शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
6
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
7
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
8
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
9
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
11
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
12
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
13
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
14
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
16
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
17
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
18
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
19
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
20
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

स्वतंत्र महापालिकेसाठी बदलापूरवासी सरसावले

By admin | Updated: January 6, 2016 01:04 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्र महापालिका न करता बदलापूरची स्वतंत्र महापालिका करावी, यासाठी सुरू केलेल्या मोहीमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्र महापालिका न करता बदलापूरची स्वतंत्र महापालिका करावी, यासाठी सुरू केलेल्या मोहीमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या मोहीमेत ७,६५० नागरिकांनी स्वतंत्र महापालिकेला कौल दिला असून तशा आशयाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष कालिदास देशमुख यांनी ते निवेदन कोकण आयुक्त तानाजी संत्रे यांना सुपूर्द केले.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिका एकत्र करून त्यांची एकच महापालिका करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. त्याबाबत अभ्यासासाठी कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही शहरांच्या स्वतंत्र महापालिका करायच्या असतील तर या समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे. समितीची पहिली बैठक मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. तेथील सर्व अधिकारी आणि कोकण आयुक्तांपर्यंत बदलापुरातील नागरिकांची मागणी पोचविण्यासाठी देशमुख यांनी नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र कोकण आयुक्तांकडे सुपूर्द केले. या वेळी स्वतंत्र महापालिका कशासाठी हवी, असा प्रश्न आयुक्तांनी विचारला. बदलापूरची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात असून वांगणीसह इतर ग्रामीण भाग बदलापूरला जोडल्यास बदलापूरची स्वतंत्र महापालिका होणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी बदलापूर शहराचा विकास आराखडा नव्याने जाहीर करण्यात येणार आहे. स्वतंत्र महापालिकेचा निर्णय झाल्यास ते गृहीत धरून हा आराखडा तयार करता येईल, असे म्हणणे देशमुख यांनी मांडले. बदलापूर पालिकेची निवडणूक ही अवघ्या सात महिन्यांपूर्वी झाली असून लागलीच महापालिका करुन निवडणूका घेणे योग्य राहणार नाही असेही स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले. जिल्हा सदस्य सेवक देशमुख, शहर उपाध्यक्ष संजय कराळे, दिनेश धुमाळ, सचिव अविनाश देशमुख आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.