शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यात १ ऑगस्टपासून 2.5 लाख रिक्षा चालकांचा बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:28 IST

अडीच लाख चालक होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाढत्या सीएनजी दरामुळे रिक्षा भाडेवाढ लागू करावी तसेच रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांच्या इतर प्रलंबित मागण्या सोडविण्याकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्टपासून कोकण विभागातील सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांनी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी मंगळवारी दिली. अडीच लाख रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला.

सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे.  परिवहन प्रशासन इंधन दरवाढ नियंत्रण किंवा महागाई निर्देशांकानुसार रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दोन वर्षांत सीएनजी दरामध्ये किलोमागे सरासरी  २८ रुपये इतकी वाढ झालेली आहे.  परिवहन विभागाने रिक्षा-टॅक्सी परवाने वाटप तत्काळ बंद करावे. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलनाद्वारे दंड आकारणी करावी. वाहतूक पोलीस विभागामार्फत मोबाइल फोटोद्वारे करण्यात येणारी वसुली बंद करावी. रिक्षा -टॅक्सी व्यावसायिकांकरिता महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयीसुविधा पुरवाव्यात आदी मागण्या केल्या आहेत. कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांना शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी जितेंद्र इंदिसे, दयानंद गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

मनमानी असेल तर तक्रार कराकाेणी रिक्षाचालक जर मनमानी पद्धतीने जादा प्रवासी नेत असेल किंवा शेअर रिक्षाच्या प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध आरटीओकडे तक्रार करावी. संघटना अशा रिक्षाचालकांचे समर्थन करणार नाही; परंतु भाडे नाकारण्याला काही याेग्य कारणे असतात, हेही प्रवाशांनी लक्षात घ्यावे, असे पेणकर व इंदिसे म्हणाले.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाEknath Shindeएकनाथ शिंदे