शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

शिवसेना-भाजपाकडून स्वतंत्रपणे सत्तेची गणिते

By admin | Updated: February 24, 2017 07:15 IST

उल्हासनगरमध्ये शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढल्याने आणि निकालानंतर कोणाच्याच हाती पूर्ण बहुमत नसल्याने एकतर

पंकज पाटील /उल्हासनगर उल्हासनगरमध्ये शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढल्याने आणि निकालानंतर कोणाच्याच हाती पूर्ण बहुमत नसल्याने एकतर दोन्ही पक्षांनी एकत्र येणे किंवा छोटे पक्ष, अपक्षांना सोबत घेण्यावाचून दोघांनाही पर्याय उरलेला नाही. शिवेसना-भाजपाने एकत्र येणे मुंबईच्या निकालावर अलवंबून असल्याने तोवर दोन्ही पक्षांनी काही नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.उल्हासनगरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला, तरी सत्तेसाठी त्यांनाही कसरत करावी लागणार आहे. सत्तेच्या गणितात माहीर असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातून उसंत मिळताच शिवसेनेतर्फे लागलीच उल्हासनगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपापेक्षा जागा कमी असल्या, तरी भाजपाला सोडून इतर पक्षांना एकत्रित करुन सत्तेचे गणित जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबई आणि ठाण्यातील गणितांवर आणि निर्णयावर अवलंबून न राहता उल्हासनगरमध्ये जेवढे नगरसेवक गळाला लावता येतील, त्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाल्याचे समजते. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक आकडा भाजपाकडे नाही. तो गाठण्यासाठी भाजपाचेही प्रयत्न सुरू आहेत. भाजपाकडे कमळाच्या चिन्हावरील ३२ विजयी उमेदवार असून पीपल्स रिपब्लीकन पार्टी, भारिप आणि भाजपा पुरस्कृत एक नगरसेवक मोजल्यास त्यांची संख्या ३५ होते. त्यांना आणखी पाच नगरसेवकांची गरज भासणार आहे. साई पक्षाने कलानी गटाच्या विरोधात निवडणूक लढविल्याने तो पक्ष सहजासहजी भाजपाकडे वळणार नाही, असा अंदाज होता. पण ओमी स्वत: निवडून न आल्याने साई पक्षाचा कलानी विरोध कितपत टिकतो, ते पाहणे महत्वाचे आहे. त्यातही भाजपा हा राज्यात आणि केद्रातील सत्तेत असलेला पक्ष असल्याने तोवर राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचा एक अशा पाच नगरसेवकांना फोडण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून त्या नगरसेवकांना भाजपासोबत जाता येणार नाही, हे गृहीत धरून या संदर्भातील प्राथमिक बोलणी सुरु करण्यात आली आहे. केवळ साईचे जीवन ईदनानी यांना सोबत घेऊन शिवसेनेची सत्ता स्थापन होणार नाही. त्यामुळे शिवसेनेनेही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांवर जाळे फेकण्याची तयारी केली आहे. शिवसेनेचे २५, साई पक्षाचे ११ आणि रिपाइंचे २ अशा ३८ नगरसेवकांचे बळ तयार करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला कह्यात घेण्याचा प्रयत्न शिवसेनतर्फे केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेची गणिते पालकमंत्री एकनाथ शिंदे ठरवत आहेत. ठाण्यात शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाल्याने त्यांनी आपले लक्ष उल्हासनगरवर केंद्रीत केले आहे. मुंबईत युती झाल्यास ठाणे व उल्हासनगरमध्येही युती होण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईबाबत निर्णय प्रलंबित असल्याने आणि भविष्यात युतीचा निर्णय न झाल्यास उल्हासनगरची सत्ता गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी शिवसेनेने आत्ताच तयारी करुन ठेवली आहे. भाजपाकडे आकडा जास्त असला, तरी त्यांच्याकडे साई आणि राष्ट्रवादी सहज वळणार नाही याची कल्पना भाजपाच्या नेत्यांनाही आहे. मात्र हेच दोन्ही पक्ष वेळेवर शिवसेनेसोबत जाऊन कलानी आणि भाजपा यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळेच मुंबईच्या निर्णयाची वाट न पाहता सेनेतर्फे शिंदे यांनी आपली यंत्रणा कामाला लावली असून येत्या दोन दिवसांत त्या बाबतच्या बैठकांचे सत्रही सुरू होईल. सत्तेच्या या गणितात साई पक्षाचे शिवसेनेला झुकते माप असेल, हे निवडणुकीपूर्वीपासूनच निश्चित मानले जात आहे. मात्र भाजपाचे काही पदाधिकारी साईला सत्तेचा समान वाटा देऊन आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे साई पक्षाच्या भूमिकेवर सत्तेची गणिते ठरतील. साईसोबत चर्चा यशस्वी न झाल्यास किंवा त्यांनी अवास्तव मागण्या केल्यास शिवसेना आणि भाजपा कमीपणा घेऊन युती करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कलानींना दूर ठेवण्याचे प्रयत्न भाजपाने ओमी कलानी टीमला घेऊन शिवसेनेविरोधात निवडणूक लढविल्याने कलानी पर्वाचा अस्त करण्यासाठी शिवसैनिक भाजपाच्या विरोधात ठाकले होते. कलानीविरोधामुळे विजयी उमेदवारांची भाजपासोबत जाण्याची इच्छा नसली, तरी पक्षाच्या आदेशावर शिवसेना चालत असल्याने कोणीही उघडपणे आपली मते मांडत नाही. मात्र शिवसेना-भाजपा यांनीच एकत्र यावे, असे आदेश येतील तेव्हा पाहू अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. प्रत्यक्षात ओमी कलानी निवडून आलेले नाहीत. त्यातही त्यांचा बहुतांश गट हा कमळ चिन्हावर निवडून आला आहे. त्यामुळे तो कलानी गट म्हणून ओळखला न जाता यापुढे भाजपा म्हणूनच ओळखला जाईल. त्यामुळे ओमी यांना बाजुला ठेवल्यास भाजपाला साई पक्षाशीही वाटाघाटी करता येतील किंवा शिवसेनेलाही सोबत घेता येतील, अशीही चर्चा रंगली आहे.