शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

गॅसदरवाढीमुळे मातीच्या चुलींना वाढती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:33 IST

- प्रकाश जाधव मुरबाड : दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किमतींत वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांनी आर्थिक बजेट सावरण्यासाठी मातीच्या चुलींना ...

- प्रकाश जाधव

मुरबाड : दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किमतींत वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांनी आर्थिक बजेट सावरण्यासाठी मातीच्या चुलींना प्राधान्य दिले आहे. या मातीच्या चुलींना लागणारे सरपण जंगलातून आणावे लागत असल्याने वनसंपदा कमी होऊन प्रदूषणाची समस्या वाढणार आहे. वनविभागाने गावात तयार केलेल्या वनव्यवस्थापन समित्या निष्प्रभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील कुंभारांना यामुळे सुगीचे दिवस येत आहेत.

पंतप्रधान उज्ज्वल महिला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे वाटप करून ग्रामीण भागातील महिलांना गॅस वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र, २०१४ मध्ये या गॅस सिलिंडरची किंमत ४४० रु. होती. चार वर्षांतच ती ८६० रु. एवढी झाली. ही दरवाढ परवडणारी नसल्याने ग्रामीण भागातील लोकांनी मातीच्या चुलींकडे आपला मोर्चा वळवला आहे. पूर्वी घरोघरी मातीच्या चुली दिसत असत. मात्र धुराचे प्रदूषण, नष्ट होणारी वनसंपदा, स्वयंपाक करताना महिलांना होणारा त्रास यापासून मुक्ती मिळावी, म्हणून ग्रामीण भागात गॅसवर स्वयंपाक होऊ लागला.

ग्रामीण भागातील कुंभार मडके, रांजण, दिवे, मातीची भांडी याबरोबरच मातीच्या चुलीदेखील बनवू लागले. पूर्वी ३५ रुपयांना मिळणारी मातीची चूल आता २५० रुपयांना मिळते आहे.

मातीच्या चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी लाकडे ही गावाजवळील जंगलातून आणावी लागतात. यामुळे वृक्षतोड होते. वृक्षतोड होऊ नये, यासाठी वनविभागाने गावोगावी लोकांच्या वनव्यवस्थापन समित्या स्थापन केल्या आहेत.

टॅग्स :Inflationमहागाई