शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इमारतींमध्ये वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव; केडीएमसीच्या आरोग्य विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 23:42 IST

होम क्वारंटाइनचे पालन होत नसल्याचे उघड

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नाहीय. रुग्णांची संख्या नेमकी कोणत्या वस्तीत वाढते, याचे निरीक्षण मनपाच्या आरोग्य विभागाने केले असता इमारतींमधील रुग्ण वाढत आहेत. इमारतींमधील रहिवासी ‘होम क्वारंटाइन’चे नियम पाळत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे होम आयसोलेसनचे काटेकोर पालन होण्यासाठी मनपा आयुक्त सर्व सोसायट्यांच्या सचिवांना नव्याने नियमावली पाठवणार असून, त्याचे पालन करण्याची सक्ती केली जाणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मनपा हद्दीतील रुग्णसंख्या रविवारपर्यंत ३१,५०३ वर गेली आहे. सध्या ३,८२३ रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण २७ हजार रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ६७८ जणांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीत दररोज नवीन ४०० ते ४५० रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला मनपा हद्दीत असेले १० हॉटस्पॉट आता ४४ वर गेले आहेत. त्यामुळे तेथे लॉकडाऊन कायम असेल, असे आयुक्तांनी १ सप्टेंबरला काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

मनपा हद्दीत दाट लोकवस्तीचे प्रभाग जास्त आहेत. तेथे चाळवजा घरे आणि झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहेत. आॅगस्टमध्ये आयुक्तांनीच माहिती दिली होती की, हॉटस्पॉटमध्ये १५ दिवसांच्या कालावधीत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या स्थिरावत आहे. मात्र, संख्या कमी कधी होणार, याविषयी ठोस दावा प्रशासनाने केला नव्हता.

कल्याण पश्चिमेतील जोशीबागेतील एकाच इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब नुकतीच उघडकीस आली होती. त्यामुळे नवीन रुग्ण नेमक्या कोणत्या लोकवस्तीतील आहेत, याचे निरीक्षण आरोग्य विभागाने केले. त्यात चाळ, झोपडपट्टी आणि इमारतींचे सर्वेक्षण केले असता कोरोनाचे रुग्ण हे इमारतीत जास्त आढळून येत आहेत.

नव्या रुग्णांच्या संख्येनुसार इमारतीत राहणाºया रुग्णांची टक्केवारी ८० इतकी आहे. चाळ आणि झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत आहेत. इमारतीत कोरोना रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येण्याचे कारण इमारतीमधील नागरीक होम आयसोलेशनचे नियम पाळत नाहीत अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.

सोसायट्यांना बजावणार नोटिसा

महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व प्रभाग अधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांसह पोलीस उपायुक्तांसोबत बैठक घेतली. त्यानुसार, सर्व सोसायट्यांच्या सचिवांना नियमावलीचे पालन करण्यासाठी नव्याने नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. त्याचे पालन काटेकोरपणे करण्यात आले नाही, तर संबंधित सोसायटीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली