शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

४८८ एमएलडी पाण्याचा वाढीव कोटा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 01:26 IST

आठवडाभरात दीड दिवसाच्या पाणीकपातीला जिल्ह्यातील नागरिकांनी गेल्या वर्षी तोंड दिले.

सुरेश लोखंडे ठाणे : आठवडाभरात दीड दिवसाच्या पाणीकपातीला जिल्ह्यातील नागरिकांनी गेल्या वर्षी तोंड दिले. यंदा मात्र वाढीव पाणीकोट्याच्या मागणीस मंजुरी देऊन जिल्हा प्रशासनाने नूतन वर्षाची ‘गूड न्यूज’ देऊन नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. गरजेपोटी पाण्याची चोरी करून ते शहरांना पुरवणाऱ्या महापालिका, नगरपालिकांसाठी रोज ४८८ दशलक्ष लीटर वाढीव पाणीकोटा प्रशासनाने मंजूर केला. यामुळे पाणीचोरी थांबणार असून, सोबतच पाणीकपातीचे संकटही दूर होऊन जिल्हावासीयांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी उचलणाºया संस्था, महापालिका, नगरपालिकांमुळे गेल्या वर्षी धरणातील पाणीसाठ्यात १५ टक्के तूट निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी आठवड्यातून ३० तास म्हणजे दीड दिवसाच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. मात्र, यंदाच्या उत्तम पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढलेला आहे. एवढेच नव्हे तर बारवी धरणाची उंची पाच मीटरपेक्षा जास्त वाढविल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करणे शक्य झाले आहे. यामुळे या धरणातून आणि उल्हास नदीतून पाणी उचलणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, स्टेम प्राधिकरण, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ यांच्या दैनंदिन मंजूर पाणीकोट्यात सर्व मिळून ४८८ दशलक्ष लीटर वाढीव पाणीपुरवठ्यास मंजुरी मिळाली आहे. पाणी उचलणाºया यंत्रणा व महापालिका याआधी रोज एक हजार १९२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करायच्या. आता वाढीव पाणीकोट्यामुळे १६८० दशलक्ष लीटर मुबलक पाणीपुरवठा जिल्ह्यात होऊ घातला आहे. यामुळे पाणीकपातीच्या संकटापासून नागरिकांची सुटका झाली आहे.>अंबरनाथ/बदलापूरचीचिंता मिटणारशहरातील प्रत्येक नागरिकास १२५ लीटर तर ग्रामीण भागातील प्रत्येकास ९५ लीटर पाणीपुरवठ्याचे निकष आहेत. यास अनुसरून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक महापालिका-नगरपालिकेच्या वाढीव पाणीकोट्यास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीपुरवठा करणाºया एमजेपीला आधी केवळ ९० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीकोटा मंजूर होता. त्यात ५० एमएलडीची वाढ करून या शहरांसाठी आता १४० एमएलडी पाणीकोटा मंजूर झाला आहे.>केडीएमसी/उल्हासनगरलाही मुबलक पाणीस्टेमसह कल्याण-डोंबिवली महापालिकेला (केडीएमसी), उल्हासनगर महापालिका आदींना उल्हास नदीवरून हा वाढीव पाणीपुरवठा मंजूर झालेला आहे. या नदीवरून केडीएमसीला आधी २३४ एमएलडी पाणी उचलण्यास परवानगी होती. आता त्यात ८६ एमएलडीची वाढ करून केडीएमसीला ३२० एमएलडी पाणीकोटा मंजूर झाला आहे.>उद्योग-कारखान्यांसाठी ९०४ एमएलडी पाणीमहाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (एमआयडीसी) उल्हासनगर महापालिका, जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रास, कारखाने आदींना याआधी ५८३ एमएलडी पाणीपुरवठा रोज होत असे. पण, त्यास वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन एमआयडीसी वाढीव म्हणजे ३२१ एमएलडी पाण्याची चोरी करीत असे. पण, आता त्यांचा या ३२१ एमएलडी वाढीव पाणीकोटा मंजूर झालेला आहे. यामुळे एमआयडीसीला ९०४ एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे.>बारवी धरणात आता 79% पाणीसाठालघुपाटबंधारे विभागाची तंबी असतानाही केडीएमसी, स्टेम, एमआयडीसी आणि काही प्रमाणात एमजेपीदेखील जादा पाणी उचलत असे. यामुळे गेल्या वर्षी बारवी धरण आणि आंध्रा धरणातील पाणीसाठ्यात १५ टक्के तूट निर्माण झाली होती. तूट भरून काढण्यासाठी नागरिकांना दीड दिवसाच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. पण, आता धरणातील पाणीसाठाही वाढलेला आहे. बारवीची पाच मीटरपेक्षा जास्त उंची वाढवली असल्यामुळे या धरणात १६६.३९ दशलक्ष घनमीटरऐवजी यंदापासून २६८.१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे एमआयडीसीद्वारे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यासही पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यानुसार, बारवीत आज रोजी 79.87% पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी तो केवळ ६४.९५ टक्के होता.>स्टेमला मिळणार आता ३१६ एमएलडीठाणे शहरातील काही भागांसह भिवंडी महापालिका, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी तालुक्यातील ३४ गावे आदींना स्टेम प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा होतो.यासाठी आधी केवळ २८५ एमएलडी पाणीपुरवठा रोज व्हायचा. पण, आता त्यात ३१ एमएलडीची वाढ करून या शहरांसाठी रोज ३१६ एमएलडी पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.