शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बेकायदा शस्त्रांचा व्यापार तेजीत

By admin | Updated: February 13, 2017 04:50 IST

बारशाच्या समारंभात नाचताना झालेल्या गोळीबारात एका १२ वर्षाच्या मुलाचा जीव गेल्यावर शहरातील वैध आणि अवैध शस्त्रांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत

बारशाच्या समारंभात नाचताना झालेल्या गोळीबारात एका १२ वर्षाच्या मुलाचा जीव गेल्यावर शहरातील वैध आणि अवैध शस्त्रांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातून २०० रिव्हॉल्वरचा गैरव्यवहार वर्षभरापूर्वी झाला होता. तर याच शहरात बेकायदा शस्त्र खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळेच गुन्हेगारी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांची मोठी टोळी या शहरात उभी राहत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळेच बेकायदा शस्त्रांचा व्यापार तेजीत आला आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये गुन्हेगारी वाढत असतानाच या शहराच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा मोठा शस्त्रसाठाही गुन्हेगारांच्या हातात आला आहे. शहरात गोळीबार होण्याचे प्रमाण तीन वर्षात सर्वाधिक आहेत. हे सर्व गोळीबार बेकायदा मार्गाने मिळविलेल्या गावठी गट्टा, रिव्हॉल्वर आणि पिस्तूलमधून झाले. १० हजारापासून ते १५ लाखापर्यंत बंदुकांची विक्री येथे झालेली आहे. उत्तर भारतातून आलेली अनेक शस्त्रे ही अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तलवार आणि चॉपरने हल्ले करणारे गुन्हेगार आता शस्त्रांचा वापर करुन थेट दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यांना अधिकृत शस्त्र परवाना मिळत नाही ते बेकायदारित्या शस्त्र वापरण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. त्यातच जे गुन्हेगारी स्वरुपाचे आहेत त्यांची पहिली पसंती रिव्हॉल्वरचीच आहे. काहीच नाही तर किमान गावठी कट्टा बाळगण्याची क्रेझ वाढली आहे. बदलापूरमध्ये अशा बेकायदा शस्त्रांमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुन्हेगार योगेश राऊत याच्यावर त्याच्या विरोधकांनी गोळीबार केला होता. तर योगेशनेही आपल्या गुंडाना घेऊन शिवसेना उपशहरप्रमुख मोहन राऊत यांच्यावर गोळीबार करुन त्यांना ठार मारले. राऊत यांच्या हत्येमागे बेकायदा शस्त्रांचा समावेश होता. या आधी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख रवींद्र पाटील यांची देखील वांगणीत अशाच शस्त्राच्या मदतीने गोळीबार करुन हत्या करण्यात आली. यातील आरोपींना अटकही केली होती. त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त केली होती. गोळीबाराचा प्रकार येथेच थांबलेला नाही. आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत यांच्यावर देखील पालिका कार्यालयासमोर गोळीबार करण्यात आला. त्यात त्यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे.