शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १ ऑगस्टपासून 2.5 लाख रिक्षा चालकांचा बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:28 IST

अडीच लाख चालक होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाढत्या सीएनजी दरामुळे रिक्षा भाडेवाढ लागू करावी तसेच रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांच्या इतर प्रलंबित मागण्या सोडविण्याकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्टपासून कोकण विभागातील सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांनी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी मंगळवारी दिली. अडीच लाख रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला.

सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे.  परिवहन प्रशासन इंधन दरवाढ नियंत्रण किंवा महागाई निर्देशांकानुसार रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दोन वर्षांत सीएनजी दरामध्ये किलोमागे सरासरी  २८ रुपये इतकी वाढ झालेली आहे.  परिवहन विभागाने रिक्षा-टॅक्सी परवाने वाटप तत्काळ बंद करावे. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलनाद्वारे दंड आकारणी करावी. वाहतूक पोलीस विभागामार्फत मोबाइल फोटोद्वारे करण्यात येणारी वसुली बंद करावी. रिक्षा -टॅक्सी व्यावसायिकांकरिता महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयीसुविधा पुरवाव्यात आदी मागण्या केल्या आहेत. कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांना शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी जितेंद्र इंदिसे, दयानंद गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

मनमानी असेल तर तक्रार कराकाेणी रिक्षाचालक जर मनमानी पद्धतीने जादा प्रवासी नेत असेल किंवा शेअर रिक्षाच्या प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध आरटीओकडे तक्रार करावी. संघटना अशा रिक्षाचालकांचे समर्थन करणार नाही; परंतु भाडे नाकारण्याला काही याेग्य कारणे असतात, हेही प्रवाशांनी लक्षात घ्यावे, असे पेणकर व इंदिसे म्हणाले.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाEknath Shindeएकनाथ शिंदे