीस अधिकारी एस.यादव आदींसह सर्वच रिक्षा युनियनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आमदारांच्या मागणीनुसार शहरातील सर्वच अधिकृत रिक्षा थांब्यावर महिलांकरिता स्वतंत्र रांगेची सोय देण्यात यावी, प्रायोगिक तत्त्वावर रामनगर येथे असलेल्या एस.व्ही रोडसह, सुनील नगर, राजाजी पथ, नांदिवली, केळकर रोड, रामचंद्र नगर आदी भागात जाणाऱ्या रिक्षांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्यामुळे या स्टँडचे महत्व अनन्यसाधारण असल्याने येथे या सूचनेचा अवलंब करावा. महिलांचा स्वतंत्र रांगेला प्रतिसाद कसा मिळतो हे पाहून व्याप्ती वाढवावी, असे ठरले होते. रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनीही आपली मते मांडली, मात्र ही संकल्पना स्वागतार्ह असून त्याची अंमलबजावणी सुसूत्रबद्धतेने होणे गरजेचे असल्याचे सांगितले. ही सोय करतांना अन्य कोणाचीही गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात यावी याकडे बैठकीत लक्ष वेधले होते. तसेच सकाळपासून रात्रीपर्यंत महिलांची स्वतंत्र रांग असावी की गर्दीच्या विशिष्ट वेळी असावी, याबाबतही मते व्यक्त झाली होती. त्या बैठकीनंतर हा प्रस्ताव ट्रॅफिक विभागाच्या विभागीय पोलीस आयुक्तालय, ठाणे येथे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याचा लाभ ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिला, गरोदर माता, विकलांग महिलांसह विद्यार्थिनींना प्रामुख्याने झाला असता.